विवेचन सारांश
दैवी गुणांची ओळख
भगवान श्रीकृष्ण आणि श्रीगुरुदेवचरणकमलांना वंदन करून सत्राचा प्रारंभ झाला.
आपल्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी आपण गीतेचा अभ्यास करायला प्रवृत्त झालेलो आहोत. आपले पूर्वजन्मीचे सुकृत असेल किंवा वाडवडिलांची पुण्याई वा संस्कार असतील किंवा संत महात्म्यांची कृपा आपल्यावर झाली असेल, ज्यामुळे आपण गीतेच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे.
मानवी जीवनामध्ये भगवद्गीतेसारखा उपयुक्त ग्रंथ दुसरा कोणताही नाही. भगवंतांनी कुठल्याही तत्त्वज्ञानाचे खंडन भगवद्गीतेत केलेले नाही, तर सर्व मार्गांचे स्पष्टीकरण केलेले आहे. मार्ग कुठलाही असो, भगवंतांसाठी फक्त गंतव्यस्थानी पोहोचणे महत्त्वाचे आहे. सर्व धर्मग्रंथांचे निरीक्षण केल्यावर, श्रीमद्भगवद्गीतेसारखा दुसरा कोणताही ग्रंथ मानवजातीचे कल्याण करू शकत नाही अशा निष्कर्षावर मी पोहोचलो आहे असे श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रस्तावनेत गीताप्रेसचे श्री जयदयाळ गोयन्दका जी यांनी लिहिले आहे. देशविदेशातील विविध तत्त्वचिंतकांवरही भगवद्गीतेचा प्रभाव होता आणि आहे.
आदि शंकराचार्य म्हणतात,
तामसी वृत्ती सात्त्विक वृत्तीमध्ये कशी बदलावी व दैवी गुण कसे अंगी बाणवावे याचे वर्णन करणारे संत कबीरांचे एक सुंदर भजन आहे.
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्।
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्॥
योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियम्।
धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगतगुरुम्॥
॥श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः॥
आपल्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी आपण गीतेचा अभ्यास करायला प्रवृत्त झालेलो आहोत. आपले पूर्वजन्मीचे सुकृत असेल किंवा वाडवडिलांची पुण्याई वा संस्कार असतील किंवा संत महात्म्यांची कृपा आपल्यावर झाली असेल, ज्यामुळे आपण गीतेच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे.
मानवी जीवनामध्ये भगवद्गीतेसारखा उपयुक्त ग्रंथ दुसरा कोणताही नाही. भगवंतांनी कुठल्याही तत्त्वज्ञानाचे खंडन भगवद्गीतेत केलेले नाही, तर सर्व मार्गांचे स्पष्टीकरण केलेले आहे. मार्ग कुठलाही असो, भगवंतांसाठी फक्त गंतव्यस्थानी पोहोचणे महत्त्वाचे आहे. सर्व धर्मग्रंथांचे निरीक्षण केल्यावर, श्रीमद्भगवद्गीतेसारखा दुसरा कोणताही ग्रंथ मानवजातीचे कल्याण करू शकत नाही अशा निष्कर्षावर मी पोहोचलो आहे असे श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रस्तावनेत गीताप्रेसचे श्री जयदयाळ गोयन्दका जी यांनी लिहिले आहे. देशविदेशातील विविध तत्त्वचिंतकांवरही भगवद्गीतेचा प्रभाव होता आणि आहे.
आदि शंकराचार्य म्हणतात,
भगवद्गीता किञ्चिदधीता गङ्गा जललव कणिकापीता।
सकृदपि येन मुरारि समर्चा क्रियते तस्य यमेन न चर्चा॥
- भज गोविन्दम्
ज्याने भगवद्गीतेचा थोडाफार अभ्यास केला आहे, ज्याने गंगेच्या पाण्याचा एक थेंब तरी प्याला आहे, ज्याने एकदा तरी मुरारीची पूजा केली आहे, त्याच्याजवळ मृत्यूची देवता यमराज फिरकत नाहीत. गीतेत एवढी ताकद आहे कारण ती भगवंताच्या प्रत्यक्ष श्रीमुखातून प्रकट झाली आहे. त्यामुळे तिच्यासारखा दुसरा तुलनात्मक ग्रंथ नाही असे अनेक आचार्य आणि महापुरुषांनी वारंवार सांगितले आहे. अठराव्या अध्यायाच्या अडुसष्टाव्या श्लोकात श्रीभगवानांनी हे स्पष्ट केले आहे की
य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति ।
भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्यसंशयः ॥
जो कोणी माझ्या ठिकाणी परम प्रेम ठेवून या गीतेचे पठण करेल व हे परम रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल, त्याला माझी प्राप्ती होईल, यात शंका नाही.
एकदा गीताभवनात रामसुखदासजी आपल्या प्रवचनात म्हणाले, “तुम्ही जे इथे बसलेले आहात त्यांचा मोक्ष निश्चित आहे." स्वामीजी पुढे काय बोलणार आहेत या उत्कंठेने सर्वजण आनंदी होऊन स्वामीजींकडे पाहू लागले. काही वेळाने स्वामीजी म्हणाले, "मोक्ष निश्चित आहे पण तो प्रत्येकाच्या स्वतःच्या गतीवर अवलंबून असेल." स्वामीजी पुढे म्हणाले, "हे तुमच्या समर्पण, विश्वास आणि प्रयत्नांवर अवलंबून आहे की तुम्ही मोक्ष याच जन्मात मिळवाल की पुढच्या जन्मात किंवा त्यानंतरच्या आयुष्यात मिळवाल. मात्र आपल्या सर्वांसाठी मोक्ष निश्चित आहे कारण आपण श्रीमद्भगवद्गीतेच्या मार्गावर चालत आहोत. फक्त ते आपल्या गतीवर अवलंबून असेल."गाय, गंगा, गायत्री, गोविंद आणि गीता हे पाच 'ग' भवतारक मानले जातात. यात गोमातेची सेवा, गंगास्नान, गायत्रीजप, गोविंदाचे नाम आणि गीतेचे पठण समाविष्ट होते. गीतेची तुलना गोमातेच्या दुधाशी केली जाते.
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः।
पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्॥
तसेच दहाव्या अध्यायात भगवंत स्वतः गंगा (स्रोतसामस्मि जाह्नवी) आणि गायत्री (गायत्री छन्दसामहम्) असल्याचे सांगतात. स्वतः गोविंद ही गीता सांगत आहेत. त्यामुळे गीतेत पाचही 'ग' सामावले आहेत.परमश्रद्धेय स्वामी रामसुखदास म्हणतात, “भगवद्गीता असा विलक्षण ग्रंथ आहे की ज्याचा कोणाला पार लागू शकला नाही, पार लागू शकत नाही आणि पार लागू शकतच नाही”.
जगातील माणसांची विभागणी आपण त्यांचा वर्ण, वंश, धर्म, जात, लिंग, वय या निकषांवर आधारित गोरा, काळा, आर्य, द्रविड, हिंदू, मुस्लिम, ब्राह्मण, दलित, स्त्री, पुरुष, तरुण, वृद्ध अशी करत असलो तरी भगवंत दैवी गुण असलेले आणि आसुरी गुण असलेले अशी मानवांची विभागणी करतात. याचे कारण हे की एकमेव मनुष्ययोनीला कर्माचा अधिकार मिळाला आहे आणि त्यातून दैवी कर्म करावे की आसुरी, चांगले कर्म करावे की वाईट याची निवड करण्याचाही मनुष्यालाच अधिकार मिळाला आहे. सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या वेगवेगळ्या प्रमाणानुसार मानवांमध्ये दैवी किंवा आसुरी गुण असतात. सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण सर्व मानवांमध्ये आहेत. हे तीनही गुण नाहीत अशी एकही व्यक्ती या ब्रह्मांडामध्ये नाही. कितीही मोठा संत महात्मा असला तरी त्याच्यात थोडा तरी तमोगुण हा असतोच नाहीतर तो रात्री विश्राम करूच शकणार नाही आणि कितीही खलप्रवृत्तीचा मानव असला तरी काळ्या मेघालाही जशी सोनेरी किनार असते तसा त्याच्यातही सत्त्वगुणाचा काही अंश नक्कीच असतो. रजोगुणप्रधान व्यक्तींमध्ये सत्त्वगुणाकडे कल असेल तर त्यांचे दैवी गुण अधिक असतात तर तमोगुणाकडे कल असेल तर आसुरी गुण अधिक असतात.
