विवेचन सारांश
यज्ञ - साहचर्य योग
प्रार्थना, दीपप्रज्वलन, गुरुवंदना, कृष्णवंदना आणि भगवद्गीता ध्यान यांचे पठण करत आणि गुरुदेव गोविंद गिरी महाराजांना वंदन करून सत्राचा आरंभ झाला.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंदविग्रहम्।
पूर्णब्रह्मपरानंदमीशमाळन्दिवल्लभम्॥
वसुदेवसुतं देवं कंसचाणुरमर्दनम्।
देवकीपरमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्॥
देवकीपरमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्॥
रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीम्।
ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्॥
ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं
व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्।
अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीं
अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्॥
अधर्माविरुद्ध लढायला सिद्ध झालेल्या अर्जुनाचे शत्रुपक्षात असलेले आप्तेष्ट, वडीलधार्या व्यक्ती आणि गुरुजन यांना पाहिल्यावर अवसान गळाले त्यावेळी भगवंतांनी समरांगणात अर्जुनाच्या निमित्ताने समस्त मानवजातीला जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी श्रीमद्भगवद्गीतेचा उपदेश केला. याच गीतेतील या तिसऱ्या अध्यायातून आपण निष्काम कर्मयोगाच्या माध्यमातून ईश्वराशी कसे जोडले जातो याचे ज्ञान मिळते.
आपल्या स्वभावानुसार आपल्या वाट्याला आलेले कर्म सोडून देऊन आपण संन्यासी झालो आहोत हे मानणे व्यर्थ असते.
परिस पां सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची ।
अधर्माविरुद्ध लढायला सिद्ध झालेल्या अर्जुनाचे शत्रुपक्षात असलेले आप्तेष्ट, वडीलधार्या व्यक्ती आणि गुरुजन यांना पाहिल्यावर अवसान गळाले त्यावेळी भगवंतांनी समरांगणात अर्जुनाच्या निमित्ताने समस्त मानवजातीला जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी श्रीमद्भगवद्गीतेचा उपदेश केला. याच गीतेतील या तिसऱ्या अध्यायातून आपण निष्काम कर्मयोगाच्या माध्यमातून ईश्वराशी कसे जोडले जातो याचे ज्ञान मिळते.
आपल्या स्वभावानुसार आपल्या वाट्याला आलेले कर्म सोडून देऊन आपण संन्यासी झालो आहोत हे मानणे व्यर्थ असते.
परिस पां सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची ।
खंती करिती कर्माची । ते गांवढे गा ॥
देह लाभूनही ज्यांना कर्म नकोसं वाटतं, त्यांना माऊली अडाणी म्हणतात.
आपले कर्तव्यकर्म करत असताना ते फलाची अपेक्षा सोडून केले म्हणजेच निष्काम कर्मयोगाचे आचरण केले, तरंच मन शांत राहून शरीराकडून कर्तव्यकर्म तर होत राहते पण मन त्या कर्माच्या फलाने लिप्त होत नाही म्हणून तो निष्काम कर्मयोगी बद्ध होत नाही.
या सृष्टीत सारे काही परस्परावलंबी आहे आणि संघभावनेतून परस्पर सहकार्याने सर्वांनी आपापले सर्वांचे कल्याण साधावे ही यज्ञ संकल्पना आपण समजावून घेतली.
3.10
सहयज्ञाः(फ्) प्रजाः(स्) सृष्ट्वा, पुरोवाच प्रजापतिः।
अनेन प्रसविष्यध्वम्, एष वोऽस्त्विष्टकामधुक्॥3.10॥
प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करुन त्यांना सांगितले की, तुम्ही या यज्ञाच्याद्वारे उत्कर्ष करुन घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा होवो.
भगवंत सांगतात की जेव्हा सृष्टीकर्ता भगवान ब्रह्मांनी सृष्टीरचना केली तेव्हा त्यांनी यज्ञासहीतच सर्व जीव उत्पन्न केले. आपल्या हिंदू संस्कृतीतील संकल्पनेनुसार भगवान ब्रह्मा सृष्टीचे निर्माता (Generator) आहेत, भगवान विष्णु पालनकर्ता (Operator) आहेत आणि भगवान शिव संहारकर्ता (Destroyer) असे हे त्रिदेव GOD आहेत.
यज्ञ म्हटले की आपल्या नजरेसमोर अग्नीला आहुती समर्पण करून इष्ट देवतांना प्रसन्न करण्याचा विधी येतो आणि तो ही यज्ञ आहेच. पण इथे यज्ञ म्हणजे त्याग, देणे हा अर्थ अभिप्रेत आहे. या सृष्टीत आपण ज्याचा ज्याचा उपभोग घेतो ते समाजातील कुणाच्या तरी श्रमदानातून आणि धनदानातून तयार झाले आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचले आहे. त्याचप्रमाणे आपल्याही श्रमदानातून आणि/किंवा धनदानातून आपण समाजाला परतफेड केली पाहिजे. या परस्परावलंबीत्वावर समाजजीवन चालते.
गुरुदेव गोविंद देव गिरि जी श्रीराम मंदिराच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत त्याच वेळी त्यांनी ही गीतेची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचावी म्हणून अगणित स्वयंसेवक तयार केले आहेत आणि हा घर घर गीता ज्ञानयज्ञ संपन्न होत आहे. असे कितीतरी कर्मयोगी आजही यज्ञकर्म चालवत आहेत.
