विवेचन सारांश
कर्म हाच यज्ञ जाणावा.
रिवाजानुसार सुमधुर प्रार्थनेने कार्यक्रमाची छान सुरुवात झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन झाले. विग्रह दर्शनाने मन प्रफुल्लित झाले. माता सरस्वती, भगवान वेदव्यासजी, संत ज्ञानेश्वर महाराज आणि गुरु गोविंद देव गिरी महाराज यांना वंदन करून विवेचनास सुरुवात झाली. सर्वप्रथम साधकांना अभिवादन करून होळीच्या पावन पर्वा निमित्त शुभकामना दिल्या गेल्या.
कृष्ण भगवान स्वतः आकर्षक आहेत आणि त्यांनीच ही विविधरंगी सृष्टी निर्माण केली आहे. श्रीकृष्णांच्या रंगामध्ये रंगून जाण्यासाठीच भगवद्गीता आपल्या जवळ आहे. होळीच्या या पूर्वसंध्येला आपण श्रीकृष्णचरणी अशी प्रार्थना करूया की कृष्णरंगात आपलेही मन पूर्णपणे रंगून जाऊ दे आणि या कृष्णमय सृष्टीतील आनंदयात्रेसाठी आपण मार्गस्थ व्हावे.
हतोत्साहित अर्जुनाला प्रेरणा प्रदान करण्यासाठी भगवंतांनी हे गीत गायले आहे. त्यामध्ये भक्ती आहे, ज्ञान आहे आणि योग देखील आहे. भगवद्गीता म्हणजेच जणू एक सुंदर फूल आहे. भक्तीयोग, ज्ञानयोग, राजयोग इत्यादी अनेक त्याच्या पाकळ्या आहेत. या पाकळ्या देखील एकमेकांशी योग साधून आहेत, ज्यांना आपण वेगळे करू शकत नाही, असे या फुलाचे अखंड सुंदर रूप आहे. हे फूल नित्य सुगंधाची बरसात करत आहे, योग विकसित करत आहे.
अर्जुन देखील विषादयोगामुळे भगवंतांशी जोडला गेला. त्यानंतर त्याने भगवंतांचे शिष्यत्व पत्करले. भगवंतांनी देखील त्याचे उन्नयन करण्यासाठी त्याला ज्ञान प्रदान केले. हेच प्रेमरूपी आणि भक्तीरूपी ज्ञान आपल्याही अंतरंगात प्रस्फुटित होत आहे.
यापूर्वी आपण पाहिले की मनुष्याचा स्वभाव, गुणसूत्रे व वातावरण यानुसार स्वभाव कर्म ठरते व हे कर्म करणे आवश्यकच असते. हेच कर्म जर भगवंतांना अर्पण करून केले तर त्याच्या परिणामांपासून आपण मुक्त राहतो.
युद्धानंतर परिवाराची होणारी हानी, कुलक्षय, वर्णसंकर, अधर्म, पितरांचा नरकवास इत्यादी परिणामांचा अर्जुनाने विचार केला होता व त्या विचारांनी तो भयग्रस्त झाला होता. भगवंतांनी अर्जुनाला हेच सांगितले की युद्धासारखे घोर कर्म देखील तू मला अर्पण करू शकतोस.
आपण हेही पाहिले की चारही वर्णांच्या रूपात चारही शक्ती सृष्टीच्या संचलनासाठी आवश्यक असतात. ज्ञानशक्तीमुळेच मनुष्य विविध वैज्ञानिक शोध लावतो. लस निर्माण करण्याच्या शोधामुळे करोनासारख्या आपत्तीमधून आपण सावरलो. ही तीच ज्ञानशक्ती आहे जिच्या प्रभावामुळे आज आपण घरी बसून हे विवेचन ऐकू शकत आहोत. केवळ ज्ञानशक्ती असून उपयोगाची नाही. तिचा कार्यात उपयोग घडवून आणण्यासाठी उद्योग उभारावे लागतात व त्यासाठी वित्तशक्तीची देखील गरज असते. देशाच्या रक्षणासाठी सैन्याची म्हणजेच बाहुबलाची आवश्यकता असते. शेतकरी शेतात कष्ट करतो म्हणून आपली अन्नधान्याची गरज पूर्ण होते. अशाप्रकारे श्रमशक्तीची देखील नितांत आवश्यकता असते.
तसं पाहायला गेलं तर आपल्यातील प्रत्येकाचे जीवन हे चातुर्वर्ण्यावर आधारित असल्याचे दिसून येते. गुरुजनांकडून शिकून अथवा पुस्तके वाचून आपण ज्ञान ग्रहण करतो, ही ज्ञानशक्तीच असते. बाहुबल वाढवण्यासाठी आपण व्यायाम अथवा योगासने करतो. उदरनिर्वाहासाठी व्यवसाय अथवा नोकरी करून वित्तशक्ती कमावतो. घरामध्ये आपण स्वच्छतेसाठी साफसफाईची कामे करतो व कुटुंबात कोणी आजारी पडले तर त्यांची सेवा करतो. हे देखील अठराव्या अध्यायाच्या ४४ व्या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे 'परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् ।।' असते. अशा प्रकारे चातुर्वर्ण्य आपल्यामध्ये देखील सामावलेला आहे. गरज आहे ती व्यापक होऊन शक्तीच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहण्याची!
