विवेचन सारांश
अर्जुनाला झालेला विषाद

ID: 1130
मराठी
शनिवार, 09 जुलै 2022
अध्याय 1: अर्जुन विषाद योग
3/3 (श्लोक 25-47)
विवेचक: गीता विशारद डॉ. श्री संजय मालपाणी जी


गुरुवंदना आणि सुंदर दीपप्रज्वलनाने अर्जुन विषाद योग या अध्यायाची सुरुवात झाली. आतापर्यंत संजय मार्फत युद्धाची परिस्थिती धृतराष्ट्र जाणून घेतो. आता उत्तरार्धात अर्जुनाची मन:स्थिती दर्शवलेली आहे. समोर आपले गुरुजन, बंधू, मामा, काका आणि इतर आप्तस्वकीय पाहून अर्जुनाची युद्ध करण्याची इच्छा होत नाही. तो व्यथित होतो. त्याचे सर्व शरीर कंपित होते. हातातून शस्त्र गळून पडते. आणि तो श्रीकृष्णाला वारंवार म्हणतो, युद्ध करून मी पाप करत आहे. महापुरुषांचे रडणे म्हणजे योग असतो. म्हणूनच याला विषादयोग म्हटले आहे.कुरुक्षेत्राच्या मैदानात धर्मयुद्ध सुरू आहे. अर्जुनाच्या मनातले आहे. परिवार धर्म पाळला तर क्षात्रधर्माचे नुकसान होते आणि क्षात्रधर्म पाळला आणि युद्ध केले तर परिवाराचे  नुकसान होते. असे त्याचे मन मोहाने व्यथित झाले आहे.

1.25

भीष्मद्रोणप्रमुखतः(स्), सर्वेषां(ञ्) च महीक्षिताम्।
उवाच पार्थ पश्यैतान्, समवेतान्कुरूनिति।।1.25।।

भीष्म, द्रोणाचार्य व इतर सर्व राजांच्या समोर तो उत्तम रथ उभा करून म्हटले, हे पार्था, युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पाहा.

1.25 - विवेचन -   भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य इतर पुष्कळ राजे समोर उभे होते. या ठिकाणी रथ स्थिर करून तो सैन्यदळ पाहू लागला. भगवंताला म्हणाला, हे तर सारे माझे गोत्रज आणि गुरु आहेत. कृष्णाच्या मनात आले, यावेळी असे विचार अर्जुनाच्या मनात का आले? आपले ईष्ट मित्र, गुरु बंधू मामा या दृष्टीने तो सैन्याकडे बघत होता. त्याला वाटले की हे सगळे आपल्याकडून मारल्या जाऊ शकतात. 

1.26

तत्रापश्यत्स्थितान्पार्थः(फ्), पितृ़नथ पितामहान्।
आचार्यान्मातुलान्भ्रातृ़न्, पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा।।1.26।।

त्यानंतर कुंतीपुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका, आजे-पणजे, गुरू, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक यांना पाहिले.

1.26- अर्जुन त्याच्या समोरील सैन्य बघून विचलीत झाला.  अर्जुन पराक्रमी असूनही त्याचे मन दयेने भरले. उपकार केले होते, संकट समयी ज्यांना मदत केली होती, अशा स्वकीयांना पाहून त्यांच्याशी युद्ध कसे करावे असा विचार अर्जुनाच्या मनात आला.

1.27

श्वशुरान्सुहृदश्चैव, सेनयोरुभयोरपि।
तान्समीक्ष्य स कौन्तेयः(स्), सर्वान्बन्धूनवस्थितान्।।1.27।।

तेथे असलेल्या त्या सर्व बान्धवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुन्तीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला.

1.27 -कुंतीनंदन अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणतो. अर्जुन भित्रा नाही. तो एकटा सर्व कौरवांचा पराभव करू शकतो. या आधी किचकवधाच्या  प्रसंगी भीमाने सुरुवातीला त्याला मारले कारण त्याने द्रौपदीची इच्छा केली होती. अर्जुनाने गांडीव धनुष्य हाती घेऊन बाकी किचकांना  मारले. आता अर्जुन आपले क्षात्र तेज विसरला आणि त्याचे मन करूणेने भरले.  