सृष्टीकर्ता भगवान ब्रह्मांनी जीवांना अशाच याआधी सांगितलेल्या यज्ञपद्धतीची कर्मेही नियुक्त केली आहेत जी एकमेकांवर अवलंबून आहेत. सृष्टीमधील सर्व जीव परस्परावलंबी आहेत. त्यांना त्यांच्या स्वभावानुसार नेमून दिलेल्या कर्तव्यकर्माचे त्यांनी आचरण केले तर त्यांच्या मनातील इच्छा आपोआप पूर्ण होतील.
ज्ञानेश्वर माऊली समजावून सांगतात त्याप्रमाणे:-
स्वर्धमु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पां ।
म्हणौनि वर्ततां तेथ पापा । संचारु नाहीं ॥
अरे बाबा, आपले जे स्वभावानुसार नेमून दिलेले कर्तव्यकर्म आहे तोच नित्ययज्ञ आहे, असे समज. त्याचे आचरण करत असतांना त्यात पापाचा प्रवेश होत नाही.
देवान्भावयतानेन, ते देवा भावयन्तु वः।
परस्परं(म्) भावयन्तः(श्), श्रेयः(फ्) परमवाप्स्यथ॥3.11॥
तुम्ही या यज्ञाने देवतांची पुष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हाला पुष्ट करावे. अशा प्रकारे निःस्वार्थीपणाने एकमेकांची उन्नती करीत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल.
ज्याप्रमाणे कारभार सुरळीत चालू ठेवण्यासाठी विविध विभाग आणि विभागप्रमुख असतात तसेच सृष्टीच्या संचालनासाठी विविध देवता कार्यरत असतात. स्वतःच्या स्वभावधर्मानुसार केलेल्या कर्तव्यकर्माच्या आचरणामुळे या सर्व देवता प्रसन्न होऊन वांछित फल देतात.
मागील श्लोकात आपण पाहिले की प्रस्तुत विवेचनात यज्ञ म्हणजे त्याग, देणे हा अर्थ अभिप्रेत आहे. या सृष्टीत आपण ज्याचा ज्याचा उपभोग घेतो ते ते समाजातील कुणाच्या तरी श्रमदानातून आणि धनदानातून तयार झाले आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचले आहे. त्याचप्रमाणे आपल्याही श्रमदानातून आणि/किंवा धनदानातून आपण समाजाला परतफेड केली पाहिजे. या परस्परावलंबीत्वावर समाजजीवन चालते.
इथे व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्ठी या संकल्पना समजावून घ्यायला पाहिजेत. व्यष्टी म्हणजे व्यक्ती, समष्टी म्हणजे संपूर्ण मानव समुदाय, सृष्टी म्हणजे संपूर्ण विश्व आणि परमेष्ठी म्हणजे ब्रह्म किंवा ईश्वर. जेव्हा माणूस समष्टी, सृष्टी आणि परमेष्ठी या तिघांशी सुसंवाद साधून आपले जीवन जगतो, तेव्हाच त्याचे जीवन आनंदी आणि सार्थक होते.
आपण ज्या पृथ्वीवर रहातो, जे पाणी पितो, जे अन्न सेवन करतो; त्यापैकी आपण काय बनवलं आहे? यातले बहुतेक आपल्याला समाज, निसर्ग आणि ईश्वरी कृपेनेच मिळत असते. आपल्याला या सर्वांच्या ऋणाची जाणीव ठेवून अंशतः तरी ऋणमुक्त होण्याचा प्रयास केला पाहिजे.
मनुष्यावर ऋषि, समाज, देवता आणि पितर अशी चार प्रकारची ऋणं असतात. प्राचीन काळापासून विविध द्रष्ट्यांनी प्राप्त करून दिलेले ज्ञान गुरुदेवांनी सुरू केलेला हा गीता यज्ञ ही सर्व ऋषि ऋणाची उदाहरणे आहेत. याचप्रमाणे समाज, देवता आणि पूर्वज (यात मातापिताही आले) यांचे ऋण असते. या ऋणांतून मुक्त होणे अशक्यप्राय वाटले तरी मनात त्या ऋणांची जाणीव ठेवून कृतज्ञतेच्या भावनेने केलेली छोटी छोटी कर्मेही अंशतः ऋणमुक्त व्हायला मदत करतात.
त्यामुळे आपले स्वतःचे कल्याण साधतानाच आपले कुटुंब, आपला समाज, आपले राष्ट्र आणि विश्व या सार्यांची उन्नती साधावी हा येथे सार्यांना संदेश दिला आहे.
मागील श्लोकात आपण पाहिले की प्रस्तुत विवेचनात यज्ञ म्हणजे त्याग, देणे हा अर्थ अभिप्रेत आहे. या सृष्टीत आपण ज्याचा ज्याचा उपभोग घेतो ते ते समाजातील कुणाच्या तरी श्रमदानातून आणि धनदानातून तयार झाले आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचले आहे. त्याचप्रमाणे आपल्याही श्रमदानातून आणि/किंवा धनदानातून आपण समाजाला परतफेड केली पाहिजे. या परस्परावलंबीत्वावर समाजजीवन चालते.
इथे व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्ठी या संकल्पना समजावून घ्यायला पाहिजेत. व्यष्टी म्हणजे व्यक्ती, समष्टी म्हणजे संपूर्ण मानव समुदाय, सृष्टी म्हणजे संपूर्ण विश्व आणि परमेष्ठी म्हणजे ब्रह्म किंवा ईश्वर. जेव्हा माणूस समष्टी, सृष्टी आणि परमेष्ठी या तिघांशी सुसंवाद साधून आपले जीवन जगतो, तेव्हाच त्याचे जीवन आनंदी आणि सार्थक होते.