एक मनुष्य तरी एका पूर्ण दिवसात एकसारखा वागतो का? कधी त्याचे एकदम चांगले आचार विचार असतात तर कधी खूप वाईट! आपणच कधी दैवी गुणांनी तर कधी आपणच आसुरी गुणांनी युक्त आहोत असे निदर्शनास येते. सत्त्व, रज आणि तम यात कोणता गुण प्रभावी आहे तशी आपली वृत्ती बदलते व जो मनुष्य ज्या वृत्तीमध्ये जास्त काळ राहतो तो त्याप्रमाणे ओळखला जातो. नेहमी व्यसनाधीन असणारा, वाईट कर्म करणारा तमोगुणी म्हणून ओळखला जातो. मात्र त्याच्यातील चांगले गुण नष्ट झाले आहेत असे होत नाही. सतत काहीतरी क्रिया करत राहणे, गप्पा मारणे, मनोरंजनात गुंग राहणे, चविष्ट खाण्यापिण्याची आवड असणारा तो रजोगुणी. गीतापठण, जप करणे, सत्संग करणे, ध्यान करणे, इतरांना मदत करणे यात रमणारा सत्त्वगुणी असतो. मात्र हा सत्त्वगुणी मनुष्य वाईट काम करणार नाही असे नाही. तसेच तमोगुणी मनुष्य कधीच चांगले काम करणार नाही असेही म्हणता येणार नाही. जो गुण प्राधान्याने असेल तसे त्या व्यक्तीचे जीवन असेल. जितका रज आणि तमोगुण असेल तितका निंदनीय, अविचार आणि स्वार्थीभाव त्या व्यक्तीत असेल. जितके ती व्यक्ती तमोगुणापासून दूर जात रजोगुणातून सत्त्वगुणाकडे वळेल तितका परमार्थभाव जागेल. इतरांसाठी कामी यावे, त्यांची सेवा करावी अशी वृत्ती बनेल. इतरांची उपेक्षा करणारा तमोगुणी असतो. आत्मकेंद्रीत रजोगुणी असतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करून इतरांच्या हिताचे चिंतन करणारा सत्त्वगुणी असतो.
भगवंतांनी हे सर्व अगदी तर्कशुद्ध वर्णन केले आहे. आपण स्वतःला काय मानतो हे महत्त्वाचे नसून आपल्यामध्ये तशी लक्षणे आहेत का ते भगवंतांनी दिलेल्या सूचीतून तपासून बघावे. सर्व दैवी गुण आपल्यात असणे शक्य नाही. सर्व दैवी गुण सर्वोत्तम मात्रेत असणेही शक्य नाही. मात्र ही यादी बघताना हे तपासून पहावे की कोणता दैवी गुण अजिबात नाही, कोणता कमी आहे, कोणता अधिक आहे. सध्या जिथे आहोत तिथून प्रगती करायची आहे. जे दैवी गुण शून्य प्रमाणात आहेत, त्यांना दहापर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. जे दहा टक्के आहेत त्यांना पंधरापर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. असे एकेक गुणावर चिंतन केले, तर पूर्ण जीवन परिवर्तित होऊ शकते. यात अचानक परिवर्तन करणे शक्य नाही. मात्र थोडे थोडे चिंतन करून यात बदल शक्य आहे. मनुष्याला तमोगुणातून रजोगुणामार्गे सत्त्वगुणप्रधान बनण्याचा प्रवास करायचा आहे.
आपला पहिला स्तर आपण पार केला आहे ज्यात बारावा आणि पंधरावा अध्याय अंतर्भूत होते. बाराव्या अध्यायात भक्तीयोग आणि भक्ताची लक्षणे सांगितली होती तर पंधराव्या अध्यायात जीव, जगत् आणि जगदीश्वर यांचे विवेचन केले होते व आपला पत्ता सांगून ज्ञानयोगाने आपण तिथे कसे पोहोचतो ते ही सांगितले आहे. भगवंतांनी बाराव्या अध्यायात एकोणचाळीस भक्तलक्षणे, दुसर्या अध्यायात स्थितप्रज्ञांची लक्षणे, तेराव्या अध्यायात ज्ञानींची लक्षणे आणि चौदाव्या अध्यायात गुणातीताची लक्षणे सांगितली. आता सोळाव्या अध्यायात दैवी आणि आसुरी गुणांची लक्षणे सांगत आहेत.
आता या दुसऱ्या स्तरात आपण सोळाव्या अध्यायाच्या अभ्यासाला प्रारंभ करत आहोत ज्याचे नाव दैवासुरसंपद्विभागयोग असे आहे. या अध्यायामध्ये भगवंत दैवी आणि आसुरी संपत्तीचे वर्णन करत आहेत. नवव्या अध्यायात भगवंत काही सिद्धांतांची उलगड करत असताना त्यात अर्जुनाच्या प्रश्नांमुळे खंड पडला होता. आता भगवंतांनी सोळाव्या अध्यायात स्वतःहून त्या विषयावर परत सांगण्यास प्रारंभ केला आहे.जगातील माणसांची विभागणी आपण त्यांचा वर्ण, वंश, धर्म, जात, लिंग, वय या निकषांवर आधारित गोरा, काळा, आर्य, द्रविड, हिंदू, मुस्लिम, ब्राह्मण, दलित, स्त्री, पुरुष, तरुण, वृद्ध अशी करत असलो तरी भगवंत दैवी गुण असलेले आणि आसुरी गुण असलेले अशी मानवांची विभागणी करतात. याचे कारण हे की एकमेव मनुष्ययोनीला कर्माचा अधिकार मिळाला आहे आणि त्यातून दैवी कर्म करावे की आसुरी, चांगले कर्म करावे की वाईट याची निवड करण्याचाही मनुष्यालाच अधिकार मिळाला आहे. सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या वेगवेगळ्या प्रमाणानुसार मानवांमध्ये दैवी किंवा आसुरी गुण असतात. सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण सर्व मानवांमध्ये आहेत. हे तीनही गुण नाहीत अशी एकही व्यक्ती या ब्रह्मांडामध्ये नाही. कितीही मोठा संत महात्मा असला तरी त्याच्यात थोडा तरी तमोगुण हा असतोच नाहीतर तो रात्री विश्राम करूच शकणार नाही आणि कितीही खलप्रवृत्तीचा मानव असला तरी काळ्या मेघालाही जशी सोनेरी किनार असते तसा त्याच्यातही सत्त्वगुणाचा काही अंश नक्कीच असतो. रजोगुणप्रधान व्यक्तींमध्ये सत्त्वगुणाकडे कल असेल तर त्यांचे दैवी गुण अधिक असतात तर तमोगुणाकडे कल असेल तर आसुरी गुण अधिक असतात.
एक मनुष्य तरी एका पूर्ण दिवसात एकसारखा वागतो का? कधी त्याचे एकदम चांगले आचार विचार असतात तर कधी खूप वाईट! आपणच कधी दैवी गुणांनी तर कधी आपणच आसुरी गुणांनी युक्त आहोत असे निदर्शनास येते. सत्त्व, रज आणि तम यात कोणता गुण प्रभावी आहे तशी आपली वृत्ती बदलते व जो मनुष्य ज्या वृत्तीमध्ये जास्त काळ राहतो तो त्याप्रमाणे ओळखला जातो. नेहमी व्यसनाधीन असणारा, वाईट कर्म करणारा तमोगुणी म्हणून ओळखला जातो. मात्र त्याच्यातील चांगले गुण नष्ट झाले आहेत असे होत नाही. सतत काहीतरी क्रिया करत राहणे, गप्पा मारणे, मनोरंजनात गुंग राहणे, चविष्ट खाण्यापिण्याची आवड असणारा तो रजोगुणी. गीतापठण, जप करणे, सत्संग करणे, ध्यान करणे, इतरांना मदत करणे यात रमणारा सत्त्वगुणी असतो. मात्र हा सत्त्वगुणी मनुष्य वाईट काम करणार नाही असे नाही. तसेच तमोगुणी मनुष्य कधीच चांगले काम करणार नाही असेही म्हणता येणार नाही. जो गुण प्राधान्याने असेल तसे त्या व्यक्तीचे जीवन असेल. जितका रज आणि तमोगुण असेल तितका निंदनीय, अविचार आणि स्वार्थीभाव त्या व्यक्तीत असेल. जितके ती व्यक्ती तमोगुणापासून दूर जात रजोगुणातून सत्त्वगुणाकडे वळेल तितका परमार्थभाव जागेल. इतरांसाठी कामी यावे, त्यांची सेवा करावी अशी वृत्ती बनेल. इतरांची उपेक्षा करणारा तमोगुणी असतो. आत्मकेंद्रीत रजोगुणी असतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करून इतरांच्या हिताचे चिंतन करणारा सत्त्वगुणी असतो.