1.28

कृपया परयाविष्टो, विषीदन्निदमब्रवीत्।
अर्जुन उवाच
दृष्ट्वेमं स्वजनं(ङ्) कृष्ण, युयुत्सुं(म्) समुपस्थितम्।।1.28।।

अर्जुन म्हणाला, हे कृष्णा! युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उभ्या असलेल्या या स्वजनांना पाहून

1.28 writeup

1.29

सीदन्ति मम गात्राणि, मुखं(ञ्) च परिशुष्यति।
वेपथुश्च शरीरे मे, रोमहर्षश्च जायते।।1.29।।

माझे अवयव गळून जात आहेत; तोंडाला कोरड पडली आहे; शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहात आहेत.

1.29 writeup

1.30

गाण्डीवं(म्) स्रंसते हस्तात्, त्वक्चैव परिदह्यते।
न च शक्नोम्यवस्थातुं(म्), भ्रमतीव च मे मनः।।1.30।।

हातातून गाण्डीव धनुष्य गळून पडत आहे. अंगाचा दाह होत आहे. तसेच माझे मन भ्रमिष्टासारखे झाले आहे. त्यामुळे मी उभादेखील राहू शकत नाही.

1.28-1.29-1.30- विवेचन - अर्जुन म्हणाला,  हे कृष्णा! मी समोर सगळ्या स्वकियांना बघत आहे. माझे गात्र शिथिल होत आहेत. माझ्या तोंडाला कोरड पडली आहे. माझ्या शरीराला कंप सुटला आहे. माझ्या मनाला अतिशय वेदना होत आहेत. गांडीव धारण केलेला हात ढिला पडला आहे. त्या ठिकाणी अर्जुनाचे मन निराशेने ग्रासले गेले आहे.
 त्याने  युद्धात  शंकराला जिंकले होते, तो एका क्षणात मोहाने ग्रासला गेला. संजय म्हणाला, आप्तस्वकीयांना पाहून अर्जुन युद्धाविषयीची इर्षा विसरून गेला. त्यानंतर तो श्रीकृष्णाला म्हणाला मला येथे राहणे योग्य वाटत नाही. टत नाही.

1.31

निमित्तानि च पश्यामि, विपरीतानि केशव।
न च श्रेयोऽनुपश्यामि, हत्वा स्वजनमाहवे।।1.31।।

हे केशवा, मला विपरीत चिन्हे दिसत आहेत. युद्धात आप्तांना मारून कल्याण होईल, असे मला वाटत नाही

1.31 - अनेक बाजूंनी विचार करून पाहिले, येथे युद्ध करणे अयोग्य होईल. हे युद्ध जर टळले तर कदाचित लाभच होईल. केशवा! मला विपरीत चिन्हे  दिसत आहे. कुत्रे रडत आहेत, पशुपक्षी ओरडत आहेत, धवल चंद्र काळा दिसतो आहे. यामुळे माझे मन व्यथित झाले आहे.
 आज-काल कार्पोरेट ऑफिसेस मध्ये मनाचे परिवर्तन होण्यासाठी अनेक कार्यक्रम योजले जातात. त्यावर कौशल्य कसे प्राप्त करायचे हे शिकवलेेे जाते . त्यामुळे कामाची गती वाढवून कामगारांकडून योग्य काम करून घेता येते.
 जपानच्या हिरोशिमा वर जेव्हा अमेरिकेने बॉम्ब टाकला तेव्हा जपान बेचिराख झाले होते. त्यानंतर तो देश फिनिक्स पक्षाप्रमाणेेेे राखेतून उठला. एका सफाई कामगाराला त्याच्या कामाबद्दल विचारले असता  तो म्हणाला मी माझे काम माझ्या देशाची मान उंच होण्यासाठी करतो. इथे येणारा कामगार प्रसन्न होऊन जातो.यामुळे आमच्या देशातील उत्पादन वाढते आणि परकीय चलन मिळते. अर्जुन आपला उद्देश विसरला आहे.