प्रत्येकाला आपल्या आयुष्यात शुभ गोष्टी घडाव्यात असे वाटत असते. प्रत्येकाला अशुभापासून मुक्ती हवी असते. अर्जुनाच्या मनात देखील युद्धाच्या अशुभ परिणामांविषयी विचार करून भीती निर्माण झाली होती तेव्हा भगवंतांनी त्याला कर्माची परिभाषा समजावून सांगितली. कर्म करता करता त्याच्या परिणामांपासून कसे मुक्त होता येते हेच भगवद्गीता आपल्याला शिकवते. मागील सत्रात आपण कर्मामध्ये अकर्म पाहणे आणि अकर्मामध्ये कर्म पाहणे या कर्माच्या प्रक्रियेवर चिंतन केले. हा विषय समजण्यास थोडा अवघड असल्याने याची पुन्हा उजळणी करूया.
कर्मामध्ये अकर्म पाहणे - कर्म हे कर्मेंद्रियांद्वारा घडून येते. हात पाय, वाणी, गुदस्थ आणि उपस्थ ही पाच कर्मेंद्रिये आहेत. याशिवाय मन बुद्धी चित्त आणि अहंकार यांसहित ही अष्टधा प्रकृती आहे. 'Action, Emotion, Reasoning' अशी येथील व्यवस्था आहे. ॲक्शन म्हणजे कर्म. हे देहामुळे घडून येते. इमोशन्स म्हणजे भावना. या मनातून प्रसृत होतात आणि रिझनिंग म्हणजेच तर्क. हा बुद्धी द्वारा केला जातो.
कर्म करताना मन आत्म्याबरोबर जोडलेले असेल तर ते चैतन्यमय अवस्था प्राप्त करते परंतु कर्म करताना जेव्हा मन देहाबरोबर जोडले जाते तेव्हा ते 'मी केले' या अहंकृत भावामध्ये आकर्षित होते. अशाप्रकारे मन हे भावनेचे जन्मस्थान आहे. मन हे देहाबरोबर जोडलेले असेल तर जेव्हा देह थकेल तेव्हा मनही थकेल परंतु हेच मन जर चैतन्याबरोबर जोडले गेलेले असेल तर निरंतर सृजनाकडेच वळेल.
कर्तेपणाच्या भावनेतून मुक्त होणे म्हणजेच कर्मामध्ये अकर्म पाहणे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.-
किंबहुना तुमचें केलें। धर्मकीर्तन हें सिध्दी नेलें।
येथ माझें जी उरलें। पाईकपण॥
निवृत्तीनाथांना ते आपले गुरु मानत आणि ज्ञानेश्वरी लिहिण्याचे हे कार्य तुम्हीच माझ्याकडून सिद्धीस नेले असा विनम्र भाव ते व्यक्त करतात. मी तर केवळ सेवक आहे असे ते सांगतात.
पालक आपल्या मुलांना लहानाचे मोठे करतात व ते करताना मोठे झाल्यावर मुलांनी आपल्यासाठी काही करावे अशी अपेक्षा ठेवतात व ती अपेक्षा पूर्ण न झाल्यास अपेक्षाभंगाच्या दुःखाने व्यथित होतात. मी मुलांना मोठे केले हा अहंपणाचा भाव पालकांनी मनात धरू नये कारण त्यांना मोठे करण्यात त्यांच्या आई-वडिलांनी व गुरूंनी आपले कर्म दिलेले असते.
अकर्मामध्ये कर्म पाहणे - सूर्याच्या प्रकाशामुळे पृथ्वीवर हालचाल होते. प्रत्यक्षात सूर्य आकाशात स्थिर आहे. तो काहीच करत नाही परंतु त्याच्या प्रकाशामध्ये पृथ्वीवर कर्मे घडून येतात. हेच अकर्म आहे.
एकदा राधाकृष्णजी रमण महर्षींना भेटायला गेले होते. त्यांना पाहून राधाकृष्णजी म्हणाले 'He is doing nothing but he is doing greatest things.' त्यांच्या सहवासात राधाकृष्णजींनी प्रगाढ शांतीचा अनुभव घेतला. प्रत्यक्षात रमण महर्षी काहीच करत नव्हते. केवळ त्यांच्या सत्संगतीचा हा परिणाम होता. ऋषी महात्म्यांच्या मनाची अशी उच्च अवस्था असते.
विकर्म या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे विपरीत अथवा निषिद्ध कर्म आणि विनोबाजींना अभिप्रेत असलेला दुसरा अर्थ विशेष कर्म. विनोबाजी म्हणत - प्रथम चांगल्या कामांमध्ये रुची निर्माण करावी आणि नंतर प्रयत्नाने हळूहळू ती आपल्याला अकर्माच्या अवस्थेपर्यंत घेऊन जाते.
कर्मेंद्रिये ही प्रकृतीची देणगी आहे, ती आपापले कार्य करीत राहतात. हे जाणून 'हे मी केले नाही' अशा अवस्थेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंत आपला दृष्टिकोन व्यापक करायला सांगत आहेत.
कृष्ण भगवान स्वतः आकर्षक आहेत आणि त्यांनीच ही विविधरंगी सृष्टी निर्माण केली आहे. श्रीकृष्णांच्या रंगामध्ये रंगून जाण्यासाठीच भगवद्गीता आपल्या जवळ आहे. होळीच्या या पूर्वसंध्येला आपण श्रीकृष्णचरणी अशी प्रार्थना करूया की कृष्णरंगात आपलेही मन पूर्णपणे रंगून जाऊ दे आणि या कृष्णमय सृष्टीतील आनंदयात्रेसाठी आपण मार्गस्थ व्हावे.
