विवेचन सारांश
यज्ञकर्माचे वेदसंमत प्रकार व ज्ञानयज्ञाचे श्रेष्ठत्व.
या चौथ्या अध्यायातील श्लोक हे सागरातील रत्नांसमान आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण सिद्धांत यात पहावयास मिळतात. आत्तापर्यंतच्या श्लोकांमध्ये आपण कर्म सिद्धांताविषयी जाणून घेतले. त्यातही 'अकर्म' जे चिंतनदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे, त्याची व्याख्या पाहिली. आसक्ती रहित कर्म ते अकर्म होय. एकोणिसाव्या श्लोकात आपण पाहिले की ज्याप्रमाणे भाजलेल्या चण्यापासून रोपे तयार होत नाहीत त्याप्रमाणे ज्ञानाच्या अग्नीने आवृत्त झाल्यावर कर्मापासून फळ निर्माण होत नाही. ज्या साधकाचे कर्मफळ ज्ञानाच्या अग्नीमध्ये तावून-सुलाखून निघते, त्या साधकाला कर्मफळ भोगावे लागत नाही. इतकेच नाही तर त्याच्याकडून जे कर्म घडते त्यापासून फळ निर्माणही होत नाही. काही क्रिया केली म्हणजेच कर्म घडते असे नाही. कधी कधी काही न करताही कर्म घडते व त्याचे फळ भोगावे लागते. आईने भाजी बनवली. मुलीने वडिलांना वाढली. वडिलांना वाटले की भाजी मुलीनेच बनवली आहे. त्यांनी तिची प्रशंसा केली. आई गप्प राहिली. मुलीचे चांगले कौतुक होते आहे तर होऊ दे. मुलगीही काही बोलली नाही. हे दोघींकडून जे झाले ते विकर्मच होय. अफगाणिस्तानात बुद्धाची प्रतिमा तालिबान्यांनी तोफेने उडवली. भारताने निषेध व्यक्त केला. बौद्ध देश असूनही श्रीलंकेने काहीच विरोध नोंदवला नाही. हे अशुभ कर्मच नाही का? ज्या ठिकाणी बोलणे हे कर्तव्य आहे त्या ठिकाणी गप्प बसणे हा अपराधच होय. भाव हे कर्माचे कारण बनू शकते हे ध्यानात ठेवले पाहिजे.
4.21
निराशीर्यतचित्तात्मा, त्यक्तसर्वपरिग्रहः।
शारीरं(ङ्) केवलं(ङ्) कर्म, कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्॥4.21॥
त्यक्त सर्वपरिग्रह म्हणजेच परिग्रह वृत्तीचा त्याग करा. स्वामित्वाची भावना असणे हे परिग्रह वृत्तीचे मूळ आहे. घर कोणाच्या नावावर आहे हे कुटुंबातील भांडणाचे कारण होते. दिवाळीत फटाके उडताना पाहून आनंद होण्यापेक्षा मी फटाका उडवला ही भावना जास्त सुखकारक असते. क्रिकेट मॅच खिलाडू वृत्तीने पाहण्यापेक्षाही आपल्या देशाच्या खेळाडूने दुसऱ्या देशाच्या खेळाडूला धावचीत केल्याचा आनंद मोठा वाटतो. अशा मीपणाच्या भावनेमुळे सुखदुःख निर्माण होते. म्हणूनच अपरिग्रह वृत्तीने जगावे.
शारीरं केवलं कर्म याचा अर्थ पाण्याबरोबर झाडाचे एखादे पान जसे वाहत जाते तसेच सहज जगायला शिकावे. कमळाचे फूल पाण्यातच आपले जीवन व्यतीत करते, परंतु त्याला पाण्याचा स्पर्शही होत नाही. तसे या संसाररूपी सागरात राहून आपण येथील घटकांना सहजपणे स्वीकारावे. संसारातील घटकांना अवास्तव महत्त्व न देता अलिप्त रहावे.
'तेरा रामजी करेंगे बेडा पार' अशा सहजपणे जो जगतो तो शुभ-अशुभ पाप-पुण्य यापासून मुक्त होतो.
