विवेचन सारांश
अर्जुनाची संपूर्ण शरणागती, भगवंत त्यास उपदेशती
पारंपारिक पद्धतीने दीपप्रज्वलन करून तसेच सुमधुर प्रार्थनेसह विवेचनसत्राची सुरुवात झाली. सुरुवातीस गुरुवंदना म्हणून तसेच भगवान श्रीकृष्ण, माता सरस्वती, भगवान वेदव्यास, भगवद्गीता, सद्गुरु तसेच भारतमाता यांची स्तुतीपर स्तोत्रे म्हटली गेली. परमपूज्य सद्गुरु गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या चरणी वंदन करून आणि सर्व गीता प्रेमी साधकांना अभिवादन करून विवेचनास प्रारंभ झाला.
दुसऱ्या अध्यायाच्या विवेचनास प्रारंभ करण्यापूर्वी भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचे महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे. पहिल्या अध्यायात अर्जुन बोलतो, परंतु भगवंतांचे बोलणे मात्र दुसऱ्या अध्यायापासून सुरू होते. ज्या परिस्थितीत भगवद्गीता सांगितली गेली ती परिस्थिती कशी होती? तसेच अर्जुनाशी मन:स्थिती त्यावेळी काय होती? हे पहिल्या अध्यायात वर्णन केले आहे. त्यामुळे भगवद्गीता समजावून घेताना संदर्भासाठी पहिला अध्याय समजून घेणे आवश्यक आहे.
दोन्ही सैन्य एकमेकांसमोर उभी आहेत. युद्ध टाळण्याचे सर्व प्रयत्न विफल झाले आहेत. अर्जुनही युद्धास सज्ज झाला आहे. भगवान श्रीकृष्ण, पितामह भीष्म, अर्जुन या सर्वांनी शंखनाद केला आहे आणि अशावेळी अचानक अर्जुनाच्या मनात विषाद दाटून येतो. आप्तस्वकीयांचा मोह त्याच्या मनात जागृत होऊन तो शोकाकुल होतो. अर्जुन शस्त्र टाकून रथाच्या मागील भागी जाऊन बसतो आणि 'मी युद्ध करणार नाही' असे म्हणतो. हे पहिल्या अध्यायात वर्णिले आहे.
अर्जुनाची मन:स्थिती समजण्यापूर्वी महाभारतयुद्धाचा इतिहास जाणून घेणेही आवश्यक आहे.
युद्ध अटळ आहे हे समजल्यानंतर धृतराष्ट्राने आपला एक दूत पांडवांकडे पाठवला होता. त्यावेळी त्याने पांडवांना असा निरोप दिला होता की माझा पुत्र दुर्योधन असमंजस आहे, परंतु या युद्धाने होणारा विनाश लक्षात घेऊन, समजुतदारपणा दाखवून पांडवांनी युद्ध टाळावे. हा राजाच्या आणि युद्धाच्या रणनीतीचा एक भाग असतो. परंतु कितीही नाही म्हटले तरी अर्जुनाच्या मनावर याचा परिणाम नक्कीच झालेला होता. प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी त्याचे मन विषण्ण होते आणि 'या युद्धाने काय साध्य होणार आहे?' असा विचार मनात येऊन युद्धातील प्रमुख योद्धा असलेल्या अर्जुनाने शस्त्रत्याग केला होता.
अर्जुनाला विषाद का झाला हे आपण पहिल्या अध्यायात पाहिले. दुःख आणि विषाद यात फरक आहे. मनुष्य अत्यंतिक दुःखात बुडून जातो आणि आपले कर्तव्य विसरतो तेव्हा त्याला विषाद म्हणतात. अशा अर्जुनाला जागृत करण्याचे काम भगवंतांवर येऊन पडले आहे आणि दुसऱ्या अध्यायापासून ते सुरू होते.
म्हणूनच भगवद्गीता म्हणजे विषण्ण जीवाला प्रसन्न करणारे शास्त्र आहे असे म्हणतात.
दुसऱ्या अध्यायाच्या विवेचनास प्रारंभ करण्यापूर्वी भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचे महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे. पहिल्या अध्यायात अर्जुन बोलतो, परंतु भगवंतांचे बोलणे मात्र दुसऱ्या अध्यायापासून सुरू होते. ज्या परिस्थितीत भगवद्गीता सांगितली गेली ती परिस्थिती कशी होती? तसेच अर्जुनाशी मन:स्थिती त्यावेळी काय होती? हे पहिल्या अध्यायात वर्णन केले आहे. त्यामुळे भगवद्गीता समजावून घेताना संदर्भासाठी पहिला अध्याय समजून घेणे आवश्यक आहे.
दोन्ही सैन्य एकमेकांसमोर उभी आहेत. युद्ध टाळण्याचे सर्व प्रयत्न विफल झाले आहेत. अर्जुनही युद्धास सज्ज झाला आहे. भगवान श्रीकृष्ण, पितामह भीष्म, अर्जुन या सर्वांनी शंखनाद केला आहे आणि अशावेळी अचानक अर्जुनाच्या मनात विषाद दाटून येतो. आप्तस्वकीयांचा मोह त्याच्या मनात जागृत होऊन तो शोकाकुल होतो. अर्जुन शस्त्र टाकून रथाच्या मागील भागी जाऊन बसतो आणि 'मी युद्ध करणार नाही' असे म्हणतो. हे पहिल्या अध्यायात वर्णिले आहे.
अर्जुनाची मन:स्थिती समजण्यापूर्वी महाभारतयुद्धाचा इतिहास जाणून घेणेही आवश्यक आहे.
युद्ध अटळ आहे हे समजल्यानंतर धृतराष्ट्राने आपला एक दूत पांडवांकडे पाठवला होता. त्यावेळी त्याने पांडवांना असा निरोप दिला होता की माझा पुत्र दुर्योधन असमंजस आहे, परंतु या युद्धाने होणारा विनाश लक्षात घेऊन, समजुतदारपणा दाखवून पांडवांनी युद्ध टाळावे. हा राजाच्या आणि युद्धाच्या रणनीतीचा एक भाग असतो. परंतु कितीही नाही म्हटले तरी अर्जुनाच्या मनावर याचा परिणाम नक्कीच झालेला होता. प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी त्याचे मन विषण्ण होते आणि 'या युद्धाने काय साध्य होणार आहे?' असा विचार मनात येऊन युद्धातील प्रमुख योद्धा असलेल्या अर्जुनाने शस्त्रत्याग केला होता.
अर्जुनाला विषाद का झाला हे आपण पहिल्या अध्यायात पाहिले. दुःख आणि विषाद यात फरक आहे. मनुष्य अत्यंतिक दुःखात बुडून जातो आणि आपले कर्तव्य विसरतो तेव्हा त्याला विषाद म्हणतात. अशा अर्जुनाला जागृत करण्याचे काम भगवंतांवर येऊन पडले आहे आणि दुसऱ्या अध्यायापासून ते सुरू होते.
म्हणूनच भगवद्गीता म्हणजे विषण्ण जीवाला प्रसन्न करणारे शास्त्र आहे असे म्हणतात.
2.1
सञ्जय उवाच
तं(न्) तथा कृपयाविष्टम्, अश्रुपूर्णाकुलेक्षणम्।
विषीदन्तमिदं(व्ँ) वाक्यम्, उवाच मधुसूदनः॥2.1
संजय म्हणाला, अशा रीतीने करुणेने व्याप्त, ज्याचे डोळे आसवांनी भरलेले व व्याकुळ दिसत आहेत, अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले.
या श्लोकात अर्जुनाच्या स्थितीचे वर्णन करताना संजयने भगवंतांना मधुसूदन असे म्हटले आहे. याचे कारण भगवंतांनी 'मधू' नावाच्या दैत्याचा वध केला होता. हा शब्दप्रयोग करण्यामागे विशेष उद्देश आहे. अर्जुनाच्या मनात उत्पन्न झालेल्या मोहरूपी दैत्याचा वध भगवंत कसा करतात हे यापुढे भगवद्गीतेत पहावयास मिळते.