हतोत्साहित अर्जुनाला प्रेरणा प्रदान करण्यासाठी भगवंतांनी हे गीत गायले आहे. त्यामध्ये भक्ती आहे, ज्ञान आहे आणि योग देखील आहे. भगवद्गीता म्हणजेच जणू एक सुंदर फूल आहे. भक्तीयोग, ज्ञानयोग, राजयोग इत्यादी अनेक त्याच्या पाकळ्या आहेत. या पाकळ्या देखील एकमेकांशी योग साधून आहेत, ज्यांना आपण वेगळे करू शकत नाही, असे या फुलाचे अखंड सुंदर रूप आहे. हे फूल नित्य सुगंधाची बरसात करत आहे, योग विकसित करत आहे.
अर्जुन देखील विषादयोगामुळे भगवंतांशी जोडला गेला. त्यानंतर त्याने भगवंतांचे शिष्यत्व पत्करले. भगवंतांनी देखील त्याचे उन्नयन करण्यासाठी त्याला ज्ञान प्रदान केले. हेच प्रेमरूपी आणि भक्तीरूपी ज्ञान आपल्याही अंतरंगात प्रस्फुटित होत आहे.
यापूर्वी आपण पाहिले की मनुष्याचा स्वभाव, गुणसूत्रे व वातावरण यानुसार स्वभाव कर्म ठरते व हे कर्म करणे आवश्यकच असते. हेच कर्म जर भगवंतांना अर्पण करून केले तर त्याच्या परिणामांपासून आपण मुक्त राहतो.
युद्धानंतर परिवाराची होणारी हानी, कुलक्षय, वर्णसंकर, अधर्म, पितरांचा नरकवास इत्यादी परिणामांचा अर्जुनाने विचार केला होता व त्या विचारांनी तो भयग्रस्त झाला होता. भगवंतांनी अर्जुनाला हेच सांगितले की युद्धासारखे घोर कर्म देखील तू मला अर्पण करू शकतोस.
आपण हेही पाहिले की चारही वर्णांच्या रूपात चारही शक्ती सृष्टीच्या संचलनासाठी आवश्यक असतात. ज्ञानशक्तीमुळेच मनुष्य विविध वैज्ञानिक शोध लावतो. लस निर्माण करण्याच्या शोधामुळे करोनासारख्या आपत्तीमधून आपण सावरलो. ही तीच ज्ञानशक्ती आहे जिच्या प्रभावामुळे आज आपण घरी बसून हे विवेचन ऐकू शकत आहोत. केवळ ज्ञानशक्ती असून उपयोगाची नाही. तिचा कार्यात उपयोग घडवून आणण्यासाठी उद्योग उभारावे लागतात व त्यासाठी वित्तशक्तीची देखील गरज असते. देशाच्या रक्षणासाठी सैन्याची म्हणजेच बाहुबलाची आवश्यकता असते. शेतकरी शेतात कष्ट करतो म्हणून आपली अन्नधान्याची गरज पूर्ण होते. अशाप्रकारे श्रमशक्तीची देखील नितांत आवश्यकता असते.
तसं पाहायला गेलं तर आपल्यातील प्रत्येकाचे जीवन हे चातुर्वर्ण्यावर आधारित असल्याचे दिसून येते. गुरुजनांकडून शिकून अथवा पुस्तके वाचून आपण ज्ञान ग्रहण करतो, ही ज्ञानशक्तीच असते. बाहुबल वाढवण्यासाठी आपण व्यायाम अथवा योगासने करतो. उदरनिर्वाहासाठी व्यवसाय अथवा नोकरी करून वित्तशक्ती कमावतो. घरामध्ये आपण स्वच्छतेसाठी साफसफाईची कामे करतो व कुटुंबात कोणी आजारी पडले तर त्यांची सेवा करतो. हे देखील अठराव्या अध्यायाच्या ४४ व्या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे 'परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् ।।' असते. अशा प्रकारे चातुर्वर्ण्य आपल्यामध्ये देखील सामावलेला आहे. गरज आहे ती व्यापक होऊन शक्तीच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहण्याची!
प्रत्येकाला आपल्या आयुष्यात शुभ गोष्टी घडाव्यात असे वाटत असते. प्रत्येकाला अशुभापासून मुक्ती हवी असते. अर्जुनाच्या मनात देखील युद्धाच्या अशुभ परिणामांविषयी विचार करून भीती निर्माण झाली होती तेव्हा भगवंतांनी त्याला कर्माची परिभाषा समजावून सांगितली. कर्म करता करता त्याच्या परिणामांपासून कसे मुक्त होता येते हेच भगवद्गीता आपल्याला शिकवते. मागील सत्रात आपण कर्मामध्ये अकर्म पाहणे आणि अकर्मामध्ये कर्म पाहणे या कर्माच्या प्रक्रियेवर चिंतन केले. हा विषय समजण्यास थोडा अवघड असल्याने याची पुन्हा उजळणी करूया.
कर्मामध्ये अकर्म पाहणे - कर्म हे कर्मेंद्रियांद्वारा घडून येते. हात पाय, वाणी, गुदस्थ आणि उपस्थ ही पाच कर्मेंद्रिये आहेत. याशिवाय मन बुद्धी चित्त आणि अहंकार यांसहित ही अष्टधा प्रकृती आहे. 'Action, Emotion, Reasoning' अशी येथील व्यवस्था आहे. ॲक्शन म्हणजे कर्म. हे देहामुळे घडून येते. इमोशन्स म्हणजे भावना. या मनातून प्रसृत होतात आणि रिझनिंग म्हणजेच तर्क. हा बुद्धी द्वारा केला जातो.