यदृच्छालाभसन्तुष्टो, द्वन्द्वातीतो विमत्सरः।
समः(स्) सिद्धावसिद्धौ च, कृत्वापि न निबध्यते॥4.22॥
मत्सर म्हणजे ईर्षा. आपल्या परिचयातील लोकांबरोबर प्रतिष्ठा, कमाई, घर, गाडी, बंगला इत्यादी विषयांवरून आपण तुलना करतो. त्यातूनच ईर्षा निर्माण होते. अशी ईर्षा जो करत नाही तो 'विमत्सरः|' हर्ष-शोक, लाभ-हानी, यश-अपयश अशा द्वंद्वांना तो आपल्या जीवनात थारा देत नाही. या द्वंद्वांपासून जो मुक्त असतो, तो द्वंद्वातीत होय. अशा प्रकारे सिद्धी व असिद्धी यांमध्ये समभाव ठेवणारा कर्मयोगी बंधमुक्त असतो.
सूक्ष्म विचार केला तरच कोण कोणाच्या बंधनात आहे हे समजून येते. एकदा एक शेतकरी गाईच्या गळ्यात दोरी बांधून तिला घेऊन जात होता. गुरूंनी शिष्याला विचारले की इथे कोण कोणाच्या बंधनात आहे ते सांग पाहू. शिष्याने पटकन उत्तर दिले की गाय शेतकऱ्याच्या बंधनात आहे. गुरुजींनी मागून जाऊन हळूच कात्रीने दोरी कापली. गाय मोकळी होऊन पळू लागली. आता शेतकरी गाईच्या मागे धावू लागला. ते बघून गुरुजींनी शिष्याला पुन्हा तोच प्रश्न विचारला. त्यावेळी बंधन या शब्दाचा अर्थ शिष्याच्या लक्षात आला. भोगांचा आश्रय हा जीवाला बंधनात टाकतो. गाडी खरेदी केली की ती नीट ठेवण्याची चिंता सतत मनाला बंधनात टाकते. मग त्या गाडीवर एखादा ओरखडा जरी उठला तरी मन दुखी होते. एखादा जमिनीचा तुकडा विकत घेतला तरी त्यावर कोणी कब्जा तर करणार नाही ही चिंता भेडसावत राहते. राजा ययातीने आपल्या चार पुत्रांना सांगितले होते की जो त्याला आपले तारुण्य देईल त्याला तो राज्यपद देईल. पुरु या पुत्राने ययातीला आपले तारुण्य बहाल केले. दीडशे वर्षे ययातीने तारुण्य भोगले. परंतु त्याच्या लक्षात आले की त्याची भोगलालसा पूर्ण कधीच झाली नाही, कमी पण झाली नाही तर उलट वाढतच गेली. शेवटी त्याने ते तारुण्य पुरुला परत केले व सांगितले की मी ही जी चूक केली ती तू कधीच करू नकोस. प्रत्यक्षात आपण भोग भोगत नाही तर भोगच आपल्याला भोगतात. म्हणून यज्ञमय जीवन जगा असे भगवंत सांगतात.
गतसङ्गस्य मुक्तस्य, ज्ञानावस्थितचेतसः।
यज्ञायाचरतः(ख्) कर्म, समग्रं(म्) प्रविलीयते॥4.23॥
ब्रह्मार्पणं(म्) ब्रह्म हवि:(र्), ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं(म्), ब्रह्मकर्मसमाधिना॥4.24॥
दैवमेवापरे यज्ञं(म्), योगिनः(फ्) पर्युपासते।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं(म्), यज्ञेनैवोपजुह्वति॥4.25॥
तिसरा यज्ञ हा आत्मरुपी यज्ञ सांगितला आहे. कर्मयोग हे या यज्ञाचे स्वरूप आहे. कर्ता, करण व कर्म हे तीनही ब्रह्मरूप होतात, हे या यज्ञाचे वैशिष्ट्य होय.
श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये, संयमाग्निषु जुह्वति।
शब्दादीन्विषयानन्य, इन्द्रियाग्निषु जुह्वति॥4.26॥
पाचवा यज्ञ हा विषयरूप हवन यज्ञ. सर्वकाही इंद्रियेच करतात. मला भूक लागली की हात पोळी उचलतो. तोंड ती पोळी खाते. मी काहीच करत नाही. या क्रिया हा इंद्रियांचा विषय आहे हा भाव ठेवणे हाच विषय रुपी हवन यज्ञ.