भगवंतांनी हे सर्व अगदी तर्कशुद्ध वर्णन केले आहे. आपण स्वतःला काय मानतो हे महत्त्वाचे नसून आपल्यामध्ये तशी लक्षणे आहेत का ते भगवंतांनी दिलेल्या सूचीतून तपासून बघावे. सर्व दैवी गुण आपल्यात असणे शक्य नाही. सर्व दैवी गुण सर्वोत्तम मात्रेत असणेही शक्य नाही. मात्र ही यादी बघताना हे तपासून पहावे की कोणता दैवी गुण अजिबात नाही, कोणता कमी आहे, कोणता अधिक आहे. सध्या जिथे आहोत तिथून प्रगती करायची आहे. जे दैवी गुण शून्य प्रमाणात आहेत, त्यांना दहापर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. जे दहा टक्के आहेत त्यांना पंधरापर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. असे एकेक गुणावर चिंतन केले, तर पूर्ण जीवन परिवर्तित होऊ शकते. यात अचानक परिवर्तन करणे शक्य नाही. मात्र थोडे थोडे चिंतन करून यात बदल शक्य आहे. मनुष्याला तमोगुणातून रजोगुणामार्गे सत्त्वगुणप्रधान बनण्याचा प्रवास करायचा आहे.
तामसी वृत्ती सात्त्विक वृत्तीमध्ये कशी बदलावी व दैवी गुण कसे अंगी बाणवावे याचे वर्णन करणारे संत कबीरांचे एक सुंदर भजन आहे.
संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी,
अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी,
अच्छी बनेगी तेरी तेरी किस्मत जगेगी,
जाग सके तो जाग रे तेरी अच्छी बनेगी॥
ध्रुव जी की बन गई, प्रह्लाद जी की बन गई,
हरी कीर्तन में लाग रे, तेरी अच्छी बनेगी॥
कागा से तोहे हंस बनावे, कागा से तोहे हंस बनावे
मिट जाए दिल के दाग रे, तेरी अच्छी बनेगी॥
संतन के संग भक्ति बढ़ेगी, संतन के संग भक्ति बढ़ेगी,
राम चरण अनुराग रे, तेरी अच्छी बनेगी॥
मोह रात्रि में बहुत दिन सोया,
जाग सके तो जाग रे, तेरी अच्छी बनेगी॥
जाग सके तो जाग रे, तेरी अच्छी बनेगी॥
सुत वित नारी तीन आशाएँ,
त्याग सके तो त्याग रे, तेरी अच्छी बनेगी॥
त्याग सके तो त्याग रे, तेरी अच्छी बनेगी॥
कहत कबीर सुनो भाई साधो, कहत कबीर सुनो भाई साधो,
होये तेरो बडो भाग रे, तेरी अच्छी बनेगी।।
संतांची संगत धरल्याने तुझे भले होईल. जीवनाची विस्कटलेली घडी सुरळीत होईल, दैवाची कृपादृष्टी पडेल. ध्रुव आणि प्रह्लाद यांनी सद्गतीसाठी सत्संग केला. तू ही हरी संकीर्तनात रममाण हो. आपण काक प्रवृत्तीचे असलो तरी संत त्यांच्या संगतीने आपल्याला हंस बनवतील. संतसंगतीने तुझा भक्तीमार्गाकडे ओढा वाढेल आणि श्रीरामचरणी अनुराग निर्माण होईल. मोहाच्या रात्रीत खूप झोपलास, आता जागा हो. पुत्र, वित्त व स्त्री या तीन मोहांचा त्याग कर. तुझे कल्याण होईल.
16.1
श्रीभगवानुवाच
अभयं(म्) सत्त्वसंशुद्धिः(र्), ज्ञानयोगव्यवस्थितिः।
दानं(न्) दमश्च यज्ञश्च, स्वाध्यायस्तप आर्जवम्।।16.1।।
श्री भगवान म्हणाले, भयाचा पूर्ण अभाव, अंत:करणाची पूर्ण निर्मळता, तत्वज्ञान करता ध्यानयोगात निरंतर दृढ स्थिति आणि सात्विक दान, इंद्रियांचे दमन, भगवान, देवता आणि गुरुजनांची पूजा, तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माचे आचरण, त्याप्रमाणे वेदशास्त्रांचे पठन-पाठन, भगवंताच्या नामाचे व गुणांचे किर्तन, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रियांसह अंत:करणाची सरलता.
भगवद्गीतेतील काही श्लोक इतके महत्त्वपूर्ण आहेत की त्यांचे चिंतन करून आचरणात आणले असता संपूर्ण आयुष्य बदलून जाऊ शकते. या अध्यायामध्ये पहिले काही श्लोक अशाच श्लोकांपैकी आहेत. पहिल्या तीन श्लोकांत एकूण सव्वीस दैवी गुणांची माहिती भगवंत देत आहेत, यापैकी नऊ दैवी गुण या श्लोकात सांगत आहेत.
श्री भगवान म्हणाले, “अभय (भीतीचा संपूर्ण अभाव), सत्त्वसंशुद्धी (अंत:करणाची संपूर्ण पवित्रता), ज्ञानयोगव्यवस्थिति (तत्त्वज्ञान आणि ध्यानयोग यातील निरंतर दृढता), दान (निरपेक्ष दान), दम (इंद्रियांचे दमन), यज्ञ (त्याग, समर्पण, तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माचे आचरण), स्वाध्याय (स्वतःचा स्वतः केलेला अभ्यास), तप (स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे) आणि आर्जव (शरीर व इंद्रियांसह अंत:करणाची सरलता)……”
या सव्वीस दैवी गुणांची सूची करताना भगवंतांनी सर्वप्रथम 'अभय' या गुणाचे नाव घेतले आहे. 'अभय' म्हणजे भयाचा अभाव, भयमुक्त. संत कबीर म्हणतात,
जर भय सर्वांनाच असते तर मग भयमुक्त व्हा असे भगवंत का सांगत आहेत? भय दोन प्रकारचे असते. एक बाह्य कारणांमुळे असलेले भय जसे की शारीरिक इजा अथवा मृत्यूचे भय जे आत्मज्ञान झाल्यावर नष्ट होते.
दुसरे सात्त्विक भय जसे की जर आपण चुकीचे वागलो तर वडील, गुरू, समाज मला काय म्हणतील असे वाटणे. हे भय चुकीच्या मार्गापासून मनुष्याला परावृत्त करते. या विचाराने जीवनात निर्भयता येते. जो वडीलधाऱ्यांचा योग्य तो सल्ला मानतो त्याला इतर भयांचा सामना करावा लागत नाही. अशी निर्भयता म्हणजे निश्चिंत वागणे. निर्भयता चांगली, सकारात्मक असते. निर्भय मनुष्य परमज्ञानी असतो.
जो वडिलधाऱ्या व्यक्ती व गुरुजनांचा सल्ला मानतो नाही, मन मानेल तसे वागतो त्याची तामस वृत्ती वाढीला लागते. 'मी आणि माझी मर्जी' हे निरंकुश वृत्तीचे लक्षण आहे. अशा प्रकारची निर्भयता विवेकहीन, दिशाहीन असते, त्यामुळे ती निर्भयता नसून वास्तविक पाहता निरंकुशता असते. निरंकुशता म्हणजे कोणतेच नियंत्रण न ठेवता मनाच्या मर्जीने वागणे. निरंकुशता वाईट, नकारात्मक आहे. निरंकुश मनुष्य अज्ञानी असतो.
सैनिक निर्भय असतो तर एखादा माफिया निरंकुश असतो. सैनिक शिस्तशीर असतो. तो नियमांचे पालन करतो. तो आदेशांना बांधलेला असतो. त्याच्याबरोबर असलेल्या संपूर्ण सेनेच्या, देशाच्या आणि राज्यकर्त्यांच्या पाठबळामुळे तो निर्भय होतो. दुसऱ्या बाजूला माफिया हा बेशिस्त, दिशाहीन असतो.
निष्काळजी आणि निश्चिंत असे दोन शब्द या दोघांच्या निर्भयतेचे वर्णन करताना आपण वापरू शकतो. अध्यात्मामध्ये निश्चिंत होण्यास सांगितले आहे निष्काळजी नाही. आपल्याला संध्याकाळचे जेवण मिळेल की नाही याबद्दल एखादा साधू निश्चिंत असतो. परमश्रद्धेय स्वामी रामसुखदास जी महाराज म्हणतात, “बेपरवाह हो जाओ, लापरवाह नहीं।”
निरंकुश व्यक्ती आसुरी स्वभावाच्या, त्रासदायक असतात. त्यांना आई -वडील, नियम, शास्त्र, पोलिस , कायदा यापैकी कशाचीही पर्वा नसते. परंतु आईच्या कडेवर बसलेले छोटे बालक मात्र निश्चिंत असते त्याला खात्री असते की आई आपल्याला पाडणार नाही. आईबद्दल असलेल्या विश्वासामुळे त्यालाही निर्भयता प्राप्त होते. त्याचप्रमाणे साधकाला जेव्हा परमेश्वराबद्दल, गुरूंबद्दल असा विश्वास वाटेल तेव्हा तो निर्भय होईल.