आपण ज्या पृथ्वीवर रहातो, जे पाणी पितो, जे अन्न सेवन करतो; त्यापैकी आपण काय बनवलं आहे? यातले बहुतेक आपल्याला समाज, निसर्ग आणि ईश्वरी कृपेनेच मिळत असते. आपल्याला या सर्वांच्या ऋणाची जाणीव ठेवून अंशतः तरी ऋणमुक्त होण्याचा प्रयास केला पाहिजे.
मनुष्यावर ऋषि, समाज, देवता आणि पितर अशी चार प्रकारची ऋणं असतात. प्राचीन काळापासून विविध द्रष्ट्यांनी प्राप्त करून दिलेले ज्ञान गुरुदेवांनी सुरू केलेला हा गीता यज्ञ ही सर्व ऋषि ऋणाची उदाहरणे आहेत. याचप्रमाणे समाज, देवता आणि पूर्वज (यात मातापिताही आले) यांचे ऋण असते. या ऋणांतून मुक्त होणे अशक्यप्राय वाटले तरी मनात त्या ऋणांची जाणीव ठेवून कृतज्ञतेच्या भावनेने केलेली छोटी छोटी कर्मेही अंशतः ऋणमुक्त व्हायला मदत करतात.
त्यामुळे आपले स्वतःचे कल्याण साधतानाच आपले कुटुंब, आपला समाज, आपले राष्ट्र आणि विश्व या सार्यांची उन्नती साधावी हा येथे सार्यांना संदेश दिला आहे.
इष्टान्भोगान्हि वो देवा, दास्यन्ते यज्ञभाविताः।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो, यो भुङ्क्ते स्तेन एव सः॥3.12॥
यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हाला न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहतील. अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो पुरुष स्वतः खातो, तो चोरच होय.
म्हणून स्वधर्माचे आचरण सोडू नये. इंद्रियांना भलत्याच मार्गाला जाऊ देऊ नये. निष्काम कर्मयोगाचे आचरण केले असताना देवताही फल देत असतात, मात्र सर्व संपदा प्राप्त झाली असता इतरांचा विचार न करता जो एकट्यानेच तिचा उपभोग घेण्यात रमतो आणि स्वभावानुरूप कर्तव्यकर्म आचरणाच्या मार्गाने जो यज्ञ करत नाही तो चोरच समजला जातो आणि त्याला त्याने मिळवलेले भोग सुद्धा भोगावयाचे आत्मस्वातंत्र्य मिळत नाही.
ज्ञानेश्वर माऊली समजावतात त्याप्रमाणे
म्हणौनि स्वधर्मु जो सांडील । तयातें काळु दंडील ।
चोरु म्हणौनि हरील । सर्वस्व तयाचें ॥
म्हणौनि स्वधर्मु जो सांडील । तयातें काळु दंडील ।
चोरु म्हणौनि हरील । सर्वस्व तयाचें ॥
म्हणून आपला धर्म जो टाकील त्याला यमधर्म शिक्षा करील व तो केवळ चोर आहे असे समजून त्याची मालमत्ता हिरावून घेईल.
यज्ञशिष्टाशिनः(स्) सन्तो, मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः।
भुञ्जते ते त्वघं(म्) पापा, ये पचन्त्यात्मकारणात्॥3.13॥
यज्ञ करुन शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतात. पण जे पापी लोक स्वतःच्या शरीर-पोषणासाठी अन्न शिजवतात, ते तर पापच खातात.
यज्ञशिष्टाशिन: म्हणजे यज्ञ करून उरलेले अन्न. इथे अन्न हा प्रत्येक इंद्रियाचा आहार हा अर्थ लक्षात घ्यावा. रूप, रस, गंध, ध्वनी आणि स्पर्श हे इंद्रियांचे आहार असतात. हा आहार सेवन करताना
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे॥
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म॥
मुखात घास घेतेवेळी श्री हरीचे नाव घ्यावे, ज्याला काहीच खर्च करायला लागत नाही असे नाव घेतल्याने सहजच यज्ञ होतो. आपल्या शरीराचे पोषण करणारे अन्न हे पूर्ब्रणह्म आहे. जेवण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही तर एक यज्ञकर्म आहे म्हणून समजा असे समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत. हा यज्ञ म्हणजे आदानप्रदानाची क्रिया आहे. आदान म्हणजे घेणे आणि प्रदान म्हणजे देणे.
अशा आदानप्रदानाने जो आपल्या स्वभावानुसार विहित कर्माच्या रूपातील यज्ञ आणि निर्हेतुक बुद्धीने समाजकार्य करण्यात जवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करून जे शिल्लक राहील त्याचा सहपरिवार उपभोग घेतो, तो पापाच्या तडाख्यात सापडत नाही.
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे॥
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म॥
मुखात घास घेतेवेळी श्री हरीचे नाव घ्यावे, ज्याला काहीच खर्च करायला लागत नाही असे नाव घेतल्याने सहजच यज्ञ होतो. आपल्या शरीराचे पोषण करणारे अन्न हे पूर्ब्रणह्म आहे. जेवण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही तर एक यज्ञकर्म आहे म्हणून समजा असे समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत. हा यज्ञ म्हणजे आदानप्रदानाची क्रिया आहे. आदान म्हणजे घेणे आणि प्रदान म्हणजे देणे.
अशा आदानप्रदानाने जो आपल्या स्वभावानुसार विहित कर्माच्या रूपातील यज्ञ आणि निर्हेतुक बुद्धीने समाजकार्य करण्यात जवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करून जे शिल्लक राहील त्याचा सहपरिवार उपभोग घेतो, तो पापाच्या तडाख्यात सापडत नाही.