1.32

न काङ्क्षे विजयं(ङ्) कृष्ण, न च राज्यं(म्) सुखानि च।
किं(न्) नो राज्येन गोविन्द, किं(म्) भोगैर्जीवितेन वा।।1.32।।

हे कृष्णा! मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखाचीही नाही. हे गोविन्दा! आम्हांला असे राज्य काय करायचे? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे?

1.32 - विजयप्राप्तीच्या लाभाशी मला काहीच कर्तव्य नाही. अशा पद्धतीने घेतलेले राज्य काय कामाचे? युद्ध करून सुखाचा उपभोग घेण्यापेक्षा युद्ध न करता काहीही सहन करावे लागले तरी हरकत नाही. आमचे प्राण गेले तरी पर्वा नाही असे अर्जुन म्हणतो.

1.33

येषामर्थे काङ्क्षितं(न्) नो, राज्यं(म्) भोगाः(स्) सुखानि च।
त इमेऽवस्थिता युद्धे, प्राणांस्त्यक्त्वा धनानि च।।1.33।।

आम्हांला ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत, तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत.

1.33- इतक्या लोकांचे प्राण जाण्यापेक्षा मी संन्यास घेतो. आता अर्जुनाच्या मनात आत्महत्येचा विचार येतो आहे. तो म्हणतो मी माझ्या गुरुजनांना पितामहांना कसा मारू?

1.34

आचार्याः(फ्) पितरः(फ्) पुत्रास्, तथैव च पितामहाः।
मातुलाः(श्) श्चशुराः(फ्) पौत्राः(श्), श्यालाः(स्) सम्बन्धिनस्तथा।।1.34।।

गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेहुणे, त्याचप्रमाणे इतर आप्त आहेत.

1.34 - पलीकडे भीष्म द्रोण आहेत ज्यांचे आमच्यावर  उपकार आहेत. या ठिकाणी मेव्हणे,  सासरे, मामा  सगळे भाऊ, मुले, नातवंडे असे सगळे स्व- जन आहे. हे सगळे आमच्या जवळचे आहेत. याचा वध करावा असे तोंडाने बोलणे सुद्धा पाप आहे.

1.35

एतान्न हन्तुमिच्छामि, घ्नतोऽपि मधुसूदन।
अपि त्रैलोक्यराज्यस्य, हेतोः(ख्) किं(न्) नु महीकृते।।1.35।।

हे मधुसूदना! हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारू इच्छित नाही. मग पृथ्वीची काय कथा?

1.35 - मात्र हे सगळे मला मारणार असतील तर हरकत नाही. त्यांचा वध करून संपूर्ण जगाचे राज्य जरी मला लाभणार असेल तरीसुद्धा मी हे अनुचित कृत्य करणार नाही. जर आम्ही असे केले तर आमच्याबद्दल कोणाच्या मनात आदर राहणार नाही.
 दुर्योधनाने स्त्रीचे वस्त्रहरण केले आहे आणि अन्यायाने राज्य मिळवले आहे. आततायी ची सहा लक्षणे आहेत. आग लावणारे, विष देणारे, जमीन  हडप करणारे, स्त्रीचे वस्त्रहरण करणारे,  छल कपटाने राज्य मिळवणारे , इत्यादी सर्व पापे कौरवांनी केले आहे. कृष्ण म्हणतो, अर्थशास्त्र हे धर्मशास्त्रापेक्षा बलवान असल्याने हे पाप होणार नाही.  अर्जुनाचेेेे मनोबल वाढवण्यासाठी हा मनमोहन त्याच्यासोबत आहे. प्रत्येक नकारात्मक विचारापासून तो अर्जुनाला दूर ठेवतो. 

1.36

निहत्य धार्तराष्ट्रान्नः(ख्), का प्रीतिः(स्) स्याज्जनार्दन।
पापमेवाश्रयेदस्मान्, हत्वैतानाततायिनः।।1.36।।

हे जनार्दना! धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हांला कोणते सुख मिळणार? या आततायींना मारून आम्हाला पापच लागणार.