कर्म करताना मन आत्म्याबरोबर जोडलेले असेल तर ते चैतन्यमय अवस्था प्राप्त करते परंतु कर्म करताना जेव्हा मन देहाबरोबर जोडले जाते तेव्हा ते 'मी केले' या अहंकृत भावामध्ये आकर्षित होते. अशाप्रकारे मन हे भावनेचे जन्मस्थान आहे. मन हे देहाबरोबर जोडलेले असेल तर जेव्हा देह थकेल तेव्हा मनही थकेल परंतु हेच मन जर चैतन्याबरोबर जोडले गेलेले असेल तर निरंतर सृजनाकडेच वळेल.
कर्तेपणाच्या भावनेतून मुक्त होणे म्हणजेच कर्मामध्ये अकर्म पाहणे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.-
किंबहुना तुमचें केलें। धर्मकीर्तन हें सिध्दी नेलें।
येथ माझें जी उरलें। पाईकपण॥
निवृत्तीनाथांना ते आपले गुरु मानत आणि ज्ञानेश्वरी लिहिण्याचे हे कार्य तुम्हीच माझ्याकडून सिद्धीस नेले असा विनम्र भाव ते व्यक्त करतात. मी तर केवळ सेवक आहे असे ते सांगतात.
पालक आपल्या मुलांना लहानाचे मोठे करतात व ते करताना मोठे झाल्यावर मुलांनी आपल्यासाठी काही करावे अशी अपेक्षा ठेवतात व ती अपेक्षा पूर्ण न झाल्यास अपेक्षाभंगाच्या दुःखाने व्यथित होतात. मी मुलांना मोठे केले हा अहंपणाचा भाव पालकांनी मनात धरू नये कारण त्यांना मोठे करण्यात त्यांच्या आई-वडिलांनी व गुरूंनी आपले कर्म दिलेले असते.
अकर्मामध्ये कर्म पाहणे - सूर्याच्या प्रकाशामुळे पृथ्वीवर हालचाल होते. प्रत्यक्षात सूर्य आकाशात स्थिर आहे. तो काहीच करत नाही परंतु त्याच्या प्रकाशामध्ये पृथ्वीवर कर्मे घडून येतात. हेच अकर्म आहे.
एकदा राधाकृष्णजी रमण महर्षींना भेटायला गेले होते. त्यांना पाहून राधाकृष्णजी म्हणाले 'He is doing nothing but he is doing greatest things.' त्यांच्या सहवासात राधाकृष्णजींनी प्रगाढ शांतीचा अनुभव घेतला. प्रत्यक्षात रमण महर्षी काहीच करत नव्हते. केवळ त्यांच्या सत्संगतीचा हा परिणाम होता. ऋषी महात्म्यांच्या मनाची अशी उच्च अवस्था असते.
विकर्म या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे विपरीत अथवा निषिद्ध कर्म आणि विनोबाजींना अभिप्रेत असलेला दुसरा अर्थ विशेष कर्म. विनोबाजी म्हणत - प्रथम चांगल्या कामांमध्ये रुची निर्माण करावी आणि नंतर प्रयत्नाने हळूहळू ती आपल्याला अकर्माच्या अवस्थेपर्यंत घेऊन जाते.
कर्मेंद्रिये ही प्रकृतीची देणगी आहे, ती आपापले कार्य करीत राहतात. हे जाणून 'हे मी केले नाही' अशा अवस्थेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंत आपला दृष्टिकोन व्यापक करायला सांगत आहेत.
4.21
निराशीर्यतचित्तात्मा, त्यक्तसर्वपरिग्रहः।
शारीरं(ङ्) केवलं(ङ्) कर्म, कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्॥4.21॥
ज्याने अतःकरण व इंद्रियांसह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोग सामग्रीचा त्याग केला आहे, असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीरासंबंधीचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही.
परिग्रह हा शब्द येथे महत्त्वाचा आहे. परिग्रह म्हणजे संग्रह. संग्रहाने माणसाचे मन विचलित होते, लिप्त होते. वस्तूंचा कितीही संग्रह असला तरी अधिकाधिक मिळवण्याची हाव काही संपत नाही. भगवंत येथे या परिग्रहाचा त्याग करावयास सांगत आहेत- याचा अर्थ घरातील वस्तूंचा त्याग करणे असा नसून मनाला त्या संग्रहापासून दूर केले पाहिजे. त्या संग्रह करण्याच्या वृत्तीपासून विरक्त होण्याची भावना मनात निर्माण केली पाहिजे.
मुले ही भगवंताची देणगी आहेत असे समजून त्यांचे कर्तव्यदृष्टीने पालन केले पाहिजे.
मुले ही भगवंताची देणगी आहेत असे समजून त्यांचे कर्तव्यदृष्टीने पालन केले पाहिजे.
यदृच्छालाभसन्तुष्टो, द्वन्द्वातीतो विमत्सरः।
समः(स्) सिद्धावसिद्धौ च, कृत्वापि न निबध्यते॥4.22॥
जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थांत नेहमी संतुष्ट असतो, ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही, जो सुखदुःख इत्यादी द्वंद्वांच्या पूर्णपणे पार गेलेला आहे, असा सिद्धीत व असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असूनही त्याने बांधला जात नाही.