म्हणून स्वधर्माचरणाने जे मिळेल ते इतरांनाही देत देत त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा.
अन्नाद्भवन्ति भूतानि, पर्जन्यादन्नसम्भवः।
यज्ञाद्भवति पर्जन्यो, यज्ञः(ख्) कर्मसमुद्भवः॥3.14॥
सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्ननिर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ विहित कर्मांमुळे घडतो. कर्मसमुदाय वेदांपासून व वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत, असं समज. यावरून हेच सिद्ध होते की, सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो.
या दोन श्लोकांमध्ये सृष्टीचे चक्र हा ही एक यज्ञ आहे हे स्पष्ट केले आहे. सर्व सजीव अन्नापासून उत्पन्न होतात आणि वाढतात. हे अन्न धरतीत निसर्गतः रुजलेल्या किंवा कोणी पेरलेल्या बियाणांवर पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाढत असते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो.
कर्म ब्रह्मोद्भवं(व्ँ) विद्धि, ब्रह्माक्षरसमुद्भवम्।
तस्मात्सर्वगतं(म्) ब्रह्म, नित्यं(य्ँ) यज्ञे प्रतिष्ठितम्॥3.15॥
यावरुन हेच सिद्ध होते की, सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो.
वेदांच्या उपदेशांमुळे कर्म घडत असते. सर्वव्यापी ब्रह्म वेदांना उत्पन्न करते. म्हणून ब्रह्म कर्मरूप यज्ञामध्ये प्रतिष्ठित असते. जिकडे निस्वार्थीपणे कार्यरत असलेले कर्मयोगी असतात, तिकडे ईश्वराचा निवास असतो. त्यामुळे सर्वात्मका शिवसुंदरा या प्रार्थनेत कुसुमाग्रज ईश्वराला सांगतात,
स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे तुझे पद पावना
स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे तुझे पद पावना
या सृष्टीचक्राचे भान ठेवणारा एक वयोवृद्ध माळी आंब्याच्या कोयी जमिनीत पेरत होता. ते पाहून काही लोक त्याला विचारू लागले,“या कोयी रुजणार कधी, यांची झाडं होणार कधी आणि त्यांना फळं येणार कधी? तोपर्यंत तू जिवंत असशील का?”
त्यावर त्या वयोवृद्ध माळ्याने उत्तर दिले,“खरे आहे, मी नसेन, पण माझ्या आधीच्या पिढीने असेच कष्ट घेतले, त्यांच्या कष्टाचे फळ आज मला मिळत आहे तसेच मी पेरत असलेल्या कोयी रुजून, त्यांची झाडं होऊन त्यांना फळं लागली की त्या फळांचा आस्वाद घ्यायला नवी पिढी असेल ना”!
एवं(म्) प्रवर्तितं(ञ्) चक्रं(न्), नानुवर्तयतीह यः।
अघायुरिन्द्रियारामो, मोघं(म्) पार्थ स जीवति॥3.16॥
हे पार्था! जो पुरुष या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरुन वागत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, तो इंद्रियांच्याद्वारे भोगात रमणारा पापी आयुष्य असलेला पुरुष व्यर्थच जगतो.
आधीच्या श्लोकात समजावून सांगितले त्याप्रमाणे सृष्टीचे चक्र हाच निष्काम कर्मयोगाच्या माध्यमातून होणारा एक यज्ञ असतो. जो उन्मत्त मानव या यज्ञात आपल्या निष्काम कर्मयोगाच्या सहभागाची आहुती देत नाही, जो वाईट आचरण करून इंद्रियांचे केवळ लाड पुरवतो तो पापाची राशी असून भूमीला केवळ भार आहे. असे समज.
अशा भूमीला केवळ भार असलेल्या मानवांमुळे निसर्गाचा तोल ढळतो आहे. वनस्पतींचा झपाट्याने र्हास होत आहे. एका सर्वेक्षणातून अशी माहिती मिळाली आहे की कॅनडात प्रतिव्यक्ती नऊ हजार वृक्ष आहेत तर इतर देशांत हेच प्रमाण रशिया साडेचार हजार, ऑस्ट्रेलिया साडेतीन हजार, अमेरिका सातशे तर भारतात अठ्ठावीस असे आहे.
भगवंतांनी ज्या भारत देशात सृष्टीचक्राचे पालन करण्याचा संदेश दिला, त्या भारत देशात आज वृक्षांची ही अवस्था आहे. कारण केवळ आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण आत्मनिर्भर आहोत हा माणसाला वृथा भ्रम होतो. तो हे लक्षात घेत नाही की पैशाने जीवनासाठी आवश्यक वस्तु खरेदी करता येत असल्या तरी पण त्या पैशाला जेव्हा श्रमदानाची जोड असते, तेव्हा त्या तयार होऊन आपल्यापर्यंत पोचतात.
शहरापासून दूर कुठेतरी जलविभागाचे कर्मचारी कार्यरत असतात म्हणून शहरात आपल्याला चोवीस तास पाणी उपलब्ध होते. रणरणत्या उन्हात तापलेल्या वीजेच्या खांबांवर चढून लाईनमन कामं करत असतात म्हणून आपल्याला घरात पंखा किंवा एसी लावून आराम करता येतो. शहरात आपण पहाटेच्या साखरझोपेत असताना स्वच्छता कर्मचारी रस्ते आणि परिसर झाडून आपल्यासाठी स्वच्छ ठेवत असतात. आवश्यकता असते ती त्यांच्या श्रमाची जाणीव ठेवून पाण्याचा किंवा वीजेचा अपव्यय टाळण्याची आणि कचरा व्यवस्थापनाची!!!