श्रीभगवानुवाच
कुतस्त्वा कश्मलमिदं(व्ँ), विषमे समुपस्थितम्।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यम्, अकीर्तिकरमर्जुन॥2.2॥
श्रीभगवान म्हणाले, हे अर्जुना! या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? कारण हा थोरांनी न आचरिलेला, स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही.
ह्या श्लोकापासून पुढे भगवंत बोलण्यास सुरुवात करतात. येथे 'श्रीभगवानुवाच' असा शब्दप्रयोग केलेला आहे. 'श्रीकृष्ण उवाच' किंवा 'वासुदेव उवाच' असा दुसरा कोणताही शब्दप्रयोग केलेला नाही. खरे तर श्रीमद्भगवद्गीता महाभारताचा एक भाग आहे. महाभारतात जिथे जिथे भगवंत बोलतात तिथे तिथे 'श्रीकृष्ण उवाच' किंवा 'वासुदेव उवाच' असे म्हटले आहे. अशावेळी 'भगवान' या शब्दाचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसः श्रीयः।
'वेदोऽखिलो धर्ममूलं |' म्हणजेच सर्व वेद हे धर्माचे मूळ आहेत असे म्हटले जाते.
हे कर्तव्यपालन केवळ मनुष्याप्रतीच असते असे नाही. आपली दृष्टी व्यापक करण्याचे काम भगवद्गीता करते. विश्वातील सर्व गोष्टी धर्माने, नीतीनियमांनी, बांधल्या गेल्या आहेत. ज्याप्रमाणे आपण नागरिक म्हणून राज्यघटनेच्या नियमांना बांधील असतो, त्याचप्रमाणे वेद ही सर्व विश्वाची घटना आहे. या घटनेला अनुसरून जो आपले कर्तव्य निभावतो त्याला धर्म म्हणतात.
भगवान श्रीरामांना 'रामो विग्रहवान् धर्मः |' असे म्हटले जाते म्हणजे श्रीराम हे धर्माचे मूर्त रूप आहेत. मनुष्यधर्म, राजधर्म जाणून घ्यायचा असेल तर भगवान श्रीरामांचे चरित्र अभ्यासले पाहिजे.
- श्री म्हणजे लक्ष्मी, संपत्ती आणि सौंदर्य.
- ज्ञान म्हणजे आत्मज्ञान.
तेराव्या अध्यायात म्हटले आहे -
अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम्।
एतज्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोन्यथा।।१३.१२।।
अध्यात्मज्ञानात नित्य स्थिती आणि तत्त्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्यालाच पाहणे हे सर्व ज्ञान होय आणि या उलट जे असेल, ते अज्ञान होय असे म्हटले आहे. 'मी कोण आहे?' याची अनुभूती ज्याने घेतली आहे तेच खरे ज्ञान होय.
- वैराग्य म्हणजे अनासक्ती.
भगवंतांच्या ठायी हे सर्व गुण असतात.
महाभारत युद्ध समाप्तीनंतर अर्जुनाने भगवंतांना भगवद्गीता परत ऐकवण्याची विनंती केली. तेव्हा भगवान म्हणाले,
"न शक्यं तन्मया भूयस्तथा वक्तुमशेषत:
ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसः श्रीयः।
ज्ञानवैराग्योश्चैव षण्णाम भगवान्नीह ।।
अर्थात, ऐश्वर्य, समग्र धर्म, समग्र यश, समग्र श्री, समग्र ज्ञान आणि समग्र वैराग्य -- या सहा गुणांचे नाव 'भग' आहे हे सहा गुण ज्याच्यामध्ये आहेत तोच भगवान आहे.
येथे धर्म म्हणजे नीती नियमांना अनुसरून केलेले कर्तव्यपालन. 'वेदोऽखिलो धर्ममूलं |' म्हणजेच सर्व वेद हे धर्माचे मूळ आहेत असे म्हटले जाते.
हे कर्तव्यपालन केवळ मनुष्याप्रतीच असते असे नाही. आपली दृष्टी व्यापक करण्याचे काम भगवद्गीता करते. विश्वातील सर्व गोष्टी धर्माने, नीतीनियमांनी, बांधल्या गेल्या आहेत. ज्याप्रमाणे आपण नागरिक म्हणून राज्यघटनेच्या नियमांना बांधील असतो, त्याचप्रमाणे वेद ही सर्व विश्वाची घटना आहे. या घटनेला अनुसरून जो आपले कर्तव्य निभावतो त्याला धर्म म्हणतात.
भगवान श्रीरामांना 'रामो विग्रहवान् धर्मः |' असे म्हटले जाते म्हणजे श्रीराम हे धर्माचे मूर्त रूप आहेत. मनुष्यधर्म, राजधर्म जाणून घ्यायचा असेल तर भगवान श्रीरामांचे चरित्र अभ्यासले पाहिजे.
- श्री म्हणजे लक्ष्मी, संपत्ती आणि सौंदर्य.
- ज्ञान म्हणजे आत्मज्ञान.
तेराव्या अध्यायात म्हटले आहे -
अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम्।
एतज्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोन्यथा।।१३.१२।।
अध्यात्मज्ञानात नित्य स्थिती आणि तत्त्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्यालाच पाहणे हे सर्व ज्ञान होय आणि या उलट जे असेल, ते अज्ञान होय असे म्हटले आहे. 'मी कोण आहे?' याची अनुभूती ज्याने घेतली आहे तेच खरे ज्ञान होय.
- वैराग्य म्हणजे अनासक्ती.
भगवंतांच्या ठायी हे सर्व गुण असतात.
महाभारत युद्ध समाप्तीनंतर अर्जुनाने भगवंतांना भगवद्गीता परत ऐकवण्याची विनंती केली. तेव्हा भगवान म्हणाले,
"न शक्यं तन्मया भूयस्तथा वक्तुमशेषत:
परं हि ब्रह्म कथितं योगयुक्तेन तन्मया।"
ते सर्वच्या सर्व त्याच रूपात परत सांगणे आता माझ्या हातात नाही त्यावेळी मी योगयुक्त होऊन परमात्मतत्त्वाचे वर्णन केले होते.
साक्षात परमात्म्यानेच श्रीकृष्णांच्या रूपात मूर्त होऊन भगवद्गीतेचे ज्ञान दिले आहे. म्हणूनच भगवद्गीतेत सर्वत्र 'श्रीभगवानुवाच' असे म्हटले आहे.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात की या विषमवेळी असे अज्ञानी विचार तुझ्या मनात कुठून उत्पन्न झाले? ही अनार्यता आहे. (आर्य म्हणजे श्रेष्ठ, सदाचारी, सज्जन व्यक्ती. याचा विरुद्धार्थी शब्द अनार्य आहे. आर्य या शब्दाची उत्पत्ती वेदांमध्ये आहे.) हे 'अस्वर्ग्यम्' आहे म्हणजे यामुळे तुला स्वर्गाची देखील प्राप्ती होणार नाही. तसेच हे अकीर्तिकारक आहे. ही मागणी इहलोकात तसेच परलोकातही अयोग्य आहे.
पुढील श्लोकात भगवंत अर्जुनाची चांगलीच कानउघाडणी करतात हा श्लोक स्वामी विवेकानंदांचा अत्यंत प्रिय असलेला श्लोक आहे.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात की या विषमवेळी असे अज्ञानी विचार तुझ्या मनात कुठून उत्पन्न झाले? ही अनार्यता आहे. (आर्य म्हणजे श्रेष्ठ, सदाचारी, सज्जन व्यक्ती. याचा विरुद्धार्थी शब्द अनार्य आहे. आर्य या शब्दाची उत्पत्ती वेदांमध्ये आहे.) हे 'अस्वर्ग्यम्' आहे म्हणजे यामुळे तुला स्वर्गाची देखील प्राप्ती होणार नाही. तसेच हे अकीर्तिकारक आहे. ही मागणी इहलोकात तसेच परलोकातही अयोग्य आहे.