1.36 - जर मी माझ्या बांधवांचा नाश केला तर सर्व दोषांचा अधिकारी होईल. माझ्या पुण्यामुळे तू मला मिळालास पण आता सगळ्यांना मारल्याने पाप होणार आहे देवा तू माझ्यापासून दूर जाशील. 

1.37

तस्मान्नार्हा वयं(म्) हन्तुं(न्), धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान्।
स्वजनं(म्) हि कथं(म्) हत्वा, सुखिनः(स्) स्याम माधव।।1.37।।

म्हणूनच हे माधवा! आपल्या बान्धवांना-धृतराष्ट्रपुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही. कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार?

1.37 - म्हणून मी हे भलते कृत्य करणार नाही. तुझी माझी ताटातूट झाल्यास माझ्याजवळ काय उरेल? कौरवाना मारून सुखोपभोग घेणे ही गोष्ट मी करणार नाही असे अर्जुन म्हणाला.

1.38

यद्यप्येते न पश्यन्ति, लोभोपहतचेतसः।
कुलक्षयकृतं(न्) दोषं(म्), मित्रद्रोहे च पातकम्।।1.38।।

जरी लोभापायी बुद्धी भ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्रांशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी

1.38 writeup

1.39

कथं(न्) न ज्ञेयमस्माभिः(फ्), पापादस्मान्निवर्तितुम्।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन।।1.39।।

हे जनार्दना! कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारादोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापा पासून परावृत्त होण्याचा विचार का बरं करू नये!

1.38-1.39-आपण आपल्या स्वजनांना मारावे हे कसे हितकारक आहे? लोभाने आपल्या कुळातील लोकांचा संहार करणे आणि मित्र द्रोह करणे कौ -रवाना जरी पाप दिसत नसले तरी हे उचित  कृत्य नाही हे मी जाणतो. हे जनार्दना, कुलक्षया पासून निर्माण होणारा दोष दिसत असून, त्या पापा पासून अलिप्त मी का होऊ नये?
 आपण गीता शिकतो त्यामुळेेेेेेेेेेेेेेेेे आपल्याबरोबर समाजाचे कल्याणही आपल्याला समजायला हवे. संघशक्ती कलियुगेेअसे म्हणतात त्यामुळे सर्वांचा विचार करून तू युद्ध कर. आततायीना कमी करण्यासाठी, पृथ्वीवरील पापी लोकांना कमी करण्यासाठी तू लढ.

1.40

कुलक्षये प्रणश्यन्ति, कुलधर्माः(स्) सनातनाः।
धर्मे नष्टे कुलं(ङ्) कृत्स्नम्, अधर्मोऽभिभवत्युत।।1.40।।

कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते.

1.40 - एकाच कुळात जन्म घेतलेल्यांनी मत्सर बुद्धीने परस्परांचा वध केला तर त्या भयंकर महापापाने संपूर्ण कुळाचा नाश होतो. या पापाने वंशपरंपरागत प्राचीन धर्माचा अस्त होतो आणि नंतर कुळामध्ये अधर्म शिरतो.

1.41

अधर्माभिभवात्कृष्ण, प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय, जायते वर्णसङ्करः।।1.41।।

हे कृष्णा! पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वार्ष्णेया! स्त्रिया बिघडल्या असता वर्णव्यवस्थेचा नाश होतो.

1.41 - कृष्णा असे घडल्याने चांगल्या गोष्टी नाहीशा होतात. कुळातील प्राचीन परंपरागत असलेला धर्म नष्ट होतो आणि पापा शिवाय त्या कुळात काही उरत नाही. इंद्रियांकडून स्वैराचार होतो.  कुलीन स्त्रिया व्यभिचारी होतात. उत्तम वर्णातील स्त्रिया अधम वंशातील पुरुषांशी संग करतात, आणि यामुळे सगळे जाती धर्म मुळापासून उखडले जातात.

1.42

सङ्करो नरकायैव, कुलघ्नानां(ङ्) कुलस्य च।
पतन्ति पितरो ह्येषां(ल्ँ), लुप्तपिण्डोदकक्रियाः॥1.42॥

वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो. कारण श्राद्ध, जलतर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात.