जेव्हा हाती पैसा असूनही शरीर असमर्थ झाल्यामुळे मनुष्य परावलंबी होतो तेव्हा आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण आत्मनिर्भर आहोत हा माणसाचा वृथा भ्रम नष्ट होऊन त्याचे डोळे उघडतात. त्यामुळे आपल्या जीवनाचा अर्थ समजून घेऊन त्याचे सार्थक केले पाहिजे.
हे नाथ अब तो ऐसी कृपा हो, जीवन निरर्थक जाने न पाये
अशा भूमीला केवळ भार असलेल्या मानवांमुळे निसर्गाचा तोल ढळतो आहे. वनस्पतींचा झपाट्याने र्हास होत आहे. एका सर्वेक्षणातून अशी माहिती मिळाली आहे की कॅनडात प्रतिव्यक्ती नऊ हजार वृक्ष आहेत तर इतर देशांत हेच प्रमाण रशिया साडेचार हजार, ऑस्ट्रेलिया साडेतीन हजार, अमेरिका सातशे तर भारतात अठ्ठावीस असे आहे.
भगवंतांनी ज्या भारत देशात सृष्टीचक्राचे पालन करण्याचा संदेश दिला, त्या भारत देशात आज वृक्षांची ही अवस्था आहे. कारण केवळ आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण आत्मनिर्भर आहोत हा माणसाला वृथा भ्रम होतो. तो हे लक्षात घेत नाही की पैशाने जीवनासाठी आवश्यक वस्तु खरेदी करता येत असल्या तरी पण त्या पैशाला जेव्हा श्रमदानाची जोड असते, तेव्हा त्या तयार होऊन आपल्यापर्यंत पोचतात.
शहरापासून दूर कुठेतरी जलविभागाचे कर्मचारी कार्यरत असतात म्हणून शहरात आपल्याला चोवीस तास पाणी उपलब्ध होते. रणरणत्या उन्हात तापलेल्या वीजेच्या खांबांवर चढून लाईनमन कामं करत असतात म्हणून आपल्याला घरात पंखा किंवा एसी लावून आराम करता येतो. शहरात आपण पहाटेच्या साखरझोपेत असताना स्वच्छता कर्मचारी रस्ते आणि परिसर झाडून आपल्यासाठी स्वच्छ ठेवत असतात. आवश्यकता असते ती त्यांच्या श्रमाची जाणीव ठेवून पाण्याचा किंवा वीजेचा अपव्यय टाळण्याची आणि कचरा व्यवस्थापनाची!!!
जेव्हा हाती पैसा असूनही शरीर असमर्थ झाल्यामुळे मनुष्य परावलंबी होतो तेव्हा आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण आत्मनिर्भर आहोत हा माणसाचा वृथा भ्रम नष्ट होऊन त्याचे डोळे उघडतात. त्यामुळे आपल्या जीवनाचा अर्थ समजून घेऊन त्याचे सार्थक केले पाहिजे.
हे नाथ अब तो ऐसी कृपा हो, जीवन निरर्थक जाने न पाये
यस्त्वात्मरतिरेव स्याद्, आत्मतृप्तश्च मानवः।
आत्मन्येव च सन्तुष्ट:(स्), तस्य कार्यं(न्) न विद्यते॥3.17॥
परंतु जो मनुष्य आत्म्यातच रमणारा, आत्म्यातच तृप्त आणि आत्म्यातच संतुष्ट असतो, त्याला कोणतेच कर्तव्य उरत नाही.
जो निरंतर आपल्या स्वरूपातच गढलेला आसतो, तोच एक या जगात देहधर्माने युक्त असूनही कर्माने लिप्त होत नाही. तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो. म्हणून त्याचा कर्माशी संबंध सहज सुटलेला असतो. ज्याप्रमाणे पोट भरल्यावर तृप्त झालेला सिंहाला आसपास फिरणाऱ्या प्राण्यांची शिकार करणं तर सोडाच पण त्यांच्याकडे बघायचेही कष्ट घ्यावे लागत नाहीत, त्याप्रमाणे आत्मबोध झाल्याच्या संतुष्ट अवस्थेत कर्माची खटपट सहजच संपते.
तसेच गर्भवती स्त्रीचा गर्भारपणाचा काळ तिच्या उदरात वाढणार्या गर्भासाठी आहार विहार वाचन चिंतन आणि मनन करण्यात व्यतीत होत असतो. नऊ महिने तो गर्भ उदरात वाढल्यानंतर प्रसववेदना सहन करून ती त्याला जन्म देते. त्या मुलाचा जन्म झाला की तिच्या संतुष्ट मनाला आणखी काही हवं असतं का? आत्मबोध झालेल्या संतुष्ट कर्मयोग्याला त्याच्या मनाच्या संतुष्ट अवस्थेत काहीच इच्छा रहात नसल्यामुळे त्याची कर्म करण्याची खटपट सहजच संपते.
तसेच गर्भवती स्त्रीचा गर्भारपणाचा काळ तिच्या उदरात वाढणार्या गर्भासाठी आहार विहार वाचन चिंतन आणि मनन करण्यात व्यतीत होत असतो. नऊ महिने तो गर्भ उदरात वाढल्यानंतर प्रसववेदना सहन करून ती त्याला जन्म देते. त्या मुलाचा जन्म झाला की तिच्या संतुष्ट मनाला आणखी काही हवं असतं का? आत्मबोध झालेल्या संतुष्ट कर्मयोग्याला त्याच्या मनाच्या संतुष्ट अवस्थेत काहीच इच्छा रहात नसल्यामुळे त्याची कर्म करण्याची खटपट सहजच संपते.