सर्वाणीन्द्रियकर्माणि, प्राणकर्माणि चापरे।
आत्मसंयमयोगाग्नौ, जुह्वति ज्ञानदीपिते॥4.27॥
द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा, योगयज्ञास्तथापरे।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च, यतयः(स्) संशितव्रताः॥4.28॥
आठवा यज्ञ म्हणजे तपोयज्ञ. अध्यात्म मार्गावर चालताना प्रसन्नता पूर्वक कष्ट सहन करणे हा तपोयज्ञ होय. प्रसन्नता पूर्वक हा शब्द महत्त्वाचा आहे. एकादशीच्या दिवशी निराहार राहणे हे तपच आहे. जेव्हा ते प्रसन्नता पूर्वक केले जाते व त्याचा उद्देश भगवद्प्राप्ती असतो तेव्हा तो तपो यज्ञ होतो.
नववा यज्ञ योगयज्ञ होय. सर्व काही भगवंतांप्रीत्यर्थ करणे हा या यज्ञाचा उद्देश. जे काही घडत आहे ते भगवंतच करून घेत आहेत ही भावना ठेवणे म्हणजे योगयज्ञ.
अकरावा यज्ञ हा स्वाध्याय यज्ञ होय. यामध्ये साधक एकाच शास्त्र वचनाचा किंवा गुरु वचनाचा अंगीकार करत आपले जीवन श्रेष्ठ बनवतो. सतत नर्मदा परिक्रमा करत राहणे, पूर्ण दिवस सुंदर कांडाचे वा ज्ञानेश्वरीचे वाचन करणे, ही या यज्ञाची उदाहरणे आहेत.
अपाने जुह्वति प्राणं(म्), प्राणेऽपानं(न्) तथापरे।
प्राणापानगती रुद्ध्वा, प्राणायामपरायणाः॥4.29॥
अपरे नियताहाराः(फ्), प्राणान्प्राणेषु जुह्वति।
सर्वेऽप्येते यज्ञविदो, यज्ञक्षपितकल्मषाः॥4.30॥
यज्ञशिष्टामृतभुजो, यान्ति ब्रह्म सनातनम्।
नायं(म्) लोकोऽस्त्ययज्ञस्य, कुतोऽन्यः(ख्) कुरुसत्तम॥4.31॥
एवं(म्) बहुविधा यज्ञा, वितता ब्रह्मणो मुखे।
कर्मजान्विद्धि तान्सर्वान्, एवं(ञ्) ज्ञात्वा विमोक्ष्यसे॥4.32॥
श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्, ज्ञानयज्ञः(फ्) परन्तप।
सर्वं(ङ्) कर्माखिलं(म्) पार्थ, ज्ञाने परिसमाप्यते॥4.33॥
तद्विद्धि प्रणिपातेन, परिप्रश्नेन सेवया।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं(ञ्), ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः॥4.34॥
शिष्य होण्याची पात्रता ही गुरुची सेवा करूनच लाभते. शबरी व भरत यांचे उदाहरण समोर ठेवावे. लक्ष्मणानेही रामाची सेवा केली, परंतु भरताने चौदा वर्षे दूर राहूनही केलेली रामाची सेवा ही श्रेष्ठ ठरली. श्रीराम वनवासात भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगत, 'तुम मम प्रिय भरतहि सम भाई.'
कबीरदास तर स्वतःला रामाचे चाकर म्हणवून घेत.
जीवन तो हमें कई बार मिला, गुरू ऐसा ना बारम्बार मिला
हम भी कुछ करम कमा लेते, अवसर ना हमें हर बार मिला,
जीवन तो हमें कई बार मिला, गुरू ऐसा ना बारम्बार मिला॥
जो जनम जनम से बिछड़ा था, इस जनम में आकर अब है मिला,
अब तर जायेंगे भव सागर, इस बार जो तुमने थाम लिया,
जीवन तो हमे कई बार मिला, गुरू ऐसा ना बारम्बार मिला॥ १॥
गोविन्द कृपा इस बार हुई, जो साथ तुम्हारा पाया है,
मैं बड़भागी मेरा भाग्य जगा, नारायण नर अवतार मिला,
जीवन तो हमे कई बार मिला, गुरू ऐसा ना बारम्बार मिला॥ २॥
इस भ्रम के गहरे सागर में, बिन तेरे कुछ नहीं है मेरा,
मेरा ध्यान भी तू मेरा ज्ञान भी तू, जित देखा तेरा रूप मिला,
जीवन तो हमे कई बार मिला, गुरू ऐसा ना बारम्बार मिला॥ ३॥
हम भी कुछ करम कमा लेते, अवसर ना हमें हर बार मिला,
जीवन तो हमे कई बार मिला, गुरू ऐसा ना बारम्बार मिला॥
अशा प्रकारे समर्पण, सेवा व जिज्ञासा हे तीन भाव आपल्याला गुरूचरणाचे दर्शन घडवतात व ज्ञानाचा प्रकाश आपले जीवन उजळून टाकतो.