पुढील श्लोकात भगवंत अर्जुनाची चांगलीच कानउघाडणी करतात हा श्लोक स्वामी विवेकानंदांचा अत्यंत प्रिय असलेला श्लोक आहे.
क्लैब्यं(म्) मा स्म गमः(फ्) पार्थ, नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं(म्) हृदयदौर्बल्यं(न्), त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप॥2.3॥
म्हणून हे पार्था! षंढपणा पत्करु नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा! अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा.
अर्जुनासारख्या श्रेष्ठ योद्धाला भगवान 'क्लैब्य' म्हणजे नपुंसक म्हणत आहेत. केवळ भगवान श्रीकृष्णच असे म्हणू शकतात.
येथे अर्जुनाला संबोधित करताना भगवान 'पार्थ' हा शब्दप्रयोग करतात. पार्थ म्हणजे पृथेचा; अर्थात, कुंतीचा पुत्र. हा शब्दप्रयोग करण्यामागे भगवंतांचा विशेष उद्देश आहे. कुंती ही श्रेष्ठ क्षत्रिय स्त्री होती. महाभारतयुद्धाला प्रारंभ होण्यापूर्वी कुंतीने भगवंतांच्या हस्ते पाचही पांडवांना निरोप पाठवला होता की ते सर्व युद्धात वीरगतीला प्राप्त झाले तरी मी वीरमाता म्हणून मिरवेन पण त्यांनी कुठल्याही परिस्थितीत रणांगण सोडून येता कामा नये. ही आठवण करून देण्यासाठी भगवान येथे पार्थ हा शब्दप्रयोग करत आहेत.
पुढे, 'परंतप' हे दुसरे संबोधन भगवान अर्जुनासाठी वापरतात याचा अर्थ 'शत्रूला ताप देणारा' असा होतो.
अर्जुनाचा आत्मविश्वास ढळलेला आहे. त्यामुळे त्याचे हृदय दुर्बल झाले आहे.
इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे,
If wealth is lost, nothing is lost, if health is lost, something is lost. If character is lost, everything is lost.
जर संपत्ती हरपली तर काहीच हरपले नाही, जर आरोग्य हरपले तर काहीतरी हरपले, परंतु जर शील हरपले तर मात्र सर्वस्व हरपले.
यालाच जोडून पूज्य स्वामीजी नेहमी म्हणतात,
If confidence is lost, everything is lost forever.
जर आत्मविश्वास हरपला तर सर्वस्व कायमस्वरूपी हरवले.
अर्जुनाचीही येथे अशीच अवस्था झाली होती. आत्मविश्वास हरवलेला मनुष्य जीवनात काहीच करू शकत नाही. अर्जुनाचे मोठेच सद्भाग्य की त्याच्या जवळ साक्षात भगवंत होते आणि त्यामुळे त्याचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळाला.
आपण सर्वांनीही चिंता करण्याचे कारण नाही, कारण जर आपला आत्मविश्वास हरवला, तर भगवंतांची वाड्मयीन मूर्ती असलेली भगवद्गीता आपल्याजवळ आहे.
'जयतु जयतु गीता, वाङ्मयी कृष्णमूर्ति:।' असे म्हणतात.
भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांची वाङ्मयी मूर्ति आहे म्हणजे वाङमयरुपाने साक्षात भगवंतच आपल्याजवळ आहेत. भगवद्गीता ज्याने वाचली, ज्याने समजून घेतली, ज्याने आचरणात आणली तसेच ज्याने दुसऱ्यांना शिकविली त्याचा आत्मविश्वास कधीही ढळत नाही म्हणूनच 'गीता पढ़ें, पढ़ायें, जीवन में लायें ॥' हे आचरणात आणले पाहिजे.
हनुमंतांनाही असा शाप मिळाला होता की ते आपली शक्ती विसरून जातील. समुद्र लंघून जात असताना हनुमंतांचा आत्मविश्वास ढळला होता. तेव्हा जांबुवंतांनी,
उत्तिष्ठ वनशार्दूलं लंघवस्य महार्णवम्|
हे वानरसिंहा, उठ आणि हा महासागर पार कर - असे म्हणून तो जागृत केला.
या श्लोकात भगवंत अर्जुनाला उठून युद्ध करण्यास सांगतात. यावेळी युद्ध करणे हे त्याचे कर्तव्य होते. म्हणून भगवंत त्याला युद्ध करण्यास सांगतात. आपल्या बाबतीत ज्या ज्या वेळी जे जे कर्तव्य असेल ते पार पडण्यासाठी आपण उठले पाहिजे. परंतु साक्षात भगवंतांनी 'उत्तिष्ठ' असे सांगितल्यानंतरही अर्जुन आपले कर्तव्य पार पडण्यासाठी सज्ज झाला नाही. अर्थात ही अर्जुनाची आपल्यावर मोठी कृपाच म्हटली पाहिजे. कारण अर्जुनाने भगवंतांना जीवनविषयक सर्व प्रश्न विचारले आणि भगवंतांनी त्याची सविस्तर उत्तरे दिली. त्यामुळे आपल्यालाही हे ज्ञान प्राप्त झाले.
येथे अर्जुनाला संबोधित करताना भगवान 'पार्थ' हा शब्दप्रयोग करतात. पार्थ म्हणजे पृथेचा; अर्थात, कुंतीचा पुत्र. हा शब्दप्रयोग करण्यामागे भगवंतांचा विशेष उद्देश आहे. कुंती ही श्रेष्ठ क्षत्रिय स्त्री होती. महाभारतयुद्धाला प्रारंभ होण्यापूर्वी कुंतीने भगवंतांच्या हस्ते पाचही पांडवांना निरोप पाठवला होता की ते सर्व युद्धात वीरगतीला प्राप्त झाले तरी मी वीरमाता म्हणून मिरवेन पण त्यांनी कुठल्याही परिस्थितीत रणांगण सोडून येता कामा नये. ही आठवण करून देण्यासाठी भगवान येथे पार्थ हा शब्दप्रयोग करत आहेत.
पुढे, 'परंतप' हे दुसरे संबोधन भगवान अर्जुनासाठी वापरतात याचा अर्थ 'शत्रूला ताप देणारा' असा होतो.
अर्जुनाचा आत्मविश्वास ढळलेला आहे. त्यामुळे त्याचे हृदय दुर्बल झाले आहे.
इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे,
If wealth is lost, nothing is lost, if health is lost, something is lost. If character is lost, everything is lost.
जर संपत्ती हरपली तर काहीच हरपले नाही, जर आरोग्य हरपले तर काहीतरी हरपले, परंतु जर शील हरपले तर मात्र सर्वस्व हरपले.
यालाच जोडून पूज्य स्वामीजी नेहमी म्हणतात,
If confidence is lost, everything is lost forever.
जर आत्मविश्वास हरपला तर सर्वस्व कायमस्वरूपी हरवले.
अर्जुनाचीही येथे अशीच अवस्था झाली होती. आत्मविश्वास हरवलेला मनुष्य जीवनात काहीच करू शकत नाही. अर्जुनाचे मोठेच सद्भाग्य की त्याच्या जवळ साक्षात भगवंत होते आणि त्यामुळे त्याचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळाला.
आपण सर्वांनीही चिंता करण्याचे कारण नाही, कारण जर आपला आत्मविश्वास हरवला, तर भगवंतांची वाड्मयीन मूर्ती असलेली भगवद्गीता आपल्याजवळ आहे.
'जयतु जयतु गीता, वाङ्मयी कृष्णमूर्ति:।' असे म्हणतात.
भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांची वाङ्मयी मूर्ति आहे म्हणजे वाङमयरुपाने साक्षात भगवंतच आपल्याजवळ आहेत. भगवद्गीता ज्याने वाचली, ज्याने समजून घेतली, ज्याने आचरणात आणली तसेच ज्याने दुसऱ्यांना शिकविली त्याचा आत्मविश्वास कधीही ढळत नाही म्हणूनच 'गीता पढ़ें, पढ़ायें, जीवन में लायें ॥' हे आचरणात आणले पाहिजे.
हनुमंतांनाही असा शाप मिळाला होता की ते आपली शक्ती विसरून जातील. समुद्र लंघून जात असताना हनुमंतांचा आत्मविश्वास ढळला होता. तेव्हा जांबुवंतांनी,
उत्तिष्ठ वनशार्दूलं लंघवस्य महार्णवम्|
हे वानरसिंहा, उठ आणि हा महासागर पार कर - असे म्हणून तो जागृत केला.
या श्लोकात भगवंत अर्जुनाला उठून युद्ध करण्यास सांगतात. यावेळी युद्ध करणे हे त्याचे कर्तव्य होते. म्हणून भगवंत त्याला युद्ध करण्यास सांगतात. आपल्या बाबतीत ज्या ज्या वेळी जे जे कर्तव्य असेल ते पार पडण्यासाठी आपण उठले पाहिजे. परंतु साक्षात भगवंतांनी 'उत्तिष्ठ' असे सांगितल्यानंतरही अर्जुन आपले कर्तव्य पार पडण्यासाठी सज्ज झाला नाही. अर्थात ही अर्जुनाची आपल्यावर मोठी कृपाच म्हटली पाहिजे. कारण अर्जुनाने भगवंतांना जीवनविषयक सर्व प्रश्न विचारले आणि भगवंतांनी त्याची सविस्तर उत्तरे दिली. त्यामुळे आपल्यालाही हे ज्ञान प्राप्त झाले.
अर्जुन उवाच
कथं(म्) भीष्ममहं(म्) सङ्ख्ये, द्रोणं(ञ्) च मधुसूदन।
इषुभिः(फ्) प्रति योत्स्यामि, पूजार्हावरिसूदन॥2.4॥
अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना! युद्धात मी भीष्मपितामहांच्या आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू? कारण हे अरिसूदना! ते दोघेही पूज्य आहेत.
अर्जुन हा श्रेष्ठ योद्धा होता. तो कृतज्ञ होता. त्याचे हृदय अतिशय कोमल होते. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर माऊलींनी अर्जुनाचे अतिशय सुंदर गुणवर्णन केले आहे.
तू अनुचित न चिंतीसी, रण केव्हाही न सोडिसी
अपयश पळे दशदिशांची, नाम तुझे ऐकता||
तू आधार शूर वृत्तीचा, मुकुटमणी क्षत्रियांचा
डंका तुझ्या पराक्रमाचा, त्रैलोक्यात वाजे||
अशा शूरवीर अर्जुनाच्या मनात करुणा जागृत झाली आहे. करुणेने त्याच्या मनात प्रवेश केल्यामुळे वीरश्री त्याला सोडून गेली. ज्ञानेश्वर माऊली यासाठी उपमा वापरतात की ज्याप्रमाणे एखादी श्रेष्ठ स्त्री; आपला पती दुसऱ्या स्त्रीला घेऊन आला आहे हे पाहताच घर सोडून निघून जाते, त्याचप्रमाणे करुणा प्रवेशल्यामुळे वीरश्री सोडून गेली.
सोळाव्या अध्यायात आपण दैवी संपत्तीचे वर्णन पाहिले. त्यात भगवंत अर्जुनाला म्हणतात,
मा शुचः सम्पदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव।।१६.५।।
तू शोक करू नकोस.कारण तू दैवी संपदा घेऊन जन्मला आहेस.
असा अर्जुन या श्लोकात श्रीकृष्णांना विचारतो की एक माझे आजोबा आहेत आणि एक माझे गुरु आहेत. हे दोघेही मला पूजनीय आहेत. मग मी त्यांच्यावर बाण चालवण्याचे पाप कसे करू? भावाची हत्या करणे, प्रत्यक्ष स्वतःच्या वडिलांना तुरुंगात टाकणे अशी अनेक पापे करणारा औरंगजेब आयुष्याच्या शेवटी पश्चात्तापदग्ध झाला आणि ते त्याने त्याच्या दैनंदिनीमध्ये लिहून ठेवले आहे. त्याच्यासारखा क्रूरकर्मा शेवटी पश्चात्ताप पावतो. अर्जुन तर कोमल हृदयाचा होता. त्यामुळे त्याच्या मनात विषाद उत्पन्न होणे सहाजिक होते.
तू अनुचित न चिंतीसी, रण केव्हाही न सोडिसी
अपयश पळे दशदिशांची, नाम तुझे ऐकता||
तू आधार शूर वृत्तीचा, मुकुटमणी क्षत्रियांचा
डंका तुझ्या पराक्रमाचा, त्रैलोक्यात वाजे||
अशा शूरवीर अर्जुनाच्या मनात करुणा जागृत झाली आहे. करुणेने त्याच्या मनात प्रवेश केल्यामुळे वीरश्री त्याला सोडून गेली. ज्ञानेश्वर माऊली यासाठी उपमा वापरतात की ज्याप्रमाणे एखादी श्रेष्ठ स्त्री; आपला पती दुसऱ्या स्त्रीला घेऊन आला आहे हे पाहताच घर सोडून निघून जाते, त्याचप्रमाणे करुणा प्रवेशल्यामुळे वीरश्री सोडून गेली.
सोळाव्या अध्यायात आपण दैवी संपत्तीचे वर्णन पाहिले. त्यात भगवंत अर्जुनाला म्हणतात,
मा शुचः सम्पदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव।।१६.५।।
तू शोक करू नकोस.कारण तू दैवी संपदा घेऊन जन्मला आहेस.
असा अर्जुन या श्लोकात श्रीकृष्णांना विचारतो की एक माझे आजोबा आहेत आणि एक माझे गुरु आहेत. हे दोघेही मला पूजनीय आहेत. मग मी त्यांच्यावर बाण चालवण्याचे पाप कसे करू? भावाची हत्या करणे, प्रत्यक्ष स्वतःच्या वडिलांना तुरुंगात टाकणे अशी अनेक पापे करणारा औरंगजेब आयुष्याच्या शेवटी पश्चात्तापदग्ध झाला आणि ते त्याने त्याच्या दैनंदिनीमध्ये लिहून ठेवले आहे. त्याच्यासारखा क्रूरकर्मा शेवटी पश्चात्ताप पावतो. अर्जुन तर कोमल हृदयाचा होता. त्यामुळे त्याच्या मनात विषाद उत्पन्न होणे सहाजिक होते.
गुरूनहत्वा हि महानुभावान्,
श्रेयो भोक्तुं(म्) भैक्ष्यमपीह लोके।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव,
भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्॥2.5॥
म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना मारुनही या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरुप भोगच ना भोगावयाचे!
भगवद्गीता खऱ्या अर्थाने समजून घ्यायची असेल तर अर्जुनाच्या भूमिकेत जाऊन ती समजून घेतली पाहिजे. आपल्याच नातेवाईकांना, गुरुजनांना मारून मिळालेले रक्तलांछित राज्यभोग त्याला नको आहे.
ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
मी अर्जुन शिष्य द्रोणाचा, हा गुरु माझा धनुर्विद्येचा |
तो उपकार काय त्यांचा, वध करून फेडू मी?
मी अर्जुन द्रोणांचा शिष्य आहे. द्रोणाचार्य माझे धनुर्विद्येचे गुरु आहेत. त्यांचे माझ्यावर असलेले उपकार मी त्यांचा वध करून फेडू का?