नैव तस्य कृतेनार्थो, नाकृतेनेह कश्चन।
न चास्य सर्वभूतेषु, कश्चिदर्थव्यपाश्रयः॥3.18॥
त्या महापुरुषाला या विश्वात कर्मे करण्याने काही प्रयोजन असत नाही. तसेच कर्मे न करण्यानेही काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणिमात्रातही त्याचा जरादेखील स्वार्थाचा संबंध असत नाही.
जोपर्यंत मनाला आत्मबोध होऊन मन शांत होत नाही तोपर्यंतच या साधनांची खटपट करावी लागते. आत्मबोध झालेल्या महापुरुषाने कर्म केले तरी चालेल किंवा नाही केले तरी चालेल अशी त्याची परिस्थिती असते. अशा महापुरुषाच्या इतर लोकांशी असलेल्या वर्तणुकीत कुठेही स्वार्थाचा लवलेशही नसतो. साधना करून आत्मबोध झालेले संत तुकाराम महाराज स्वत:साठी काहीच करत नव्हते. त्यांनी स्वत:ची अवस्था पुढील शब्दांत सांगितली आहे:-
तुका म्हणे आता। उरलो उपकारापुरता॥
अणुरेणियां थोकडा। तुका आकाशाएवढा॥
तुका म्हणे आता। उरलो उपकारापुरता॥
अणुरेणियां थोकडा। तुका आकाशाएवढा॥
तस्मादसक्तः(स्) सततं(ङ्), कार्यं(ङ्) कर्म समाचर।
असक्तो ह्याचरन्कर्म, परमाप्नोति पूरुषः॥3.19॥
म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्यकर्म नीट करीत रहा. कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो.
गीतेमध्ये सर्व ठिकाणी भगवंत सिद्ध पुरुषांची उदाहरणे देतात व नंतर अर्जुनाला त्याने काय करावे हे सांगतात. आपण अर्जुनाच्या पंगतीत बसून त्या उपदेशाचा लाभ घेत असतो.
आत्मबोध झालेल्या महापुरुषाने कर्म नाही केले तरी चालेल अशी त्याची परिस्थिती असली तरी त्याने कर्म केले नाही तर इतर सर्वसामान्य माणसासमोर तो काय उदाहरण ठेवेल? कर्म नाही केले तरी चालेल असे भगवंत म्हणाले आहेत, करू नये असे म्हणालेले नाहीत.
म्हणून भगवतांनी अर्जुनाला आणि त्याच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना सर्व आसक्ती टाकून देऊन निरंतर आपल्या स्वभावानुसार अनुकूल असलेले कर्तव्यकर्म करत रहायचा उपदेश केला आहे. प्रत्येक कर्माचे फळ निश्चित असले तरी त्याचे स्वरूप अगणित घटकांवर आधारित असल्यामुळे ते आपल्याला हवे तसेच असेल असे निश्चित नसते.
तया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्मकुसुमांची वीरा।
पूजा केली होय अपारा। तोषालागी॥
हे वीर अर्जुना,आपण केलेली कर्तव्यकर्मे हीच जणू फुले आहेत, त्या फुलांनी सर्वात्मक ईश्वराची पूजा केल्यास त्याला परमसंतोष होतो.
आत्मबोध झालेल्या महापुरुषाने कर्म नाही केले तरी चालेल अशी त्याची परिस्थिती असली तरी त्याने कर्म केले नाही तर इतर सर्वसामान्य माणसासमोर तो काय उदाहरण ठेवेल? कर्म नाही केले तरी चालेल असे भगवंत म्हणाले आहेत, करू नये असे म्हणालेले नाहीत.
म्हणून भगवतांनी अर्जुनाला आणि त्याच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना सर्व आसक्ती टाकून देऊन निरंतर आपल्या स्वभावानुसार अनुकूल असलेले कर्तव्यकर्म करत रहायचा उपदेश केला आहे. प्रत्येक कर्माचे फळ निश्चित असले तरी त्याचे स्वरूप अगणित घटकांवर आधारित असल्यामुळे ते आपल्याला हवे तसेच असेल असे निश्चित नसते.
तया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्मकुसुमांची वीरा।
पूजा केली होय अपारा। तोषालागी॥
हे वीर अर्जुना,आपण केलेली कर्तव्यकर्मे हीच जणू फुले आहेत, त्या फुलांनी सर्वात्मक ईश्वराची पूजा केल्यास त्याला परमसंतोष होतो.
म्हणून जे निष्काम बुद्धीने आपल्या स्वभावानुसार अनुकूल असलेले कर्तव्यकर्म करत रहावे आणि जे काही फळ मिळेल त्यावर संतुष्ट रहावे असे वागणारे ते सर्वसामान्य लोक परमात्म्याला प्राप्त करतात. अशा प्रकारे या श्लोकात सर्वसामान्य लोकांसाठी कर्मयोगाचा उपदेश केला आहे.