यज्ज्ञात्वा न पुनर्मोहम्, एवं(म्) यास्यसि पाण्डव।
येन भूतान्यशेषेण, द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि॥4.35॥
अपि चेदसि पापेभ्यः(स्), सर्वेभ्यः(फ्) पापकृत्तमः।
सर्वं(ञ्) ज्ञानप्लवेनैव, वृजिनं(म्) सन्तरिष्यसि॥4.36॥
यथैधांसि समिद्धोऽग्नि:(र्), भस्मसात्कुरुतेऽर्जुन।
ज्ञानाग्निः(स्) सर्वकर्माणि, भस्मसात्कुरुते तथा॥4.37॥
न हि ज्ञानेन सदृशं(म्), पवित्रमिह विद्यते।
तत्स्वयं(म्) योगसंसिद्धः(ख्), कालेनात्मनि विन्दति॥4.38॥
श्रद्धावाँल्लभते ज्ञानं(न्), तत्परः(स्) संयतेन्द्रियः।
ज्ञानं(म्) लब्ध्वा परां(म्) शान्तिम्, अचिरेणाधिगच्छति॥4.39॥
अज्ञश्चाश्रद्दधानश्च, संशयात्मा विनश्यति।
नायं(म्) लोकोऽस्ति न परो, न सुखं(म्) संशयात्मनः॥4.40॥
योगसन्न्यस्तकर्माणं(ञ्), ज्ञानसञ्छिन्नसंशयम्।
आत्मवन्तं(न्) न कर्माणि, निबध्नन्ति धनञ्जय॥4.41॥
तस्मादज्ञानसम्भूतं(म्), हृत्स्थं(ञ्) ज्ञानासिनात्मन:।
छित्त्वैनं(म्) संशयं(म्) योगम्, आतिष्ठोत्तिष्ठ भारत॥4.42॥
हरिभजनाने विवेचन सत्र समाप्त झाले व प्रश्न उत्तर सत्र सुरू झाले.
तिसऱ्या अध्यायाचे विवेचन यासाठी आपण जरूर पुन्हा ऐकावे. त्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे. मनुष्याने चारही धर्मांचे पालन केले पाहिजे. एक म्हणजे परंपरेनुसार जे कर्म, ते केले पाहिजे. दुसरे म्हणजे वर्ण स्वधर्म म्हणजे आपल्याला चार वर्णांपैकी जो वर्ण प्राप्त झाला आहे, त्याप्रमाणे कर्तव्य कर्म करणे. तिसरा रुचिस्वधर्म, यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण एखादे काम करतो व चौथा आपद्धर्म कर्म , यामध्ये संकटकाळी एखाद्याला मदत करणे हा आपला धर्मच समजावा. या चारही प्रकारांमध्ये विवेकाच्या सहाय्याने, समत्व राखून, परिस्थिती व योग्यतेनुसार कर्म करावे. हे थोडे कठीण वाटू शकते. यासाठी गुरूची आवश्यकता असते. कोणतेही कर्म करताना इतरांची अपेक्षा लक्षात घेऊ नये. ते कष्टदायक असते. त्या ऐवजी विवेकाने कृती करणे योग्य असते.
२.माधुरी जी - भगवद्भक्ति ची काय लक्षणे आहेत? काय करावे म्हणजे पूर्णपणे त्यात लीन होऊन जाऊ.
परमेश्वराचे दर्शन करणे आवडत असेल, ईश्वराच्या गोष्टी ऐकणे आवडत असेल, तर हे भगवंत भक्तीचे लक्षण समजावे. भक्तीमध्ये लीन होण्यासाठी आत्ता तुम्ही जिथे आहात तेथूनच पुढे जावे. सत्संग करावा. त्याने प्रसन्नता लाभते.
यानंतर समापन प्रार्थनेने सत्राची सांगता झाली.