जीवनात जे काही प्राप्त झाले आहे ते परमात्म्याच्या इच्छेने मिळाले आहे अशी भावना ठेवली तर मनुष्य संतुष्ट राहतो, अन्यथा आजकाल आपण पाहतो की संपन्नता असून सुद्धा मनुष्य विपन्नावस्थेमध्ये जगत असतो. याचे कारण म्हणजे द्वंद्व होय. लाभ हानी, मान अपमान, यश अपयश, सुगंध दुर्गंध इत्यादी द्वंद्वांमुळे त्याच्या जीवनात अशांती निर्माण होते. या अवस्थेमधून बाहेर यायचे असेल तर या द्वद्वांविषयी मनामध्ये समत्वाची भावना जागृत केली पाहिजे.
मनाला मत्सरापासून मुक्त केले पाहिजे. 'हे विश्वची माझे घर' असा व्यापक दृष्टिकोन ठेवला तर मत्सराला जागा उरणारच नाही.
संत मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग प्रसंग प्रसिद्ध आहेत. त्यात ज्ञानेश्वरांना समजावताना त्या म्हणतात- 'जीभ दाताने चावली, कोणी बत्तीशी पाडली.' जीभ दाताखाली आली म्हणून कोणी दात पाडत नाही.
कोणाच्या बोलण्याने आपले मन एवढे विचलित होण्याची आवश्यकता नसते.
जो योगी द्वंद्वापासून मुक्त असतो, मत्सर करीत नाही आणि सिद्धी आणि असिद्धी म्हणजेच यशापयशामध्ये देखील स्थिर राहतो, त्याला कर्मबंधन रहात नाही.
मनाला मत्सरापासून मुक्त केले पाहिजे. 'हे विश्वची माझे घर' असा व्यापक दृष्टिकोन ठेवला तर मत्सराला जागा उरणारच नाही.
संत मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग प्रसंग प्रसिद्ध आहेत. त्यात ज्ञानेश्वरांना समजावताना त्या म्हणतात- 'जीभ दाताने चावली, कोणी बत्तीशी पाडली.' जीभ दाताखाली आली म्हणून कोणी दात पाडत नाही.
कोणाच्या बोलण्याने आपले मन एवढे विचलित होण्याची आवश्यकता नसते.
जो योगी द्वंद्वापासून मुक्त असतो, मत्सर करीत नाही आणि सिद्धी आणि असिद्धी म्हणजेच यशापयशामध्ये देखील स्थिर राहतो, त्याला कर्मबंधन रहात नाही.
गतसङ्गस्य मुक्तस्य, ज्ञानावस्थितचेतसः।
यज्ञायाचरतः(ख्) कर्म, समग्रं(म्) प्रविलीयते॥4.23॥
ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे, जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे, त्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे, अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात.
आसक्ती पासून मुक्ती कशी साधावी हे येथे सांगितले आहे. भगवद्गीता आपल्याला मन कुठे जोडावे व मन कुठून तोडावे हे सांगते.
जेव्हा चित्त परमात्म्याच्या ज्ञानामध्ये अवस्थित होते तेव्हा असा योगी कर्म तर करतो पण त्याच्या मनात भावना यज्ञाची असते. यज्ञ म्हणजे परोपकार व संघटित कार्य. तिसऱ्या अध्यायाच्या दहाव्या श्लोकामध्ये भगवंतांनी यज्ञाची महती सांगितली आहे-
सहयज्ञा: प्रजा: सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति: |
जेव्हा चित्त परमात्म्याच्या ज्ञानामध्ये अवस्थित होते तेव्हा असा योगी कर्म तर करतो पण त्याच्या मनात भावना यज्ञाची असते. यज्ञ म्हणजे परोपकार व संघटित कार्य. तिसऱ्या अध्यायाच्या दहाव्या श्लोकामध्ये भगवंतांनी यज्ञाची महती सांगितली आहे-
सहयज्ञा: प्रजा: सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति: |
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक् || 10||
ब्रह्माने सृष्टी बरोबरच यज्ञाची निर्मिती केली आणि प्रजेला सांगितले की या यज्ञाच्या द्वारा उत्कर्ष करून घ्या. हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करेल.
ब्रह्माने सृष्टी बरोबरच यज्ञाची निर्मिती केली आणि प्रजेला सांगितले की या यज्ञाच्या द्वारा उत्कर्ष करून घ्या. हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करेल.
अशा प्रकारे यज्ञ भावनेने जो कर्म करतो त्याचे कर्म दिव्य होऊन जाते व त्यामुळे कर्माच्या परिणामांपासून देखील त्याला मुक्ती मिळते.
ब्रह्मार्पणं(म्) ब्रह्म हवि:(र्), ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं(म्), ब्रह्मकर्मसमाधिना॥4.24॥
ज्या यज्ञात अर्पण अर्थात् स्रुवा आदिही ब्रह्म आहे आणि हवन करण्याजोगे द्रव्यसुद्धा ब्रह्म आहे, तसेच ब्रह्मरुप कर्त्याच्याद्वारे ब्रह्मरुप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे, त्या ब्रह्मकर्मांत स्थित असणाऱ्या योग्याला, मिळण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच आहे.
पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपण येथे कार्य करतो. या सृष्टीमध्ये अशी कोणती तरी शक्ती नक्कीच कार्यरत आहे की जी या सृष्टीचे नियंत्रण करते. ही शक्ती म्हणजेच ब्रह्म. अशा अनेक ब्रह्मांडांचे नियंत्रण जेथे होते तेच परब्रह्म होय. येथे जी कर्मे घडतात ती यज्ञस्वरूप असतात. जो हे तत्त्व जाणतो, अशा योग्याचे जीवन यज्ञमयी होते. या यज्ञाकडे पाहण्याची त्याची दृष्टी कशी असते पहा- 'त्या कर्मरूपी यज्ञामध्ये मी जे काही अर्पण करतो ते ब्रह्मच आहे, ज्या अग्नीमध्ये हवि अर्पण करतो तो अग्नी देखील ब्रह्मच आहे आणि हवनाची सामग्री देखील ब्रह्मच आहे. मी स्वतः यज्ञाचा कर्ता जो ब्रह्मरूपच आहे.' सर्वत्र ईश्वराची सत्ता आहे या भावनेने असा जो यज्ञ होईल त्या यज्ञाचे फळस्वरूप त्याला ब्रह्मच प्राप्त होईल.
ठाकूर रामकृष्ण देव यांना अशी ब्रम्हावस्था प्राप्त झाली होती. कालीमातेची पूजा करता करता परब्रह्माशी ते इतके एकाकार झाले होते की देवीला हार चढवताना ते स्वतःलाच तेथे चढवू पहात होते. देवीला भोग चढवताना स्वतःलाच तेथे चढवत होते. त्यांच्या मनाची इतकी उच्च अवस्था पाहून तेथे दुसरा पुजारी नियुक्त करावा लागला होता.
दसऱ्याच्या दिवशी आपण शस्त्रांची पूजा करतो याचे कारण म्हणजे या शस्त्रांच्या आधारानेच आपण कर्मे करीत असतो. या शस्त्रांमध्ये देखील ईश्वराची शक्ती सामावलेली आहे अशी भावना ठेवून आपण त्यांची पूजा करतो.
गीता परिवाराच्या महायज्ञाचा एक भाग म्हणून येथे विवेचन सत्र चालू आहे परंतु त्या मागे एक मोठी यंत्रणा कार्यरत आहे जिच्यामध्ये पाच हजाराहून अधिक स्वयंसेवक कार्यकर्ते सहभागी आहेत.
ठाकूर रामकृष्ण देव यांना अशी ब्रम्हावस्था प्राप्त झाली होती. कालीमातेची पूजा करता करता परब्रह्माशी ते इतके एकाकार झाले होते की देवीला हार चढवताना ते स्वतःलाच तेथे चढवू पहात होते. देवीला भोग चढवताना स्वतःलाच तेथे चढवत होते. त्यांच्या मनाची इतकी उच्च अवस्था पाहून तेथे दुसरा पुजारी नियुक्त करावा लागला होता.
दसऱ्याच्या दिवशी आपण शस्त्रांची पूजा करतो याचे कारण म्हणजे या शस्त्रांच्या आधारानेच आपण कर्मे करीत असतो. या शस्त्रांमध्ये देखील ईश्वराची शक्ती सामावलेली आहे अशी भावना ठेवून आपण त्यांची पूजा करतो.
गीता परिवाराच्या महायज्ञाचा एक भाग म्हणून येथे विवेचन सत्र चालू आहे परंतु त्या मागे एक मोठी यंत्रणा कार्यरत आहे जिच्यामध्ये पाच हजाराहून अधिक स्वयंसेवक कार्यकर्ते सहभागी आहेत.
दैवमेवापरे यज्ञं(म्), योगिनः(फ्) पर्युपासते।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं(म्), यज्ञेनैवोपजुह्वति॥4.25॥
दुसरे काही योगी देवपूजारुप यज्ञाचे उत्तमप्रकारे अनुष्ठान करतात, इतर योगी परब्रह्म परमात्मारुपी अग्नीत अभेददर्शनरुप यज्ञाच्याद्वारेच आत्मरुप यज्ञाचे हवन करतात.
काही लोक कर्मरूपी यज्ञ करतात तर काही लोक ज्ञानरूपी यज्ञ करतात. हे करीत असताना त्यामध्ये ते स्वतःची आहुती देतात. अशा यज्ञामुळे त्यांची उन्नती होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी म्हणत-
'राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय, इदं न मम.' त्यांनी आपले जीवन राष्ट्रकार्याला समर्पित केले होते.
संत ज्ञानेश्वर महाराज पसायदानामध्ये म्हणतात-
'आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे'
माझ्या वाणीच्या यज्ञाने परमेश्वराने प्रसन्न व्हावे.
'राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय, इदं न मम.' त्यांनी आपले जीवन राष्ट्रकार्याला समर्पित केले होते.
संत ज्ञानेश्वर महाराज पसायदानामध्ये म्हणतात-
'आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे'
माझ्या वाणीच्या यज्ञाने परमेश्वराने प्रसन्न व्हावे.
श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये, संयमाग्निषु जुह्वति।
शब्दादीन्विषयानन्य, इन्द्रियाग्निषु जुह्वति॥4.26॥
दुसरे काही योगी 'कान' इत्यादी इंद्रियांचे संयमरुप अग्नीत हवन करतात तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रियरुप अग्नीत हवन करतात.