त्यांच्या कृपेच्या वरावर, त्यांच्यावरच कराया अपकार |
मी का आहे भस्मासुर, अर्जुन म्हणे||
अर्जुन म्हणतो, ज्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यायची, त्यांच्यावरच उलटायला मी काय भस्मासुर आहे का?
भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आहे, तर ज्ञानेश्वरीत त्या दोघांचा एकमेकांच्या अंतरंगाशी चाललेला संवाद सांगितला आहे. भगवंतांच्या आणि अर्जुनाच्या मनातील विचार ज्ञानेश्वर माऊली लिहितात. कारण ते तेथे प्रत्यक्ष उपस्थित होते.
श्रीकृष्णांना इकडे तिकडे बघत असलेले पाहून अर्जुनाच्या लक्षात आले की आपले बोलणे त्यांना आवडलेले नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराज लिहितात,
त्यावेळी अर्जुन, म्हणे श्रीकृष्ण द्यावे ध्यान |
परि ते सर्व ऐकून, रुचले नाही कृष्णा||
अर्जुन श्रीकृष्णांना 'आपले बोलणे ऐकावे' असे सांगतो. परंतु त्याचे बोलणे श्रीकृष्णांना रुचले नाही.
हे जाणून अर्जुन भ्याला, मग पुनरपीही बोलू लागला
म्हणे देवा माझ्या बोला, दुर्लक्ष का करावे?
हे जाणून अर्जुन भ्याला. पण मग परत बोलू लागला. तो म्हणाला, "देवा आपण माझ्या बोलण्याकडे लक्ष का बरे देत नाही?"
आपले काहीतरी चुकत आहे याची जाणीव अर्जुनाला झाली. असे काहीतरी आहे की जे आपल्याला समजत नाही हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे अर्जुनाची भाषा बदलली.
ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
मी अर्जुन शिष्य द्रोणाचा, हा गुरु माझा धनुर्विद्येचा |
तो उपकार काय त्यांचा, वध करून फेडू मी?
मी अर्जुन द्रोणांचा शिष्य आहे. द्रोणाचार्य माझे धनुर्विद्येचे गुरु आहेत. त्यांचे माझ्यावर असलेले उपकार मी त्यांचा वध करून फेडू का?
त्यांच्या कृपेच्या वरावर, त्यांच्यावरच कराया अपकार |
मी का आहे भस्मासुर, अर्जुन म्हणे||
अर्जुन म्हणतो, ज्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यायची, त्यांच्यावरच उलटायला मी काय भस्मासुर आहे का?
भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आहे, तर ज्ञानेश्वरीत त्या दोघांचा एकमेकांच्या अंतरंगाशी चाललेला संवाद सांगितला आहे. भगवंतांच्या आणि अर्जुनाच्या मनातील विचार ज्ञानेश्वर माऊली लिहितात. कारण ते तेथे प्रत्यक्ष उपस्थित होते.
श्रीकृष्णांना इकडे तिकडे बघत असलेले पाहून अर्जुनाच्या लक्षात आले की आपले बोलणे त्यांना आवडलेले नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराज लिहितात,
त्यावेळी अर्जुन, म्हणे श्रीकृष्ण द्यावे ध्यान |
परि ते सर्व ऐकून, रुचले नाही कृष्णा||
अर्जुन श्रीकृष्णांना 'आपले बोलणे ऐकावे' असे सांगतो. परंतु त्याचे बोलणे श्रीकृष्णांना रुचले नाही.
हे जाणून अर्जुन भ्याला, मग पुनरपीही बोलू लागला
म्हणे देवा माझ्या बोला, दुर्लक्ष का करावे?
हे जाणून अर्जुन भ्याला. पण मग परत बोलू लागला. तो म्हणाला, "देवा आपण माझ्या बोलण्याकडे लक्ष का बरे देत नाही?"
आपले काहीतरी चुकत आहे याची जाणीव अर्जुनाला झाली. असे काहीतरी आहे की जे आपल्याला समजत नाही हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे अर्जुनाची भाषा बदलली.
न चैतद्विद्मः(ख्) कतरन्नो गरीयो,
यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः।
यानेव हत्वा न जिजीविषाम:(स्),
तेऽवस्थिताः(फ्) प्रमुखे धार्तराष्ट्राः॥2.6॥
युद्ध करणे व न करणे या दोहोंपैकी आम्हांला काय श्रेष्ठ आहे, हे कळत नाही. किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हांला जिंकतील, हेही आम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना मारुन आम्हांला जगण्याचीही इच्छा नाही, तेच आमचे बांधव-धृतराष्ट्रपुत्र आमच्या विरुद्ध उभे आहेत.
मनुष्याला जीवनात ज्ञानप्राप्ती करून घ्यायची असेल तर सर्वप्रथम त्याने हे ध्यानात घेतले पाहिजे की असे काहीतरी आहे जे मला माहित नाही. ज्ञानप्राप्तीची ही पहिली पायरी आहे. मला सर्व काही समजते असे जो म्हणतो त्याला कधीच ज्ञान प्राप्त होत नाही. इथे अर्जुनाला ही गोष्ट समजू लागली आहे.
अर्जुनामध्ये झालेल्या या परिवर्तनामुळे पुढील श्लोकात अर्जुन भगवंतांकडे काहीतरी याचना करू लागतो.
अर्जुनामध्ये झालेल्या या परिवर्तनामुळे पुढील श्लोकात अर्जुन भगवंतांकडे काहीतरी याचना करू लागतो.
कार्पण्यदोषोपहतस्वभावः(फ्),
पृच्छामि त्वां(न्) धर्मसम्मूढचेताः।
यच्छ्रेयः(स्) स्यान्निश्चितं(म्) ब्रूहि तन्मे,
शिष्यस्तेऽहं(म्) शाधि मां(न्) त्वां(म्) प्रपन्नम्॥2.7॥
करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हांला विचारीत आहे की, जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे, ते मला सांगा. कारण मी तुमचा शिष्य आहे. म्हणून तुम्हांला शरण आलेल्या मला उपदेश करा.
भगवद्गीतेतील अत्यंत महत्त्वाचा हा श्लोक आहे. येथे अर्जुन भगवंतांकडे आपल्यासाठी कल्याणकारक असलेल्या साधनाबद्दल विचारणा करतो.
समर्थ रामदास स्वामींनी प्रभू श्रीरामांकडे अशीच एक भिक्षा मागितली. मूळ मराठीत असलेल्या या कवनाचा गुरुदेवांनी अतिशय सुंदर हिंदी अनुवाद केला आहे.
हितकारक वो दे दो राम, जन सुखकारक दे दो राम|
अनन्य सेवा दे दो राम पूर्ण समर्पण दे दो राम|
मैं न जानू वह दे दो राम|
हे श्रीरामा, माझ्यासाठी जे जे हितकारक आहे ते मला दे. सर्व लोकांसाठी सुखकारक ज्या गोष्टी असतील त्या मला दे. अनन्य सेवा मला दे. पूर्ण समर्पण मला दे. मी जे जाणत नाही तेही मला दे. माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे ते मला माहित नाही. ते तू चांगलेच जाणतोस आणि तेच मला दे.
या श्लोकात अर्जुनही भगवंतांकडे असेच काहीसे मागत आहे. अर्जुन म्हणतो की माझे कल्याण कशात आहे ते मला माहित नाही. मी अज्ञानी आहे, पण आपण सर्वज्ञ आहात. माझ्यासाठी कल्याणकारक काय आहे ते आपण मला सांगावे.
हा श्लोक म्हणजे भगवद्गीतेची किल्ली म्हणावी लागेल. कारण या श्लोकानंतर भगवंतांनी आपले संपूर्ण अंतरंग उघडून अर्जुनाला उपदेश करण्यास प्रारंभ केला. जणू काही भगवंत अर्जुनाला उपदेश करण्यास बाध्य झाले.