रामचरितमानसमध्ये परशुराम प्रसंगाचे वर्णन आहे. सीता स्वयंवराच्या वेळी शिवधनुष्य मोडल्यानंतर भगवान परशुराम तिथे प्रगट झाले. ते अतिशय संतापले होते. ते चिडून राम आणि लक्ष्मणाला बोलू लागले. परशुरामांशी भाषण करण्याचे अनेकांना भय वाटत असे. परंतु श्रीराम मात्र शांत होते आणि अजिबात घाबरले नव्हते. राम आणि लक्ष्मण कशालाच घाबरत नाहीत हे परशुरामांच्या लक्षात आले. त्यांनी प्रश्न विचारून राम लक्ष्मणाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक प्रश्नाचे रामानी आणि लक्ष्मणाने हसून उत्तर दिले. परशुरामांना आश्चर्य वाटले व त्यांनी प्रभू रामचंद्रांना विचारले, "तुम्हाला भय वाटत नाही का ?"
रावण खूप शक्तिशाली होता पण त्याने केलेल्या दुष्कृत्यांमुळे त्याच्या मनात भीती होती.
सत्त्वसंशुद्धि किंवा अंत:करणाची पवित्रता हा पुढचा दुसरा गुण आहे. असे म्हणतात की "मन चंगा तो कटोरी मे गंगा."
ज्ञानयोगव्यवस्थिति किंवा तत्त्वज्ञान आणि ध्यानयोग यातील निरंतर दृढता हा तिसरा गुण. इथे निरंतर हा शब्द महत्त्वाचा आहे भगवंताच्या ठिकाणी सतत चित्त एकाग्र करून राहणे हा तिसरा दैवी गुण आहे.
विलास जी:- पहिल्या श्लोकातील आर्जव या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर:- मनाचा सरळपणा, निरागसता, निष्कपट भाव!
विक्रांत जी:- आपण फक्त एकाच देवतेचे ध्यान करावे का?
प्रश्न
नानक चंद जी:- काकभुशुंडीला भगवान शिव आणि श्री राम यांना वेगळे करून दुःख का भोगावे लागले?
प्रश्न
मुरली जी:- जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कशाची निवड करावी आणि कशाचा त्याग करावा याबाबत द्विधा मनस्थिती निर्माण होते. याला काय करावे?
प्रश्न
वर्षा जी:- आपल्याला माहिती असते की, चुकीची कृत्ये करू नयेत, पण पोलीस खात्यात असताना कधी कधी ती होतात आणि कोणा निष्पाप व्यक्तीला शिक्षा होते. यामुळे मनाला अपार वेदना आणि दु:ख होते. ही चुकीची कृत्ये पापांत गणली जातात का?
प्रश्न
जेनालगुड्डा जी:- येथे सत्त्व हा शब्द सत्त्वगुण या अर्थाने आला आहे का?
उत्तर:- नाही. सत्त्व या शब्दाने मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या अंत:करण चतुष्ट्याचा निर्देश होतो.
प्रश्न
गरिमा जी:- दीक्षा घेणे आवश्यक आहे का? योग्य गुरू कसा ओळखावा?
प्रश्न
राघवेंद्र जी:- श्लोक आणि मंत्र यात काय फरक आहे?
समारोपाच्या प्रार्थनेने सत्राची सांगता झाली.
श्री भगवान म्हणाले, “अभय (भीतीचा संपूर्ण अभाव), सत्त्वसंशुद्धी (अंत:करणाची संपूर्ण पवित्रता), ज्ञानयोगव्यवस्थिति (तत्त्वज्ञान आणि ध्यानयोग यातील निरंतर दृढता), दान (निरपेक्ष दान), दम (इंद्रियांचे दमन), यज्ञ (त्याग, समर्पण, तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माचे आचरण), स्वाध्याय (स्वतःचा स्वतः केलेला अभ्यास), तप (स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे) आणि आर्जव (शरीर व इंद्रियांसह अंत:करणाची सरलता)……”
या सव्वीस दैवी गुणांची सूची करताना भगवंतांनी सर्वप्रथम 'अभय' या गुणाचे नाव घेतले आहे. 'अभय' म्हणजे भयाचा अभाव, भयमुक्त. संत कबीर म्हणतात,
काल पकड चेला किया, भय के कतरे कान।
समरथ गुरु सिर पर खड़े, किसको करे सलाम॥
मी भीतीचे कान कापले आहेत, काळाचा गळा पकडला आहे कारण माझ्याबरोबर समर्थ गुरु आहेत. मला कसलीच भीती नाही.
हितोपदेशात एक श्लोक आहे,
आहार निद्रा भय मैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम्।
धर्मो हि तेषामधिको विशेष: धर्मेण हीनाः पशुभिः समानाः॥
आहार, निद्रा, भय आणि मैथुन – हे सर्व मनुष्य आणि पशूंमधे समान आहे. मनुष्यामध्ये विशेष फक्त 'धर्म' आहे. धर्माशिवाय मनुष्य पशुतुल्य आहे. प्रत्येक गुणाचा सदुपयोग किंवा दुरुपयोग करणे हे मनुष्यालाच शक्य आहे.
जर भय सर्वांनाच असते तर मग भयमुक्त व्हा असे भगवंत का सांगत आहेत? भय दोन प्रकारचे असते. एक बाह्य कारणांमुळे असलेले भय जसे की शारीरिक इजा अथवा मृत्यूचे भय जे आत्मज्ञान झाल्यावर नष्ट होते.
दुसरे सात्त्विक भय जसे की जर आपण चुकीचे वागलो तर वडील, गुरू, समाज मला काय म्हणतील असे वाटणे. हे भय चुकीच्या मार्गापासून मनुष्याला परावृत्त करते. या विचाराने जीवनात निर्भयता येते. जो वडीलधाऱ्यांचा योग्य तो सल्ला मानतो त्याला इतर भयांचा सामना करावा लागत नाही. अशी निर्भयता म्हणजे निश्चिंत वागणे. निर्भयता चांगली, सकारात्मक असते. निर्भय मनुष्य परमज्ञानी असतो.
जो वडिलधाऱ्या व्यक्ती व गुरुजनांचा सल्ला मानतो नाही, मन मानेल तसे वागतो त्याची तामस वृत्ती वाढीला लागते. 'मी आणि माझी मर्जी' हे निरंकुश वृत्तीचे लक्षण आहे. अशा प्रकारची निर्भयता विवेकहीन, दिशाहीन असते, त्यामुळे ती निर्भयता नसून वास्तविक पाहता निरंकुशता असते. निरंकुशता म्हणजे कोणतेच नियंत्रण न ठेवता मनाच्या मर्जीने वागणे. निरंकुशता वाईट, नकारात्मक आहे. निरंकुश मनुष्य अज्ञानी असतो.
सैनिक निर्भय असतो तर एखादा माफिया निरंकुश असतो. सैनिक शिस्तशीर असतो. तो नियमांचे पालन करतो. तो आदेशांना बांधलेला असतो. त्याच्याबरोबर असलेल्या संपूर्ण सेनेच्या, देशाच्या आणि राज्यकर्त्यांच्या पाठबळामुळे तो निर्भय होतो. दुसऱ्या बाजूला माफिया हा बेशिस्त, दिशाहीन असतो.
निष्काळजी आणि निश्चिंत असे दोन शब्द या दोघांच्या निर्भयतेचे वर्णन करताना आपण वापरू शकतो. अध्यात्मामध्ये निश्चिंत होण्यास सांगितले आहे निष्काळजी नाही. आपल्याला संध्याकाळचे जेवण मिळेल की नाही याबद्दल एखादा साधू निश्चिंत असतो. परमश्रद्धेय स्वामी रामसुखदास जी महाराज म्हणतात, “बेपरवाह हो जाओ, लापरवाह नहीं।”
जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिये।
सीताराम सीताराम सीताराम कहिये॥
भगवंतांनी जसे ठेवले तसे आपण राहिले पाहिजे आणि त्याचे भजन, गुणगान केले पाहिजे. हे निश्चिंतपणाचे लक्षण आहे. त्याचवेळी एखाद्या माणूस स्वतःची पत्नी, मुलेबाळे उपाशी असताना सुद्धा पत्ते खेळत बसला असेल तर त्याला निष्काळजीपणा म्हणतात.
निश्चिंतपणा हा सकारात्मक आहे तर निष्काळजीपणा नकारात्मक आहे. इथे शास्त्रकारांनी निर्भय या शब्दाऐवजी अभय हा शब्द वापरला आहे. निर्भय हा ज्ञानी आहे तर निरंकुश हा अज्ञानी आहे.निरंकुश व्यक्ती आसुरी स्वभावाच्या, त्रासदायक असतात. त्यांना आई -वडील, नियम, शास्त्र, पोलिस , कायदा यापैकी कशाचीही पर्वा नसते. परंतु आईच्या कडेवर बसलेले छोटे बालक मात्र निश्चिंत असते त्याला खात्री असते की आई आपल्याला पाडणार नाही. आईबद्दल असलेल्या विश्वासामुळे त्यालाही निर्भयता प्राप्त होते. त्याचप्रमाणे साधकाला जेव्हा परमेश्वराबद्दल, गुरूंबद्दल असा विश्वास वाटेल तेव्हा तो निर्भय होईल.