1.42- वंशातील संकर दोषामुळे सर्व प्रजेचे अध:पतन होते. यामुळे स्वर्गातील गेलेले पूर्वज स्वर्गातून खाली ढकलले जातात. तर्पण इत्यादी क्रियांचा लोप झाल्याने पितर नरकात पडतात.

1.43

दोषैरेतैः(ख्) कुलघ्नानां(व्ँ), वर्णसङ्करकारकैः।
उत्साद्यन्ते जातिधर्माः(ख्), कुलधर्माश्च शाश्वताः॥1.43॥

या वर्णसंकर करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जातिधर्म आणि कुळधर्म उध्वस्त होतात.

1.43-

1.44

उत्सन्नकुलधर्माणां(म्), मनुष्याणां(ञ्) जनार्दन।
नरकेऽनियतं(व्ँ) वासो, भवतीत्यनुशुश्रुम॥1.44॥

हे जनार्दना! ज्यांचे कुळधर्म नाहीसे झाले आहेत, अशा माणसांना अनिश्चित काळपर्यंत नरकात पडावे लागते, असे आम्ही ऐकत आलो आहोत.

1.44 writeup

1.45

अहो बत महत्पापं(ङ्), कर्तुं(व्ँ) व्यवसिता वयम्।
यद्राज्यसुखलोभेन, हन्तुं(म्) स्वजनमुद्यताः॥1.45॥

अरेरे! किती खेदाची गोष्ट आहे! आम्ही बुद्धिमान असून राज्य आणि सुख यांच्या लोभाने कुटुंबियांना ठार मारायला तयार झालो, हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो बरे!

1.43-1.44-1.45- आणखी एक पापदोष घडतो. भ्रष्ट लोकांसोबत राहणारे भ्रष्टाचारी होतात. ते नरकवास भोगतात. मी एकदा का या नरकात पडले तर त्या कुळाची कल्पाच्या अंतापर्यंत मुक्तता होत नाही. असे सगळे अर्जुन म्हणतो. पुढे तो म्हणतो की हे सगळे कळल्यावर सुद्धा तुम्हाला माझा तिरस्कार का वाटत नाही? राज्य सूख भोगण्यासाठी जे शरीर आहे ते सुद्धा नाश पावणारे आहे. म्हणून मी या पापाचा त्याग का करू नये? पितृतुल्य माणसांचा वध करायचा कल्पना सुद्धा पापाचीच आहे.

1.46

यदि मामप्रतीकारम्, अशस्त्रं(म्) शस्त्रपाणयः।
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्, तन्मे क्षेमतरं(म्) भवेत्।।1.46।।

जरी शस्त्ररहित व प्रतीकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारले, तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल.

1.46 - यानंतर जिवंत राहण्यापेक्षा शस्त्र हातातून सोडणे जास्त योग्य आहे. ते केल्याने मृत्यू आला तरी चांगलेच आहे. पाप कर्म करून राज्य मिळवावे असे मला कधीच वाटणार नाही. कारण स्वकीयांना मारणे म्हणजे नरकयातना भोगणे होय.

1.47

सञ्जय उवाच
एवमुक्त्वार्जुनः(स्) संख्ये, रथोपस्थ उपाविशत्।
विसृज्य सशरं(ञ्) चापं(म्), शोकसंविग्नमानसः।।1.47।।

संजय म्हणाला, रणांगणावर दुःखाने उद्विग्न मन झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला.

1.47 - संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजा तू इकडे लक्ष दे. अर्जुन युद्धप्रसंगी असे म्हणाला आणि त्यानंतर तो अतिशय उदास झाला आणि त्याला रडू आले. त्याने रथातून खाली उडी घेतली. त्याने शस्त्र खाली टाकले आणि त्याला अश्रू आवरेना. आता पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला कोणता उपदेश करणार आहे हे पुढच्या अध्यायात ऐकणे योग्य ठरेल.
    अशातऱ्हेने अर्जुनाची मनोव्यथा सांगणारा हा अध्याय आहे. प्रार्थनेने या अध्यायाची सांगता झाली.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां(य्ँ) योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्याय:।।