तसेच हा ही एक गैरसमज आहे की श्रीमद्भगवद्गीतेतून सतत संन्यासाश्रमाचाच पुरस्कार केला आहे, त्यामुळे बाल, युवा वर्गाने याचे शिक्षण घेतले नाही तर उत्तम, ही शिकवण वृद्धावस्थेत कामाला येईल इत्यादी. ज्यांनी गीता सांगितली ते भगवान श्रीकृष्ण गृहस्थाश्रमी, ज्याला सांगितली तो अर्जुनही गृहस्थाश्रमी. या गीतेत सर्व मार्गांचा उपदेश आहे तथापि कर्मयोगावर तर विशेष भर आहे. अशी ही गीता सर्वांनाच उपयुक्त आहे पण विशेषत्वाने तरुणांना या गीतेचा उपदेश जीवनभर मार्गदर्शन करतो.
तसेच हा ही एक गैरसमज आहे की श्रीमद्भगवद्गीतेतून सतत संन्यासाश्रमाचाच पुरस्कार केला आहे, त्यामुळे बाल, युवा वर्गाने याचे शिक्षण घेतले नाही तर उत्तम, ही शिकवण वृद्धावस्थेत कामाला येईल इत्यादी. ज्यांनी गीता सांगितली ते भगवान श्रीकृष्ण गृहस्थाश्रमी, ज्याला सांगितली तो अर्जुनही गृहस्थाश्रमी. या गीतेत सर्व मार्गांचा उपदेश आहे तथापि कर्मयोगावर तर विशेष भर आहे. अशी ही गीता सर्वांनाच उपयुक्त आहे पण विशेषत्वाने तरुणांना या गीतेचा उपदेश जीवनभर मार्गदर्शन करतो.
कर्मणैव हि संसिद्धिम्, आस्थिता जनकादयः।
लोकसङ्ग्रहमेवापि, सम्पश्यन्कर्तुमर्हसि॥3.20॥
जनकादी ज्ञानी लोकही आसक्तीरहित कर्मानेच परम सिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील तू कर्म करणेच योग्य.
जे क्षत्रिय आपल्या कर्तव्यकर्माचे पालन करत आत्मज्ञान प्राप्त करून घेतात त्यांना राजर्षि म्हणतात. जनक हे एक राजर्षि होते. सर्व आसक्ती टाकून देऊन निरंतर कर्मयोगाचे पालन करूनच राजा जनकासारख्या राजर्षिंना आत्मज्ञान प्राप्त झाले. मिथिला नगरीच्या राजांना जनक ही उपाधी होती. सीतेचे पिता मिथिला नगरीचे राजा सीरध्वज यांनाही हीच उपाधी होती. ह्या जनकांना विदेही म्हणून ओळखले जात असे कारण देहधारी असूनही त्यांना देहाबद्दल मुळीच आसक्ती नव्हती. ते मूर्तिमंत वैराग्याचा पुतळा होते.
वेदव्यास मुनींचे पुत्र शुक मुनी हे ही महान विरागी होते. तथापि आत्मज्ञानाचा उपदेश करून घेण्यासाठी वेदव्यास मुनींनी शुक मुनींना जनक राजाकडे पाठवले.
जनक राजाने त्यांना लागोपाठ तीन दिवस, तीन रात्री देवडीवरच थांबवून ठेवले. पण त्यांच्या मनात विषाद, खेद, दुःख कोणतीही भावना निर्माण झाली नाही.
त्यानंतर भरपूर मानसन्मान देऊन त्यांना मोठया थाटामाटात राजवाडयात नेले. तिथे सर्व प्रकारच्या सुखसोयी, चैनीचे विविध मार्ग पंचपक्वांनाचे भोजन, गाद्यागिरद्या, नृत्यगायन सगळे काही शुकांच्या दिमतीला तत्पर होते. त्याचा शुकांच्या मनावर काहीही परिणाम झाला नाही.
पुढल्या दिवशी जनकाने दरबारात अनुपम सुंदर अशा नृत्यांगनांचा कार्यक्रम ठेवला. त्या सर्व नृत्यांगना विविध हावभाव, अंगविक्षेप करत होत्या, पण शुकांच्या नजरेतले विरक्तीचे, त्यागाचे भाव क्षणभरही लुप्त झाले नाहीत. नृत्य चालू असताना जनक राजाने दुधाने काठोकाठ भरलेला पेला शुकांच्या हाती दिला आणि म्हणाले, ''ह्यातील एकही थेंब दूध जमिनीवर न सांडता ह्या राजवाडयास सात प्रदक्षिणा घाला.''
शुकांनी पेला हाती घेतला, त्याच्या काठावर आपली नजर स्थिर केली आणि सावकाश चालत सातही फेरे पूर्ण करुन जनकाने जसा त्याच्या पेला दिला होता तसाच काठोकाठ भरलेला पेला जनकाकडे सुपूर्द केला.
अशी अनेकप्रकारे त्यांची परीक्षा घेऊन त्यात शुक मुनी उत्तीर्ण झाल्यानंतरच राजा जनकाने त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश केला.
राजा जनक जसे आत्मज्ञानी होऊनही केवळ परमात्म्यासाठी सत्कार्यासाठी लोकांना संघटित करण्याचे कार्य करत राहिले होते तसेच अर्जुनालाही आपली दृष्टी लोकाभिमुख करून केवळ परमात्म्यासाठी आपले कर्तव्यकर्म करायला इथे भगवंतांनी सुचवले आहे.
कर प्रणाम तेरे चरणोंमें लगता हूँ अब तेरे काज।
राजा जनक जसे आत्मज्ञानी होऊनही केवळ परमात्म्यासाठी सत्कार्यासाठी लोकांना संघटित करण्याचे कार्य करत राहिले होते तसेच अर्जुनालाही आपली दृष्टी लोकाभिमुख करून केवळ परमात्म्यासाठी आपले कर्तव्यकर्म करायला इथे भगवंतांनी सुचवले आहे.