रामचरितमानसमध्ये परशुराम प्रसंगाचे वर्णन आहे. सीता स्वयंवराच्या वेळी शिवधनुष्य मोडल्यानंतर भगवान परशुराम तिथे प्रगट झाले. ते अतिशय संतापले होते. ते चिडून राम आणि लक्ष्मणाला बोलू लागले. परशुरामांशी भाषण करण्याचे अनेकांना भय वाटत असे. परंतु श्रीराम मात्र शांत होते आणि अजिबात घाबरले नव्हते. राम आणि लक्ष्मण कशालाच घाबरत नाहीत हे परशुरामांच्या लक्षात आले. त्यांनी प्रश्न विचारून राम लक्ष्मणाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक प्रश्नाचे रामानी आणि लक्ष्मणाने हसून उत्तर दिले. परशुरामांना आश्चर्य वाटले व त्यांनी प्रभू रामचंद्रांना विचारले, "तुम्हाला भय वाटत नाही का ?"
यावर प्रभू रामचंद्रांनी दिलेले उत्तर तुलसीदासांच्या चौपाईत येते.
बिप्रबंस कै असि प्रभुताई।
अभय होइ जो तुम्हहि डेराई॥
सुनि मृदु गूढ़ बचन रघुपति के।
उघरे पटल परसुधर मति के॥
ब्राह्मण वंशाचा असाच महिमा आहे की जो तुम्हाला घाबरतो, तो निर्भय होतो. श्रीरामाचे हे कोमल आणि रहस्यपूर्ण बोलणे ऐकून परशुराम प्रसन्न झाले.
सरसंघचालक मोहनजी भागवत म्हणतात,
"एक चांगली व्यक्ती कोणालाही घाबरत नाही किंवा ती कोणालाही घाबरवत नाही."
"एक चांगली व्यक्ती कोणालाही घाबरत नाही किंवा ती कोणालाही घाबरवत नाही."
गुरुगोविंद सिंग आपल्या एका साखीमध्ये म्हणतात,
"मैं काहू को देत नहि, नहि भय मानत आन।"
मी कोणाला घाबरत नाही किंवा घाबरवत सुद्धा नाही.
रावण खूप शक्तिशाली होता पण त्याने केलेल्या दुष्कृत्यांमुळे त्याच्या मनात भीती होती.
जाकें डर सुर असुर डेराहीं। निसि न नींद दिन अन्न न खाहीं॥
सो दससीस स्वान की नाईं। इत उत चितइ चला भड़िहाईं॥
ज्याच्यामुळे देव आणि दानव देखील इतके घाबरतात की ते रात्री झोपत नाहीत आणि दिवसा अन्न खात नाहीत; तोच दहा डोक्याचा रावण चोरीसाठी कुत्र्यासारखा इकडे तिकडे पाहू लागला.
जितका जास्त माणूस सत्याच्या मार्गावर जाईल तितका तो देवाच्या आश्रयाला जाईल.
हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता ।
शरण में रख दिया जब माथ तो किस बात की चिंता ॥
आपल्याबरोबर साक्षात श्री रघुनाथ असताना कोणत्या गोष्टीची काळजी? त्यांना शरण जाऊन त्यांच्या चरणी माथा ठेवल्यावर कोणत्या गोष्टीची काळजी?
जोपर्यंत मनात निर्भयता येत नाही तोपर्यंत आपण इतर गुणही टिकवू शकणार नाही. म्हणूनच भगवंतांनी या श्लोकात सर्वप्रथम 'अभय' हा गुण सांगितला आहे. सद्गुरूंच्या आणि भगवंताच्या सानिध्याने निर्भयता प्राप्त होते.
सत्त्वसंशुद्धि किंवा अंत:करणाची पवित्रता हा पुढचा दुसरा गुण आहे. असे म्हणतात की "मन चंगा तो कटोरी मे गंगा."
म्हणून मन स्वच्छ करून तेथील धुळ काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याप्रमाणे मळलेले कपडे स्वच्छ करावे लागतात, त्याचप्रमाणे अंतरंगाची स्वच्छता देखील अत्यंत आवश्यक आहे. ही स्वच्छता केवळ ध्यानधारणा करून, कर्मकांड करून, ब्राह्मणांना भोजन देऊन, दानधर्म करून, पठण आणि व्रतवैकल्ये करून प्राप्त होऊ शकत नाही. जोपर्यंत अंतरंग स्वच्छ करत नाही तोपर्यंत ही साधने कामाची नाहीत. कपडे धुण्यानेच स्वच्छ होतात. अंतरंगात वास करून असलेले भगवंत आपल्याला दिसत नाही, कारण मध्ये धुळीचा पडदा साठला आहे. अस्वच्छ आरशात आपले प्रतिबिंब दिसत नाही. भगवंतांचे दर्शन आपल्या अंतःकरणात घ्यायचे असेल तर विकारांचा, वासनांचा, पापांचा मळ अंत:करणातून काढून टाकला पाहिजे.
म्हणून भगवंत पंधराव्या अध्यायात म्हणतात,
यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम्।
यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः॥
योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्नानेच तत्वतः जाणतात; परंतु त्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाहीत. मनात खोटेपणा, द्वेष, कपट, इर्षा, लालसा, पाप इत्यादी गोष्टींचा मळ असल्यामुळे भगवंत प्राप्ती होत नाही.
ज्ञानयोगव्यवस्थिति किंवा तत्त्वज्ञान आणि ध्यानयोग यातील निरंतर दृढता हा तिसरा गुण. इथे निरंतर हा शब्द महत्त्वाचा आहे भगवंताच्या ठिकाणी सतत चित्त एकाग्र करून राहणे हा तिसरा दैवी गुण आहे.
पुढचा गुण आहे दान. जोपर्यंत आपण दान देताना परोपकाराची भावना मनात ठेवतो, 'मी' दान देतो असा मीपणा असतो, तोपर्यंत ते दान कमी स्तराचे असते. दान देताना ते कर्तव्य म्हणून दिले पाहिजे. केवळ पैशाचे दान म्हणजे दान नव्हे. धनाव्यतिरिक्त आपण विविध गोष्टीही दान करू शकतो. उदाहरणार्थ वेळ, ज्ञान, बुद्धी, प्रसन्नता इत्यादी. वेळ आणि ज्ञानाचे दान हे देखील दान आहे. गीतावर्गात बसून सर्व गीता सेवी तुम्हा सर्वांना शिक्षण देण्यात गुंतले आहेत, ही देखील त्यांच्या वेळेची देणगी आहे. हे सर्व गीतासेवक नि:स्वार्थीपणे कार्य करत आहेत, दानही करण्यात मग्न आहेत.
आपल्या माननीय पंतप्रधानांनी स्वच्छता मोहीम सुरू केली, ज्यामध्ये अनेक लोक नि:स्वार्थपणे काम करत आहेत. हे स्वच्छतेचे दान आहे.
काही लोक आनंदाचे दान करतात. सकाळ-संध्याकाळ जेव्हा जेव्हा कोणी तुम्हाला आनंदी मूडमध्ये भेटतो तेव्हा त्यालाही दिवसभर तुमचे हसणे आठवते. अशा रीतीने जीवनातील आनंदाची अनुभूती वाटल्याने दानाचे पुण्यही मिळते. ॲलोपॅथी, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी यांपेक्षाही श्रेष्ठ अशी सिंपथी आहे.
एक सुंदर असे गीत आहे,
देश हमें देता है सब कुछ हम भी तो कुछ देना सीखे।
सूरज हमें रोशनी देता , हवा नया जीवन देती हैं॥
भूख मिटाने को हम सब की , धरती पर होती खेती हैं।
औरों का भी हित हो जिससे , हम ऐसा कुछ करना सीखे॥
अजूनही एक सुंदर गीत आठवणीत ठेवावे असे आहे,
अजूनही एक सुंदर गीत आठवणीत ठेवावे असे आहे,
किसी की मुस्कुराहटों पे हो निसार।
किसी का दर्द मिल सके तो ले उधार।
किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार।
जीना इसी का नाम हैं॥
किसी का दर्द मिल सके तो ले उधार।
किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार।
जीना इसी का नाम हैं॥
अशाप्रकारे भगवंतांनी आपल्याला जी शक्ती दिली आहे तिचा उपयोग करून दुसऱ्याला दान देण्याची नियत ठेवली पाहिजे.
प्रज्ञाचक्षू स्वामी शरणानंदजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे 'मी सर्वांना देत राहीन. त्या बदल्यात काहीही मागणार नाही.' अशी वृत्ती ठेवली पाहिजे. उत्तम जीवन जगण्याचे हे सूत्र आहे.