ज्ञानयज्ञ, कर्मयज्ञ या व्यतिरिक्त यज्ञाचे इतरही पुष्कळ प्रकार आहेत. इंद्रियांचे संयमन करणे ही देखील एक प्रकारची आहुतीच आहे. काही लोक असा संयमरूपी यज्ञ करतात. डोळ्यांनी काय पहावे, कानांनी काय ऐकावे, मुखाने काय ग्रहण करावे याविषयी ते संयम ठेवून राहतात. वाणीचा संयम हा सर्वात कठीण संयम आहे. हे एक व्रत आहे. एक तपश्चर्याच आहे. असे संयमी योगी इंद्रियांचे विषय जे रस, रूप, शब्द, गंध हे इंद्रियांच्या ठिकाणीच हवन करून टाकतात, मनापर्यंत येऊ देत नाहीत. जीभेने एखाद्या पदार्थाची चव चाखली, डोळ्याने एखादे दृश्य पाहिले, कानाने काही वार्ता ऐकली तरी त्याचा त्यांच्या मनावर परिणाम होत नाही, ते विचलित होत नाहीत. अशा योग्यांची इंद्रियेच अग्निरूप होऊन जातात व तेथेच हे सर्व विषय हवन होऊन जातात.
तुकाराम महाराज म्हणतात-
तुका म्हणे झालो अग्निरूप।
तुकाराम महाराज म्हणतात-
तुका म्हणे झालो अग्निरूप।
नाही गुण दोष अंगी येत।।
कोणी स्तुती करो अथवा निंदा करो, माझे मन त्यापासून आता मुक्त झाले आहे. मनाला आता कोणताच गुण अथवा दोष स्पर्श करीत नाही.
कोणी स्तुती करो अथवा निंदा करो, माझे मन त्यापासून आता मुक्त झाले आहे. मनाला आता कोणताच गुण अथवा दोष स्पर्श करीत नाही.
संयमाशिवाय कोणतेही लौकिक अथवा अलौकिक लक्ष्य गाठता येत नाही. वासुदेवानंद सरस्वती महाराज हे भगवान दत्तात्रेयांचे उपासक होते. त्यांचे जीवन संयमित होते. ते रोज भिक्षा मागून आणत. त्याचे चार भाग करत. एक हिस्सा मंदिरात ठेवत. एक हिस्सा पक्ष्यांसाठी ठेवत. एक हिस्सा गोमातेला अर्पण करीत व उरलेला चौथा हिस्सा नदीच्या पाण्यामध्ये धुऊन मग ग्रहण करीत. असे त्यांचे तपःपूत (तपस्येने पावन झालेले) जीवन होते. ते कोणालाही स्वतःला स्पर्श करू देत नसत. एकदा त्यांच्या पायावर ज्वारीचे दाणे ठेवले तेव्हा त्याच्या लाह्या फुटल्या. त्यांचा आत्मसंयमाग्नी अलौकिक होता.
क्रांतिकारकांसाठी मातृभूमी हीच परमात्मा असते. तिच्यासाठीच ते आपले संपूर्ण जीवन अर्पण करतात. काही लोकांसाठी क्रिकेट हा परमात्मा असतो. त्या खेळासाठी ते आपले सर्वस्व अर्पण करतात. अशा प्रकारे प्रत्येकाचा कर्मयज्ञ वेगवेगळा असू शकतो.
सर्वाणीन्द्रियकर्माणि, प्राणकर्माणि चापरे।
आत्मसंयमयोगाग्नौ, जुह्वति ज्ञानदीपिते॥4.27॥
अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राण्यांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयमयोगरुप अग्नी त्यात हवन करतात.
4.27 writeup
द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा, योगयज्ञास्तथापरे।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च, यतयः(स्) संशितव्रताः॥4.28॥
काही पुरुष द्रव्य विषयक यज्ञ करणारे असतात. काहीजण तपश्चर्यारुप यज्ञ करणारे असतात. तसेच दुसरे काहीजण योगरुप यज्ञ करणारे असतात. कितीतरी जण अहिंसा इत्यादी कडक व्रते पाळणारे यत्नशील पुरुष स्वाध्यायरुप ज्ञानयज्ञ करणारे असतात.
कुठल्या ना कुठल्या प्रकारचा यज्ञ मनुष्याने अवश्य केला पाहिजे कारण त्यानेच जीवन उन्नत होते. कोणी धनिक द्रव्ययज्ञ करतो व त्याद्वारे ग्रंथालयाची निर्मिती करतो. काहीजण खडतर तपस्या करतात, तर काही जण योगपद्धतीचे आचरण करतात. काहीजण वेदाध्ययन करून ज्ञानी होतात.
मन परिष्कृत होण्यासाठी, दृष्टिकोन परिपूर्ण होण्यासाठी वाचन अध्ययन आणि स्वाध्याय अशा तीन गोष्टी सांगितल्या आहेत.
वाचन हे अस्थिर असते. आपण पेपरातील बातम्या वाचतो, पुस्तक वाचतो, आजकाल व्हाॅट्सअप वरचे मेसेजेस वाचतो, परंतु हे सर्व लवकर विसरून जाते.
अध्ययन म्हणजे लौकिक विद्या- विविध शास्त्रांचा अभ्यास, जसे की कला वाणिज्य विज्ञान इत्यादी आपण शिकतो, ज्यायोगे आपण आपले उपजीविकेचे साधन निर्माण करू शकतो.
स्वाध्यायामध्ये मात्र चिंतनाचा अंतर्भाव होतो, ज्यायोगे आपण आपला दृष्टिकोन व्यापक करू शकतो. सध्या आपण गीता शिकत आहोत. त्यातील श्लोकांवर मनन करीत आहोत व त्यातील सिद्धांत आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करीत आहोत. हा एक स्वाध्याययज्ञच आहे.
मन परिष्कृत होण्यासाठी, दृष्टिकोन परिपूर्ण होण्यासाठी वाचन अध्ययन आणि स्वाध्याय अशा तीन गोष्टी सांगितल्या आहेत.