अर्जुनाने भगवंतांचे शिष्यत्व पत्करले. शिष्य म्हणजे 'शौचनात् शिष्य:', 'शासनात् शिष्य:'- ज्याला शिकवले जाते तो शिष्य होय. ज्याच्यावर गुरुचे शासन चालते तो शिष्य आहे. शिष्याने गुरुआज्ञेचे पालन करणे अपेक्षित आहे.
खरे तर, व्यवहारात अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण एकमेकांची आत्ये-मामे भावंडे आहेत. ते एकमेकांचे मित्रही आहेत. त्यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. या प्रेमापोटीच अर्जुनाने युद्धाच्या वेळी भगवंतांची सेना न मागता भगवंतांना मागून घेतले. भगवंत आपल्याला अनेक गोष्टी देऊ शकतात परंतु त्यांच्याकडे काय मागायचे हेही समजले पाहिजे. अन्य काहीही न मागता केवळ भगवंतांनाच मागून घेतले पाहिजे. याच महत्त्वाच्या गोष्टीमुळे अर्जुनाचा विजय झाला.
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।१८.७८।।
जिथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे, तेथेच श्री, विजय, विभूती आणि अचल नीती आहे, असे माझे मत आहे असे संजयने गीतोपदेशाच्या अखेरीस म्हणूनच म्हटले आहे.
अर्जुनाने भगवंतांपुढे संपूर्ण शरणागती पत्करली. त्याचे हे भाषण ऐकल्यानंतर भगवंतांनी अर्जुनाला उपदेश करण्यास सुरुवात केली.
समर्थ रामदास स्वामींनी प्रभू श्रीरामांकडे अशीच एक भिक्षा मागितली. मूळ मराठीत असलेल्या या कवनाचा गुरुदेवांनी अतिशय सुंदर हिंदी अनुवाद केला आहे.
हितकारक वो दे दो राम, जन सुखकारक दे दो राम|
अनन्य सेवा दे दो राम पूर्ण समर्पण दे दो राम|
मैं न जानू वह दे दो राम|
हे श्रीरामा, माझ्यासाठी जे जे हितकारक आहे ते मला दे. सर्व लोकांसाठी सुखकारक ज्या गोष्टी असतील त्या मला दे. अनन्य सेवा मला दे. पूर्ण समर्पण मला दे. मी जे जाणत नाही तेही मला दे. माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे ते मला माहित नाही. ते तू चांगलेच जाणतोस आणि तेच मला दे.
या श्लोकात अर्जुनही भगवंतांकडे असेच काहीसे मागत आहे. अर्जुन म्हणतो की माझे कल्याण कशात आहे ते मला माहित नाही. मी अज्ञानी आहे, पण आपण सर्वज्ञ आहात. माझ्यासाठी कल्याणकारक काय आहे ते आपण मला सांगावे.
हा श्लोक म्हणजे भगवद्गीतेची किल्ली म्हणावी लागेल. कारण या श्लोकानंतर भगवंतांनी आपले संपूर्ण अंतरंग उघडून अर्जुनाला उपदेश करण्यास प्रारंभ केला. जणू काही भगवंत अर्जुनाला उपदेश करण्यास बाध्य झाले.
अर्जुनाने भगवंतांचे शिष्यत्व पत्करले. शिष्य म्हणजे 'शौचनात् शिष्य:', 'शासनात् शिष्य:'- ज्याला शिकवले जाते तो शिष्य होय. ज्याच्यावर गुरुचे शासन चालते तो शिष्य आहे. शिष्याने गुरुआज्ञेचे पालन करणे अपेक्षित आहे.
खरे तर, व्यवहारात अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण एकमेकांची आत्ये-मामे भावंडे आहेत. ते एकमेकांचे मित्रही आहेत. त्यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. या प्रेमापोटीच अर्जुनाने युद्धाच्या वेळी भगवंतांची सेना न मागता भगवंतांना मागून घेतले. भगवंत आपल्याला अनेक गोष्टी देऊ शकतात परंतु त्यांच्याकडे काय मागायचे हेही समजले पाहिजे. अन्य काहीही न मागता केवळ भगवंतांनाच मागून घेतले पाहिजे. याच महत्त्वाच्या गोष्टीमुळे अर्जुनाचा विजय झाला.
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।१८.७८।।
जिथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे, तेथेच श्री, विजय, विभूती आणि अचल नीती आहे, असे माझे मत आहे असे संजयने गीतोपदेशाच्या अखेरीस म्हणूनच म्हटले आहे.
अर्जुनाने भगवंतांपुढे संपूर्ण शरणागती पत्करली. त्याचे हे भाषण ऐकल्यानंतर भगवंतांनी अर्जुनाला उपदेश करण्यास सुरुवात केली.
न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्,
यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं(म्),
राज्यं(म्) सुराणामपि चाधिपत्यम्॥2.8॥
कारण, पृथ्वीचे शत्रुरहित व धन-धान्यसमृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले, तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करु शकेल, असा उपाय मला दिसत नाही.
अर्जुन अत्यंत शोकाकुल आहे. त्याच्या शोकाकुल अवस्थेचे वर्णन पहिल्या अध्यायात केले गेले आहे.
सञ्जय उवाच
एवमुक्त्वा हृषीकेशं(ङ्), गुडाकेशः(फ्) परन्तप।
न योत्स्य इति गोविन्दम्, उक्त्वा तूष्णीं(म्) बभूव ह॥2.9॥
संजय म्हणाला, हे राजा! निद्रेवर ताबा असलेल्या अर्जुनाने अन्तर्यामी श्रीकृष्णाला एवढे बोलून 'मी युद्ध करणार नाही' असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला.
या श्लोकामध्ये अर्जुनासाठी 'गुडाकेश' हा शब्द वापरला आहे याचा अर्थ होतो 'निद्रेचा स्वामी'. अर्जुनाचे त्याच्या निद्रेवर संपूर्ण नियंत्रण होते. तो पाहिजे तेव्हा जागू अथवा झोपू शकत होता. परंतु असा अर्जुनही येथे मोहनिद्रेने ग्रस्त झाला.
तमुवाच हृषीकेशः(फ्), प्रहसन्निव भारत।
सेनयोरुभयोर्मध्ये, विषीदन्तमिदं(व्ँ) वचः॥2.10॥
हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज! अन्तर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करुन असे म्हणाले.
भगवान इथून पुढे अर्जुनाला उपदेश करण्यास प्रारंभ करतात. ते हसतमुख आणि प्रसन्न चेहऱ्याने अर्जुनाशी बोलण्यास सुरुवात करतात. अर्जुनाने संपूर्ण शरणागती पत्करल्यानंतर, त्यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर तसेच त्याचे सर्व बोलणे पूर्ण झाल्यानंतरच भगवंत त्यांचे बोलणे सुरु करतात. या दृष्टीने भगवंत एक उत्तम समुपदेशक आहेत.
भुकेल्याला न मागता जेवण देणे, आजारी रुग्णाला न मागता औषधोपचार देणे हा धर्म आहे. परंतु उपदेशाच्या बाबतीत तसे नाही. जोपर्यंत कोणी विचारत नाही तोपर्यंत उपदेश करू नये असे सांगितले जाते.
अठराव्या अध्यायात भगवंत अर्जुनाला सांगतात,
न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति।।18.67।।
(हा गीता रूप रहस्यमय उपदेश) ऐकण्याची इच्छा नसणाऱ्याला सांगू नये. त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधीही सांगू नये.
म्हणूनच भगवद्गीतेतील उपदेश इतकी वर्षे गोपनीय राहिला. कारण जोपर्यंत भगवंतांची कृपा होत नाही तोपर्यंत भगवद्गीता वाचण्याची इच्छा होत नाही आणि जोपर्यंत भगवद्गीता वाचली जात नाही तोपर्यंत भगवंतांचा उपदेश प्राप्त होत नाही.