कर प्रणाम तेरे चरणोंमें लगता हूँ अब तेरे काज।
पालन करनेको आज्ञा तव मैं नियुक्त होता हूँ आज॥
यद्यदाचरति श्रेष्ठ:(स्), तत्तदेवेतरो जनः।
स यत्प्रमाणं(ङ्) कुरुते, लोकस्तदनुवर्तते॥3.21॥
श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो, त्या त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो, त्याप्रमाणेच सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो.
जसा मातेच्या गर्भाशयात असताना तिच्या आहारावर जगणारा मानवी जीव जन्मला तरी दीर्घकाळ मातेवरच अवलंबून असतो, माता जो आहार देईल तो चविष्टच असणार, ती जे सांगणार ते ब्रह्मवाक्यंच असणार ही त्याची श्रद्धा असते आणि ती जे जे काही करते त्या त्या सगळ्याचे अनुकरण करत तो शिकत असतो तसेच महापुरुष जे वर्तन करतो, त्याचे इतर लोकही अनुकरण करतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो, तेच समाज मानू लागतो.
सत्यानंद जी
नातुडे मुख्य परमात्मा। म्हणोनि करावी लागे प्रतिमा। असे दासबोधात म्हटले आहे, नातुडे या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर जे इंद्रियांनी आकलन होत नसल्यामुळे त्याचे वर्णन करता येत नाही. परमात्म्याचे इंद्रियांनी आकलन होत नाही. हवा सर्वत्र असली तरी पंखा लावून तिला त्या ठिकाणी एकवटून आणता येते किंवा टॉवर्ससारख्या माध्यमातून WORLD WIDE WAVE एकवटून आणता येतात तसेच मुख्य परमात्मा सर्वव्यापी असला तरी प्रतिमेच्या माध्यमातून त्याला समीप आणता येते.
प्रश्न
प्रेमलता जी आणि उषा जी आज विवेचनात ऋषि ऋण, देवता ऋण, समाज ऋण, पितृ ऋण यांचा उल्लेख आला होता. काहीही केलं तरी या ऋणातून मुक्त होणं अशक्य वाटत नाही का? खास करून मातेच्या ऋणातून कधीच मुक्त होता येणार नाही असं वाटतं!
उत्तर या ऋणांची जाणीव, त्या जाणीवेतून निर्माण झालेल्या कृतज्ञतेच्या भावनेने केलेले कोणतेही कार्य ऋण मुक्तीसाठी लाभदायक असते. तसेच कृतज्ञतेच्या भावनेतून फार महान कार्य करण्याऐवजी जितकी सहजपणे करता येण्याजोग्या छोट्या छोट्या गोष्टी करू तेवढे अधिक चांगले कारण महान कार्य करण्याने अहंकार वाढीस लागू शकतो.
प्रश्न
डॉली जी ध्यान करताना मनात सतत येणारे विचार त्रास देतात.
प्रश्नोत्तर सत्र
प्रश्न सत्यानंद जी
नातुडे मुख्य परमात्मा। म्हणोनि करावी लागे प्रतिमा। असे दासबोधात म्हटले आहे, नातुडे या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर जे इंद्रियांनी आकलन होत नसल्यामुळे त्याचे वर्णन करता येत नाही. परमात्म्याचे इंद्रियांनी आकलन होत नाही. हवा सर्वत्र असली तरी पंखा लावून तिला त्या ठिकाणी एकवटून आणता येते किंवा टॉवर्ससारख्या माध्यमातून WORLD WIDE WAVE एकवटून आणता येतात तसेच मुख्य परमात्मा सर्वव्यापी असला तरी प्रतिमेच्या माध्यमातून त्याला समीप आणता येते.
प्रश्न
प्रेमलता जी आणि उषा जी आज विवेचनात ऋषि ऋण, देवता ऋण, समाज ऋण, पितृ ऋण यांचा उल्लेख आला होता. काहीही केलं तरी या ऋणातून मुक्त होणं अशक्य वाटत नाही का? खास करून मातेच्या ऋणातून कधीच मुक्त होता येणार नाही असं वाटतं!
उत्तर या ऋणांची जाणीव, त्या जाणीवेतून निर्माण झालेल्या कृतज्ञतेच्या भावनेने केलेले कोणतेही कार्य ऋण मुक्तीसाठी लाभदायक असते. तसेच कृतज्ञतेच्या भावनेतून फार महान कार्य करण्याऐवजी जितकी सहजपणे करता येण्याजोग्या छोट्या छोट्या गोष्टी करू तेवढे अधिक चांगले कारण महान कार्य करण्याने अहंकार वाढीस लागू शकतो.
प्रश्न
डॉली जी ध्यान करताना मनात सतत येणारे विचार त्रास देतात.
उत्तर जरी ध्यान एकांतात आणि निर्गुण निराकारावर करायचं असतं तरी प्रारंभी ते सगुण साकारावर केलेले लाभदायक असतं. तसेच घरात किंवा एकंदरीतच आयुष्यात काही दु:खद त्रासदायक गोष्टी घडत असताना एकांतवासाऐवजी सत्संग करणं योग्य असतं. पुढे प्रगती होऊ लागली की इकडे तिकडे मुक्तपणे संचार करणाऱ्या बालकाला त्याची आई पुन:पुन्हा जाग्यावर आणते तसे इकडे तिकडे मुक्तपणे संचार करणाऱ्या आपल्या मनाला आपणच आंजारत गोंजारत त्याला ध्यानाच्या ठिकाणी आणायचे असते.