त्यांचेच अजून एक सूत्र आहे. ' हे जग योग्यतेची नाही तर उपयुक्ततेची कदर करते'
पुढचा गुण 'दम' म्हणजे इंद्रियांचा संयम, नियंत्रण. प्रत्येक इंद्रियावर आपले नियंत्रण असले पाहिजे. सर्वात चंचल इंद्रिय म्हणजे नेत्र. स्वामी शरणानंदजी म्हणतात 'तुम्ही ज्याला डोळे द्याल, त्याला आपले मनही द्यावे लागते'. यापुढील गुण आहे यज्ञ. भगवंतांनी चौथ्या अध्यायात बारा प्रकारचे यज्ञ वर्णन केले आहेत. उत्तम कर्म करणे, कर्तव्य पार पाडणे, अग्निहोत्र, पूजा अर्चा इत्यादी करणे, कुलपरंपरेचे पालन करणे हे सर्व यज्ञ होय. केवळ स्वतःच्याच कल्याणाच्या इच्छेने कर्म न करता इतरांप्रती असलेल्या कर्तव्याच्या भावनेतून केले गेले तर तो यज्ञ होतो. इतरांच्या कल्याणासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या जातात ते सर्व यज्ञ होय. उदाहरणार्थ आपले गीतेच्या वर्गांना आपण 'गीता ज्ञानयज्ञ' म्हणतो
पुढचा गुण आहे स्वाध्याय. याचा अर्थ स्वतःने स्वतःचा शोध घेणे. 'मी कोण आहे' याचा शोध घेणे. 'मी म्हणजे शरीर नाही' हे नेहमी लक्षात ठेवणे. आपण स्वतः सतत बदलत असतो. आधुनिक विज्ञान म्हणते की साडेतीन वर्षाच्या शरीरातील सर्व पेशी संपूर्णपणे नव्याने निर्माण होतात. त्यामुळे स्वतःचा शोध घेत स्वयं अध्ययन करणे म्हणजे स्वाध्याय होय. विविध आध्यात्मिक प्रवचने ऐकणे, पुस्तके वाचणे हाही स्वाध्याय होय.
पुढचा गुण आहे तप! तप याचा अर्थ केवळ हिमालयात जाऊन तपश्चर्या करणे असा नाही. आपण जीवनात अंगीकारलेला छोटासा नियमसुद्धा आनंदाने पाळणे म्हणजे तपश्चर्या. त्या नियमाचे पालन केल्यावर येणारे कष्ट सुखाने सहन करणे म्हणजे तपश्चर्या. त्यांची व्याख्या अशी केली जाते,तप: स्वधर्मकर्तव्यम्॥ आपल्या विहित कर्तव्यकर्माच्या पूर्तीसाठी जे काही कष्टपूर्वक आणि प्रसन्नतापूर्वक केले जाते ते सर्व तप होय. पतंजली मुनींनी योगदर्शनात म्हटले आहे,
कायेन्द्रियसिद्धिरशुद्धिक्षयात् तपसः॥तपाच्या योगाने शरीर आणि इंद्रिये ह्यांच्यातील अशुद्धी नष्ट झाल्यामुळे काही सिद्धी प्राप्त होऊ लागतात.
यापुढील गुण आहे आर्जव. आर्जव म्हणजे मनाचा सरळपणा, निरागसता, निष्कपट भाव!
रामचरितमानसात संत तुलसीदासांनी प्रभु रामचंद्रांनी सुग्रीवाला काय सांगितले होते?
निर्मल मन जन सो मोहि पावा।
मोहि कपट छल छिद्र न भावा॥
मोहि कपट छल छिद्र न भावा॥
निरागस मनाचा माणूस माझी प्राप्ती करतो. मला कपट आणि फसवणूक आवडत नाही. असा मनाचा निष्कपट भाव शिकण्यासाठी शबरीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे.
मध्य प्रदेशातील रायपूर पासून छत्तीस किलोमीटर अंतरावर खरौद नावाचे गाव आहे. तेथे शबरीचे मंदिर अजूनही आहे. येथील जंगलात शबरीचा जन्म झाला ती शबर कुलातील भिल्लीण होती म्हणून आपण तिला शबरी म्हणत असलो तरी तिचे मूळ नाव श्रमणा. तिचे वडील भिल्लांच्या टोळीचे प्रमुख होते.
लहानपणापासून तिने एक कोकरू पाळले होते. ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करे. ते कोकरू सतत तिच्याबरोबर राही. श्रमणा बारा वर्षांची झाली आणि तिचे लग्न ठरवले. लग्न चार दिवसांवर आले असताना एक दिवस श्रमणा झोपेतून उठली आणि तिला तिचे प्रिय कोकरू आजूबाजूला कोठेच दिसले नाही. असे पूर्वी कधीही झाले नव्हते. तिने सर्वत्र कोकराला शोधण्याचा प्रयत्न केला. पण तिला ते सापडले नाही शेवटी ती जंगलातील एका झाडाखाली बसून रडू लागली. तेवढ्यात तिच्याजवळ तिची एक मैत्रीण आली आणि तिने सांगितले की तिच्या कोकराला एके ठिकाणी इतर अनेक बकऱ्यांबरोबर बंदिस्त करून ठेवले आहे. श्रमणाने त्याचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली की दोन दिवसांनी तुझे लग्न आहे. त्यावेळी जी वरात येईल त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी या बकऱ्यांना नेण्यात आले आहे. हे ऐकून श्रमणाला खूप वाईट वाटले. तिचे हृदय दु:खाने व्याकूळ झाले. आपल्या लग्नामुळे एवढ्या पशूंची हत्या होते आहे हे ऐकून तिने लग्नच न करण्याचा निर्धार केला.
लहानपणापासून तिने एक कोकरू पाळले होते. ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करे. ते कोकरू सतत तिच्याबरोबर राही. श्रमणा बारा वर्षांची झाली आणि तिचे लग्न ठरवले. लग्न चार दिवसांवर आले असताना एक दिवस श्रमणा झोपेतून उठली आणि तिला तिचे प्रिय कोकरू आजूबाजूला कोठेच दिसले नाही. असे पूर्वी कधीही झाले नव्हते. तिने सर्वत्र कोकराला शोधण्याचा प्रयत्न केला. पण तिला ते सापडले नाही शेवटी ती जंगलातील एका झाडाखाली बसून रडू लागली. तेवढ्यात तिच्याजवळ तिची एक मैत्रीण आली आणि तिने सांगितले की तिच्या कोकराला एके ठिकाणी इतर अनेक बकऱ्यांबरोबर बंदिस्त करून ठेवले आहे. श्रमणाने त्याचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली की दोन दिवसांनी तुझे लग्न आहे. त्यावेळी जी वरात येईल त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी या बकऱ्यांना नेण्यात आले आहे. हे ऐकून श्रमणाला खूप वाईट वाटले. तिचे हृदय दु:खाने व्याकूळ झाले. आपल्या लग्नामुळे एवढ्या पशूंची हत्या होते आहे हे ऐकून तिने लग्नच न करण्याचा निर्धार केला.
ती उठली आणि दूर जंगलात पळून गेली. तीन दिवस ती सतत पळत होती. अनेक डोंगर दऱ्या पार करून ती दूरवर आली. भूक आणि अतिश्रमाने ती बेशुद्ध पडली. तेथे जवळच मतंग ऋषींचा आश्रम होता. त्यांनी तिला पाहिले. तिच्या तोंडावर पाणी शिंपडून तिला उठवले आणि आश्रमात नेले. तिची कहाणी ऐकून त्यांना आश्चर्य वाटले आणि श्रमणाचे फार कौतुक वाटले. त्यांनी तिच्या वडिलांना समजावण्याचे ठरवले. पण छोट्या श्रमणाला तिच्या गावाचा ठावठिकाणा सांगता येईना. शेवटी मतंग ऋषींनी तिला आपल्या आश्रमात रहाण्यास सांगितले. मतंग ऋषीचे प्रेम पाहून श्रमणा तेथे राहू लागली. आश्रमाची साफसफाई करू लागली. परंतु तिचे तेथे रहाणे इतर शिष्यांना रुचले नाही. त्यांनी त्याबद्दल गुरुजींशी (मतंग ऋषींंशी) बोलण्याचा निश्चय केला. ही गोष्ट श्रमणाच्या कानावर पडली. आपल्यामुळे गुरुजींना त्रास होतो आहे या विचाराने ती आश्रम सोडून निघाली आणि जंगलात राहू लागली.