काही जण म्हणतात की दुसऱ्या अध्यायातील या श्लोकापासूनच भगवद्गीतेची खरी सुरुवात झाली आहे. भगवंतांचे गीत येथूनच पुढे सुरू होते. परंतु ते सुरू होण्यापूर्वी अर्जुनाची काय अवस्था होती, ती समजण्यासाठी आधीचे श्लोक समजणे आवश्यक आहेत.
आज एकादशीच्या शुभ पर्वावर भगवंतांचा हा उपदेश वाचण्यास आपण सुरुवात करत आहोत ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे.
भुकेल्याला न मागता जेवण देणे, आजारी रुग्णाला न मागता औषधोपचार देणे हा धर्म आहे. परंतु उपदेशाच्या बाबतीत तसे नाही. जोपर्यंत कोणी विचारत नाही तोपर्यंत उपदेश करू नये असे सांगितले जाते.
अठराव्या अध्यायात भगवंत अर्जुनाला सांगतात,
न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति।।18.67।।
(हा गीता रूप रहस्यमय उपदेश) ऐकण्याची इच्छा नसणाऱ्याला सांगू नये. त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधीही सांगू नये.
म्हणूनच भगवद्गीतेतील उपदेश इतकी वर्षे गोपनीय राहिला. कारण जोपर्यंत भगवंतांची कृपा होत नाही तोपर्यंत भगवद्गीता वाचण्याची इच्छा होत नाही आणि जोपर्यंत भगवद्गीता वाचली जात नाही तोपर्यंत भगवंतांचा उपदेश प्राप्त होत नाही.
काही जण म्हणतात की दुसऱ्या अध्यायातील या श्लोकापासूनच भगवद्गीतेची खरी सुरुवात झाली आहे. भगवंतांचे गीत येथूनच पुढे सुरू होते. परंतु ते सुरू होण्यापूर्वी अर्जुनाची काय अवस्था होती, ती समजण्यासाठी आधीचे श्लोक समजणे आवश्यक आहेत.
आज एकादशीच्या शुभ पर्वावर भगवंतांचा हा उपदेश वाचण्यास आपण सुरुवात करत आहोत ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे.
श्रीभगवानुवाच
अशोच्यानन्वशोचस्त्वं(म्), प्रज्ञावादांश्च भाषसे।
गतासूनगतासूंश्च, नानुशोचन्ति पण्डिता:॥2.11॥
श्रीभगवान् म्हणाले, हे अर्जुना! तू ज्यांचा शोक करु नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस. परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत, त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करीत नाहीत.
या श्लोकात भगवंतांनी 'प्रज्ञावाद' असा शब्दप्रयोग केला आहे. 'प्रज्ञावाद' आणि 'प्रज्ञानिष्ठ' या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ज्याला आपण बुद्धीवाद आणि बुद्धिनिष्ठ असे म्हणू शकतो. मनुष्याने बुद्धीनिष्ठ असले पाहिजे बुद्धिवादी नव्हे. आपल्याला विवाद करण्यासाठी बुद्धी मिळालेली नाही तर श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्याला जाणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे बुद्धीनिष्ठा आहे.
या श्लोकातील 'पंडित' या शब्दाचा अर्थ आत्मज्ञान प्राप्त झालेली व्यक्ती असा आहे. 'बुद्धीर्यस्य आत्मविक्षिक: स पण्डित:' असे म्हणतात.
ज्याप्रमाणे कोणत्याही रोगाचे मुळापासून निराकरण होणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे येथेही भगवंत अर्जुनाच्या मनातील अज्ञान आणि मोहाच्या अंध:काराचे मुळापासून निराकरण करतात. पुढे भगवंत अर्जुनाला 'अंतिम सत्य काय आहे' हे मुख्य ज्ञान सर्वप्रथम सांगतात. कारण हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बाकीच्या अनेक गोष्टी आपोआप समजतात.
या श्लोकातील 'पंडित' या शब्दाचा अर्थ आत्मज्ञान प्राप्त झालेली व्यक्ती असा आहे. 'बुद्धीर्यस्य आत्मविक्षिक: स पण्डित:' असे म्हणतात.
ज्याप्रमाणे कोणत्याही रोगाचे मुळापासून निराकरण होणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे येथेही भगवंत अर्जुनाच्या मनातील अज्ञान आणि मोहाच्या अंध:काराचे मुळापासून निराकरण करतात. पुढे भगवंत अर्जुनाला 'अंतिम सत्य काय आहे' हे मुख्य ज्ञान सर्वप्रथम सांगतात. कारण हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बाकीच्या अनेक गोष्टी आपोआप समजतात.
न त्वेवाहं(ञ्) जातु नासं(न्), न त्वं(न्) नेमे जनाधिपाः।
न चैव न भविष्यामः(स्), सर्वे वयमतः(फ्) परम्॥2.12॥
मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते असेही नाही आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही, असेही नाही.
मी कोण आहे हे समजून घेण्यासाठी या श्लोकात सांगितलेले चिरंतन सत्य समजणे आवश्यक आहे.
देहिनोऽस्मिन्यथा देहे, कौमारं(य्ँ) यौवनं(ञ्) जरा।
तथा देहान्तरप्राप्ति:(र्), धीरस्तत्र न मुह्यति॥2.13॥
ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य येते, त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही
एकाच व्यक्तीच्या शरीराच्या बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य अशा तीनही अवस्था असतात. परंतु या शरीरातील 'मी' बदलत नाही. त्याचप्रमाणे देह सोडल्यानंतरही हा 'मी' दुसऱ्या देहात प्रवेश करतो. हे समजल्यामुळे ज्ञानी मनुष्य कधीही मोहित होत नाही.
भगवद्गीता हे योगशास्त्र आहे. कुठल्याही शास्त्रात काहीतरी उद्देशासाठी प्रात्यक्षिके केली जातात. त्याचप्रमाणे येथे 'मी कोण आहे? ते जाणून घेणे, मी शरीर नाही; तर आत्मतत्त्व आहे हे समजून घेणे' हा या शास्त्राचा उद्देश आहे. यासाठी काही उपकरणे लागतील. काही कृती करावी लागेल. हे प्रात्यक्षिक केल्यानंतर आपल्याला शेवटी काहीतरी निष्कर्ष मिळेल. भगवद्गीता शिकण्याचा हाच उद्देश आहे.
आजचे विवेचन येथेच समाप्त झाले.
प्रश्न उत्तरे
सुधा दीदी- ध्यान करताना कशा पद्धतीने करावे? सगुणरूपाचे ध्यान करणे उत्तम की निर्गुणरूपाचे?
उत्तर - भगवंतांनी बाराव्या अध्यायात हे स्पष्ट केले आहे की सगुण साकाराचे ध्यान करणे हे सर्वात उत्तम आहे.
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते।
श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः॥॥१२- २॥
माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजनात, ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुणरूप परमेश्वराला भजतात ते मला योग्यांमधील अति उत्तम योगी वाटतात.
निर्गुण निराकाराचे ध्यान करणेही श्रेष्ठ आहे. परंतु ते फार कठीण आहे. रमण महर्षी म्हणत जोपर्यंत शरीराला भूक लागते तोपर्यंत आपण सगुण साकाराची उपासना करू शकतो. जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत सगुण साकार उपासना योग्य आहे.
सुरेश भैय्या- मोह वाईट गोष्ट आहे का? आपल्या मुलाबद्दल प्रेम असणे चुकीचे आहे का?
उत्तर - मोह म्हणजे प्रेम नाही. मोह याचा अर्थ अज्ञान. मुलांवर, आप्तस्वकीयांवर प्रेम असावे परंतु आसक्ती नसावी. हे सर्व सोडून आपल्याला एक दिवस जायचे आहे ही भावना सतत मनात असावी.
यादृष्टीने 'वसुधैव कुटुंबकम्' याबद्दल तुम्ही काय सांगाल?