जंगलातील फळे, कंदमुळे खाऊन राहू लागली. पण अत्यंत सात्त्विक, ज्ञानी मतंग ऋषींचे प्रेम पाहून तिचे अंत:करण गुरुभक्तीने भरून गेले. त्यांची सेवा करण्याच्या उद्देशाने ती रोज त्यांची जंगलातून नदीकडे जाण्याची वाट साफ करून ठेवू लागली. त्यानंतर तिने विचार केला की आश्रमातील गुरुबंधूंना लाकडे आणण्यासाठी दूर जावे लागते. त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून ती रोज जंगलात जाऊन लाकडे गोळा करी आणि गुपचूप आश्रमाजवळ आणून पसरवून ठेवी. हे पाहून ऋषींना आणि त्यांच्या शिष्यांना आश्चर्य वाटे. तीन वर्षे ती अशी सेवा करत होती. हे कोण करीत आहे हे शोधण्यासाठी ऋषी आणि त्यांचे शिष्य एक दिवस लपून बसले. तेव्हा त्यांना श्रमणा दृष्टीस पडली. तिच्या सेवेने आणि गुरुभक्तीने ऋषी प्रसन्न झाले. त्यांनी तिला विचारले," तू आश्रमातून का निघून गेलीस?" श्रमणाने काहीच उत्तर दिले नाही. पण मतंग ऋषींनी आपल्या अंतर्दृष्टीने सर्व जाणले. त्यानंतर त्यांनी श्रमणाला आश्रमातच राहण्यास सांगितले. आता श्रमणा आश्रमात राहून गुरुसेवा करु लागली.
अशी काही वर्षे लोटली. मतंग ऋषी वृद्ध झाले. त्यांनी पुढील काळ हिमालयात तप करण्यात घालवण्याचे ठरवले. जाण्यापूर्वी त्यांनी श्रमणाला जवळ बोलावले आणि आपला विचार सांगितला. ते पुढे म्हणाले, "श्रमणे, तुझ्या सेवेने आणि गुरुभक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू येथेच आश्रमात रहा. काही काळानंतर स्वतः भगवान तुला रामस्वरुपात दर्शन देतील." असे म्हणून मतंग ऋषी मार्गस्थ झाले. श्रमणा त्यावेळी सोळा वर्षांची होती. प्रभू श्रीराम आश्रमात कधी येणार, कोणत्या मार्गाने येणार? हे तिने विचारलेच नव्हते. म्हणून ती रोज आश्रमाकडे येणारे चारही मार्ग साफ करून ठेवू लागली. रामासाठी आसन बनवून ठेवू लागली. त्याच्यासाठी फळे, पाणी आणून ठेवू लागली. अशी अजून ७० वर्षे लोटली. शबरी आता ८६ वर्षाची वृद्धा झाली. केस पांढरे झाले, चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या. पण तरीही गुरुंनी सांगितलेल्या गोष्टींबद्दल तिच्या मनात जराही संशय आला नाही. ती निष्ठेने सेवा करत वाट पाहत राहिली. आणि एक दिवस तिच्या निष्ठेचे फळ तिला मिळाले.
ताहि देइ गति राम उदारा।
सबरी कें आश्रम पगु धारा॥
सबरी कें आश्रम पगु धारा॥
सबरी देखि राम गृहँ आए।
मुनि के बचन समुझि जियँ भाए॥
मुनि के बचन समुझि जियँ भाए॥
प्रभू श्रीराम शबरीच्या आश्रमात आले. त्यांना पाहून शबरीला मतंग मुनींचे शब्द आठवले आणि तिचे मन प्रसन्न झाले.
सरसिज लोचन बाहु बिसाला।
जटा मुकुट सिर उर बनमाला॥
जटा मुकुट सिर उर बनमाला॥
स्याम गौर सुंदर दोउ भाई।
सबरी परी चरन लपटाई॥
सबरी परी चरन लपटाई॥
कमला सारखे नेत्र आणि विशाल बाहू, डोक्यावर जटा मुकुट आणि हृदयावर वनमाळा धारण केलेल्या, सुंदर, सावळा आणि गोरा अशा दोन भावांच्या पायांना शबरीने मिठी मारली.
प्रेम मगन मुख बचन न आवा।
पुनि पुनि पद सरोज सिर नावा॥
पुनि पुनि पद सरोज सिर नावा॥
सादर जल लै चरन पखारे।
पुनि सुंदर आसन बैठारे॥
पुनि सुंदर आसन बैठारे॥
ती प्रेममग्न झाली. तिच्या तोंडातून शब्द फुटेना. ती वारंवार श्रीरामांच्या चरणावर मस्तक ठेवू लागली. नंतर तिने पाणी घेऊन आदराने दोन्ही भावांचे चरण धुतले आणि मग त्यांना सुंदर आसनांवर बसवले.
कंद मूल फल सुरस अति दिए राम कहुँ आनि।
प्रेम सहित प्रभु खाए बारंबार बखानि॥
तिने अत्यंत रसाळ आणि स्वादिष्ट अशी कंदमुळे आणि फळे आणून श्रीरामांना दिली. श्रीरामांनी वारंवार प्रशंसा करत ती सर्व प्रेमाने खाल्ली.
पानि जोरि आगें भइ ठाढ़ी।
प्रभुहि बिलोकि प्रीति अति बाढ़ी॥
प्रभुहि बिलोकि प्रीति अति बाढ़ी॥
केहि बिधि अस्तुति करौं तुम्हारी।
अधम जाति मैं जड़मति भारी॥
अधम जाति मैं जड़मति भारी॥
मग ती हात जोडून पुढे उभे राहिली. प्रभू श्रीरामांना पाहून तिला प्रेमाचे भरते आले. (ती म्हणाली) मी कोणत्या प्रकाराने आपली स्तुती करू? मी नीच जातीची आणि मंदबुद्धी आहे.
अधम ते अधम अधम अति नारी।
तिन्ह महँ मैं मतिमंद अघारी॥
तिन्ह महँ मैं मतिमंद अघारी॥
कह रघुपति सुनु भामिनि बाता।
मानउँ एक भगति कर नाता॥
मानउँ एक भगति कर नाता॥
अधमाहून अधम असलेल्या स्त्रियांमध्ये सुद्धा मी अधम आहे. हे पापनाशन, त्यातही मी मंदबुद्धी आहे. श्री रघुनाथजी म्हणाले, "हे भामिनी, माझी एक गोष्ट ऐक. मी तर फक्त एका भक्तीचा संबंध मानतो."
जाति पाँति कुल धर्म बड़ाई। धन बल परिजन गुन चतुराई॥
भगति हीन नर सोहइ कैसा। बिनु जल बारिद देखिअ जैसा॥
जात-पात, कुळ, धर्म, मोठेपण, धन, बळ, कुटुंब, गुण आणि चातुर्य हे सर्व असूनही भक्ती नसेल तर मनुष्य कसा वाटेल? जसे जलहीन ढग (शोभाहीन) दिसतात.
नवधा भगति कहउँ तोहि पाहीं। सावधान सुनु धरु मन माहीं॥
प्रथम भगति संतन्ह कर संगा। दूसरि रति मम कथा प्रसंगा॥
मी तुला आता माझी नवविधा भक्ती सांगतो. तू सावध चित्ताने ऐक आणि मनात साठवून ठेव. पहिली भक्ती आहे संतांचा सत्संग. दुसरी भक्ती आहे माझ्या कथा प्रसंगांवर प्रेम.
गुर पद पंकज सेवा तीसरि भगति अमान।
चौथि भगति मम गुन गन करइ कपट तजि गान॥
तिसरी भक्ती आहे अभिमान रहित होऊन गुरूंच्या चरणकमलांची सेवा आणि चौथी भक्ती आहे कपट सोडून माझे गुणगान करणे.
मंत्र जाप मम दृढ़ बिस्वासा। पंचम भजन सो बेद प्रकासा॥
छठ दम सील बिरति बहु करमा। निरत निरंतर सज्जन धरमा॥
माझ्या (राम) मंत्राचा जप आणि माझ्यावर दृढ विश्वास ही पाचवी भक्ती आहे जी वेदांमध्येही प्रसिद्ध आहे. सहावी भक्ती आहे इंद्रियांचा निग्रह, शील (चांगला स्वभाव अथवा चरित्र), अनेक कार्यातून वैराग्य आणि निरंतर संतांच्या धर्मचरणात तल्लीन होणे.
सातवँ सम मोहि मय जग देखा। मोतें संत अधिक करि लेखा॥
आठवँ जथालाभ संतोषा। सपनेहुँ नहिं देखइ परदोषा॥
सातवी भक्ती आहे जगभरातील समभावाने माझ्यात ओतप्रोत (राममय) पाहणे आणि संतांना माझ्यापेक्षाही अधिक श्रेष्ठ म्हणून मानणे. आठवी भक्ती आहे जी काही मिळेल त्यातच संतोष मानणे आणि स्वप्नातही दुसऱ्यांचे दोष न पाहणे.
नवम सरल सब सन छलहीना। मम भरोस हियँ हरष न दीना॥
नव महुँ एकउ जिन्ह कें होई। नारि पुरुष सचराचर कोई॥
नववी भक्ती आहे सरळपणा आणि सर्वांबरोबर निष्कपटपणे वागणे, हृदयात माझा विश्वास ठेवणे आणि कोणत्याही अवस्थेत आनंद किंवा दुःख न होणे. या नऊपैकी ज्याच्याजवळ एकतरी असते, तो स्त्री - पुरुष, जड - चेतन कोणीही असो,
सोइ अतिसय प्रिय भामिनि मोरें।
सकल प्रकार भगति दृढ़ तोरें॥
सकल प्रकार भगति दृढ़ तोरें॥
जोगि बृंद दुरलभ गति जोई।
तो कहुँ आजु सुलभ भइ सोई॥
तो कहुँ आजु सुलभ भइ सोई॥
हे भामिनी, मला तोच अत्यंत प्रिय आहे. मग तुझ्यामधे तर सर्व प्रकारची भक्ती अतिशय दृढ आहे. म्हणून जी गती योग्यांना सुद्धा अतिशय दुर्लभ आहे, ती तुझ्यासाठी अत्यंत सुलभ झाली आहे.
कहि कथा सकल बिलोकि हरि मुख हृदय पद पंकज धरे।
तजि जोग पावक देह परि पद लीन भइ जहँ नहिं फिरे॥
नर बिबिध कर्म अधर्म बहु मत सोकप्रद सब त्यागहू।
बिस्वास करि कह दास तुलसी राम पद अनुरागहू॥
सर्व कथा सांगून, भगवंतांचे मुखदर्शन करून, त्यांच्या चरणकमलांना मिठी मारून आणि योगाग्नीने देहाचा त्याग करून ती दुर्लभ अशा हरीच्या चरणी लीन झाली जेथून परत येणे होत नाही. तुलसीदास म्हणतात, "अनेक प्रकारांचे कर्म, अधर्म आणि अनेक मते हे सर्व शोकदायक आहे. जनहो, या सर्वांचा त्याग करा आणि विश्वास ठेवून श्रीरामा़च्या चरणांवर प्रेम करा.
अशाप्रकारे शबरीच्या गुरुभक्तीचे स्मरण करत आणि 'हरी शरणम' हे नामस्मरण करून विवेचनाची समाप्ती झाली.
प्रश्नोत्तर सत्र
प्रश्न विलास जी:- पहिल्या श्लोकातील आर्जव या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर:- मनाचा सरळपणा, निरागसता, निष्कपट भाव!
विलास जी:- गीता परिवाराच्या वर्गात अध्याय वाचन बाराव्या अध्यायापासूनच का सुरू होते?
उत्तरः- भगवद्गीता श्रीकृष्णाने अर्जुनाची मन:स्थिती पाहून सांगितली होती, म्हणून पहिल्या अध्यायात अर्जुनाचे दुःख, नंतर सांख्ययोग, कर्मयोग इत्यादींचे वर्णन केले आहे, हे अध्याय लांब आणि गुंतागुंतीचे आहेत आणि सामान्य माणसाला कंटाळवाणे ठरू शकतात, तर बारावा , पंधरावा आणि सोळावा अध्याय, हे लहान आणि समजण्यास सोपे आहेत. त्यामुळे हा क्रम शास्त्रानुसार स्वीकारण्यात आला आहे. बारावा अध्याय म्हणजे भक्तियोग आणि तो आत्मसात करून इथेच जरी थांबलो तरीही जीवन धन्य होईल.
प्रश्न:
पुष्पा जी:- सूक्ष्म शरीर आणि आत्मा एकच आहेत का?प्रश्न:
उत्तरः- दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सूक्ष्म शरीर म्हणजे स्थूल, जड शरीराहून वेगळे असे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंत:करण चतुष्टय आहे. जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा तो मनाने केला जातो, निर्णय बुद्धीने घेतला जातो, धारणा चित्ताने आणि स्वानुभूति अहंकाराने होतो. या साऱ्यांपेक्षा वेगळे साक्षीभावाने देहात वसती करणारे चैतन्य तत्त्व म्हणजे आत्मा!
प्रश्न विक्रांत जी:- आपण फक्त एकाच देवतेचे ध्यान करावे का?
उत्तर:- हे आवश्यक नाही. आपल्या इष्ट देवतेचे ध्यान करणे हे सर्वोत्तम मानले जाते, त्यामुळे आपली इष्ट देवता निश्चित करून तिचे ध्यान करणे प्रभावी असते.
प्रश्न
नानक चंद जी:- काकभुशुंडीला भगवान शिव आणि श्री राम यांना वेगळे करून दुःख का भोगावे लागले?
उत्तर:- परब्रह्म एकच आहे, नावे भिन्न आहेत हे लक्षात घेऊन परब्रह्माच्या सगुण स्वरूपात कोणताही भेदभाव करू नयेत. भक्ती शुद्ध अंतःकरणाने करावी आणि संकटे आली तरी ती सहन करावीत.
प्रश्न
मुरली जी:- जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कशाची निवड करावी आणि कशाचा त्याग करावा याबाबत द्विधा मनस्थिती निर्माण होते. याला काय करावे?
उत्तर:- आसक्तीभाव सोडून स्वकर्तव्य नि:स्वार्थपणे पार पाडावे. जर तुम्हाला जिलेबी आवडत असेल तर तुम्ही ती सोडू नका, पण तिचा मोह सोडा, जिलेबीच्या मोहासाठी कार्य न करता कर्तव्य काय ते करावे. देव आपल्याला निःस्वार्थ कार्य करायला लावतो.
प्रश्न
वर्षा जी:- आपल्याला माहिती असते की, चुकीची कृत्ये करू नयेत, पण पोलीस खात्यात असताना कधी कधी ती होतात आणि कोणा निष्पाप व्यक्तीला शिक्षा होते. यामुळे मनाला अपार वेदना आणि दु:ख होते. ही चुकीची कृत्ये पापांत गणली जातात का?
उत्तरः- अधिकार आणि आदेश हे आपले कर्तव्य म्हणून करावे, ते कर्म मानले जाऊ नये. तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी असेल तर तुम्ही ते टाळण्याचा प्रयत्न करू शकता, पण ते तुमचे कर्तव्य समजून ते केले तर तुम्हाला पाप लागणार नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्हाला ज्याला निर्दोष वाटत असेल त्याला पडद्याआड राहून मदत करू शकता.
प्रश्न
जेनालगुड्डा जी:- येथे सत्त्व हा शब्द सत्त्वगुण या अर्थाने आला आहे का?
उत्तर:- नाही. सत्त्व या शब्दाने मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या अंत:करण चतुष्ट्याचा निर्देश होतो.
प्रश्न
गरिमा जी:- दीक्षा घेणे आवश्यक आहे का? योग्य गुरू कसा ओळखावा?
उत्तर:- योग्य ज्ञान मिळविण्यासाठी दीक्षा आवश्यकच आहे. योग्य गुरू निवडण्यासाठी चार सूत्रे आहेत.
१) गुरू स्वयंघोषित आहेत की त्यांनी कोणा गुरुकडून दीक्षा घेतली आहे? जर स्वयंघोषित असतील तर ते ढोंगी आहेत.
२) गुरुपरंपरा पहावी. गुरुचे गुरू आणि त्यांचेही गुरु यांची माहिती घ्यावी.
३) तुम्ही गुरू मानता त्यांना शास्त्रवचनांचे किती ज्ञान आहे? त्यांनी उपनिषदे वाचली आहेत की नाही?
४) ते स्वतःची पूजा करतात की देवाची?
भारतात सद्गुरूंची कमतरता नाही पण त्यांची ओळख आवश्यक आहे.
प्रश्न:
दीपिका जी:- माझ्या मैत्रिणीच्या मुलीने तरुण वयात आत्महत्या केली. ती खूप दुःखी आहे, मला तिचे सांत्वन करावे लागेल पण तिच्याशी कसे बोलावे?
दीपिका जी:- माझ्या मैत्रिणीच्या मुलीने तरुण वयात आत्महत्या केली. ती खूप दुःखी आहे, मला तिचे सांत्वन करावे लागेल पण तिच्याशी कसे बोलावे?
उत्तरः- बोलायला तर हवेच. तुमच्या मैत्रिणीला तुमच्या बोलण्याने धीर मिळेल. त्यांना गीता परिवारात सामील होण्याचा सल्ला द्या, ज्यामुळे त्यांना दु:ख सहन करण्याची शक्ती मिळेल आणि त्या हा आघात विसरू शकतील.
प्रश्न
राघवेंद्र जी:- श्लोक आणि मंत्र यात काय फरक आहे?
उत्तर:- संस्कृतमधील छंदोबद्ध पंक्तींना श्लोक म्हणतात परंतु सर्वच श्लोक हे मंत्र नसतात. मंत्र सिद्ध केलेले असतात, ते कल्याणकारी असतात.
मननात्त्रायते इति मंत्र:॥
ज्याचे मनन, चिंतन व जप केला असता रक्षण करतो तो मंत्र अशी मंत्र या शब्दाची संस्कृतमध्ये व्याख्या आहे. भगवद्गीतेचे श्लोक हे भगवंतांच्या मुखातून निघालेले श्लोक आहेत, म्हणून ते सर्व मंत्र आहेत.
समारोपाच्या प्रार्थनेने सत्राची सांगता झाली.
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