उत्तर - यासाठी प्रथम मी व माझे कुटुंब, मग माझा समाज, त्यानंतर देश आणि त्यानंतर हे संपूर्ण जग माझे एकच कुटुंब आहे अशी टप्प्याटप्प्याने दृष्टी विकसित केली पाहिजे.
दोन भावांमध्ये संपत्तीचा विवाद आहे आणि त्यानंतर एका भावाने संपत्तीवरील हक्क सोडला तर त्याने चुकीचे केले का?
उत्तर - याबद्दल महाराष्ट्रातील एका संतांचे उदाहरण उत्तम आहे. त्यांचा त्यांच्या भावाशी मालमत्तेवरून विवाद होता. कोर्टात गेल्यावर ते भावासाठीही डबा घेऊन जात. जेव्हा सुट्टी होई तेव्हा भावालाही जेवायला देत. संत म्हणवून घेत असूनही भावाशी कोर्टात भांडण्यावरून काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली. तेव्हा ते म्हणाले की ही व्यावहारिक गोष्ट आहे आणि त्यांनी खटला मागे घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी खटला जिंकला आणि मिळालेली सर्व संपत्ती भावाला दान दिली.
म्हणजे व्यवहार आणि कर्तव्य यात अंतर राखले पाहिजे.
गीता दीदी- मी गीताव्रती परीक्षा पास झाले परंतु तरीही माझ्या मनातील अहंकार गेला नाही तर त्याचा काय उपयोग?
उत्तर - आपला अहंकार, आपली देहबुद्धी ही सहजासहजी जात नाही. मला अहंकार नाही याचाही अहंकार येतो. गीताव्रती झाल्यावर 'मी गीताव्रती झालो/ झाले' हा ही अहंकार येऊ शकतो. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सांगितले त्याप्रमाणे आपली सर्व कर्तव्य र्मे करून ती आणि त्याचे फळ भगवंताला अर्पण केल्याने अहंकार हळूहळू नाहीसा हो शकतो.
श्रद्धा दीदी मरणासन्न अवस्थेत भगवद्गीतेच्या कोणत्या अध्यायाचा पाठ केला पाहिजे?
उत्तर - पंधराव्या अध्यायाचा पाठ केला पाहिजे.
सत्यपाल भैय्या - देहामध्ये आत्म्याचे स्थान कुठे असते?
उत्तर - आत्म्याचे कोणते एक विशेष स्थान नाही. आत्मा सर्वत्र असतो. देह वेगवेगळे असले तरी सर्वत्र एकच आत्मतत्त्व वास करून राहते. एका देहाशी जोडले गेलेले जे आत्मतत्त्व असते त्याला जीवात्मा म्हणतात.
यानंतर समापन प्रार्थना तसेच हनुमान चालीसा म्हणून विवेचन सत्राची सांगता झाली.
।।श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
भगवद्गीता हे योगशास्त्र आहे. कुठल्याही शास्त्रात काहीतरी उद्देशासाठी प्रात्यक्षिके केली जातात. त्याचप्रमाणे येथे 'मी कोण आहे? ते जाणून घेणे, मी शरीर नाही; तर आत्मतत्त्व आहे हे समजून घेणे' हा या शास्त्राचा उद्देश आहे. यासाठी काही उपकरणे लागतील. काही कृती करावी लागेल. हे प्रात्यक्षिक केल्यानंतर आपल्याला शेवटी काहीतरी निष्कर्ष मिळेल. भगवद्गीता शिकण्याचा हाच उद्देश आहे.
आजचे विवेचन येथेच समाप्त झाले.
प्रश्न उत्तरे
सुधा दीदी- ध्यान करताना कशा पद्धतीने करावे? सगुणरूपाचे ध्यान करणे उत्तम की निर्गुणरूपाचे?
उत्तर - भगवंतांनी बाराव्या अध्यायात हे स्पष्ट केले आहे की सगुण साकाराचे ध्यान करणे हे सर्वात उत्तम आहे.
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते।
श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः॥॥१२- २॥
माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजनात, ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुणरूप परमेश्वराला भजतात ते मला योग्यांमधील अति उत्तम योगी वाटतात.
निर्गुण निराकाराचे ध्यान करणेही श्रेष्ठ आहे. परंतु ते फार कठीण आहे. रमण महर्षी म्हणत जोपर्यंत शरीराला भूक लागते तोपर्यंत आपण सगुण साकाराची उपासना करू शकतो. जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत सगुण साकार उपासना योग्य आहे.
सुरेश भैय्या- मोह वाईट गोष्ट आहे का? आपल्या मुलाबद्दल प्रेम असणे चुकीचे आहे का?
उत्तर - मोह म्हणजे प्रेम नाही. मोह याचा अर्थ अज्ञान. मुलांवर, आप्तस्वकीयांवर प्रेम असावे परंतु आसक्ती नसावी. हे सर्व सोडून आपल्याला एक दिवस जायचे आहे ही भावना सतत मनात असावी.
यादृष्टीने 'वसुधैव कुटुंबकम्' याबद्दल तुम्ही काय सांगाल?
उत्तर - यासाठी प्रथम मी व माझे कुटुंब, मग माझा समाज, त्यानंतर देश आणि त्यानंतर हे संपूर्ण जग माझे एकच कुटुंब आहे अशी टप्प्याटप्प्याने दृष्टी विकसित केली पाहिजे.
दोन भावांमध्ये संपत्तीचा विवाद आहे आणि त्यानंतर एका भावाने संपत्तीवरील हक्क सोडला तर त्याने चुकीचे केले का?
उत्तर - याबद्दल महाराष्ट्रातील एका संतांचे उदाहरण उत्तम आहे. त्यांचा त्यांच्या भावाशी मालमत्तेवरून विवाद होता. कोर्टात गेल्यावर ते भावासाठीही डबा घेऊन जात. जेव्हा सुट्टी होई तेव्हा भावालाही जेवायला देत. संत म्हणवून घेत असूनही भावाशी कोर्टात भांडण्यावरून काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली. तेव्हा ते म्हणाले की ही व्यावहारिक गोष्ट आहे आणि त्यांनी खटला मागे घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी खटला जिंकला आणि मिळालेली सर्व संपत्ती भावाला दान दिली.
म्हणजे व्यवहार आणि कर्तव्य यात अंतर राखले पाहिजे.
गीता दीदी- मी गीताव्रती परीक्षा पास झाले परंतु तरीही माझ्या मनातील अहंकार गेला नाही तर त्याचा काय उपयोग?
उत्तर - आपला अहंकार, आपली देहबुद्धी ही सहजासहजी जात नाही. मला अहंकार नाही याचाही अहंकार येतो. गीताव्रती झाल्यावर 'मी गीताव्रती झालो/ झाले' हा ही अहंकार येऊ शकतो. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सांगितले त्याप्रमाणे आपली सर्व कर्तव्य र्मे करून ती आणि त्याचे फळ भगवंताला अर्पण केल्याने अहंकार हळूहळू नाहीसा हो शकतो.
श्रद्धा दीदी मरणासन्न अवस्थेत भगवद्गीतेच्या कोणत्या अध्यायाचा पाठ केला पाहिजे?
उत्तर - पंधराव्या अध्यायाचा पाठ केला पाहिजे.
सत्यपाल भैय्या - देहामध्ये आत्म्याचे स्थान कुठे असते?
उत्तर - आत्म्याचे कोणते एक विशेष स्थान नाही. आत्मा सर्वत्र असतो. देह वेगवेगळे असले तरी सर्वत्र एकच आत्मतत्त्व वास करून राहते. एका देहाशी जोडले गेलेले जे आत्मतत्त्व असते त्याला जीवात्मा म्हणतात.
यानंतर समापन प्रार्थना तसेच हनुमान चालीसा म्हणून विवेचन सत्राची सांगता झाली.
।।श्रीकृष्णार्पणमस्तु ।।