वाचन हे अस्थिर असते. आपण पेपरातील बातम्या वाचतो, पुस्तक वाचतो, आजकाल व्हाॅट्सअप वरचे मेसेजेस वाचतो, परंतु हे सर्व लवकर विसरून जाते.
अध्ययन म्हणजे लौकिक विद्या- विविध शास्त्रांचा अभ्यास, जसे की कला वाणिज्य विज्ञान इत्यादी आपण शिकतो, ज्यायोगे आपण आपले उपजीविकेचे साधन निर्माण करू शकतो.
स्वाध्यायामध्ये मात्र चिंतनाचा अंतर्भाव होतो, ज्यायोगे आपण आपला दृष्टिकोन व्यापक करू शकतो. सध्या आपण गीता शिकत आहोत. त्यातील श्लोकांवर मनन करीत आहोत व त्यातील सिद्धांत आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करीत आहोत. हा एक स्वाध्याययज्ञच आहे.
अपाने जुह्वति प्राणं(म्), प्राणेऽपानं(न्) तथापरे।
प्राणापानगती रुद्ध्वा, प्राणायामपरायणाः॥4.29॥
अन्य काही योगीजन अपानवायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात. तसेच दुसरे योगी प्राणवायूमध्ये अपानवायूचे हवन करतात. त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर असणारे पुरुष प्राण व अपानाची गती थांबवून प्राणांचे प्राणांतच हवन करीत असतात.
श्वास घेणे, श्वास सोडणे (प्रश्वास) यादेखील हवनक्रियाच आहेत. अंतर्कुंभकामध्ये श्वास आत घेऊन काही काळ स्थिर ठेवला जातो व बहिर्कुंभकामध्ये श्वास बाहेर सोडून काही काळ श्वास रोखून धरला जातो. प्राणायामाच्या या क्रियांद्वारे प्राणाचेच प्राणामध्ये हवन केले जाते. हा सुद्धा एक प्रकारचा यज्ञच आहे. अशा यज्ञामुळे यज्ञकर्ता सर्व दोषांतून व पापकर्मातून मुक्त होतो. त्याचे जीवन शुद्ध व पवित्र होते.
अपरे नियताहाराः(फ्), प्राणान्प्राणेषु जुह्वति।
सर्वेऽप्येते यज्ञविदो, यज्ञक्षपितकल्मषाः॥4.30॥
त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर असणारे पुरुष प्राण व अपानाची गती थांबवून प्राणांचे प्राणांतच हवन करीत असतात. हे सर्व साधक यज्ञांच्याद्वारे पापांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत.
4.30 writeup
यज्ञशिष्टामृतभुजो, यान्ति ब्रह्म सनातनम्।
नायं(म्) लोकोऽस्त्ययज्ञस्य, कुतोऽन्यः(ख्) कुरुसत्तम॥4.31॥
त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर असणारे पुरुष प्राण व अपानाची गती थांबवून प्राणांचे प्राणांतच हवन करीत असतात. हे सर्व साधक यज्ञांच्याद्वारे पापांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत.
इतरांना अर्पण केल्यानंतर स्वतः ग्रहण करण्याची आपली संस्कृती आहे. अर्पण करणे हाच यज्ञ आणि या यज्ञाचे अमृतस्वरूप असे फळ यज्ञकर्त्याला मिळते. अयज्ञ म्हणजेच या सृष्टीच्या कार्यात जो आपल्याकडून काहीच देत नाही, त्याला सुखाचा अनुभव मिळत नाही, शांती मिळत नाही म्हणून यज्ञप्रक्रिया आपण आपल्या जीवनात आणली पाहिजे.
आजचे विवेचन गुरुदेवांच्या चरणी अर्पण करून विवेचनाची सांगता झाली.
प्रेरणा दीदी - माझी दहावीची परीक्षा चांगली पार पडली परंतु आता पुढे काय करावे? नक्की कोणता मार्ग निवडावा? याविषयी मत सतत बदलत आहे.
ज्या ज्या मार्गांचा विचार केलेला आहे त्या त्या भूमिकेमध्ये जाऊन पहावे. तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिले-
श्रेयान्स्वधर्मो विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
आजचे विवेचन गुरुदेवांच्या चरणी अर्पण करून विवेचनाची सांगता झाली.
प्रश्नोत्तरे
प्रेरणा दीदी - माझी दहावीची परीक्षा चांगली पार पडली परंतु आता पुढे काय करावे? नक्की कोणता मार्ग निवडावा? याविषयी मत सतत बदलत आहे.
ज्या ज्या मार्गांचा विचार केलेला आहे त्या त्या भूमिकेमध्ये जाऊन पहावे. तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिले-
श्रेयान्स्वधर्मो विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: ।।३.३५।।
केवळ तुलनात्मक दृष्टीने पाहून अथवा मिळणारे पॅकेज याचा विचार केला तर तो निव्वळ भार होतो. त्यापेक्षा स्वतःची रुची ओळखावी. आपल्या आवडीनुसार अभ्यासाची निवड केली तर आपण मन लावून अभ्यास करतो. आपल्याला जे जवळून ओळखतात असे आपले आई-वडील, गुरुजन यांचा सल्ला घ्यावा.
दुसऱ्या अध्यायाचा सातवा श्लोक पुन्हा पुन्हा म्हणावा व देवासमोर बसून आतून त्या परमात्म्याला निर्णयाप्रत येण्यासाठी विवेकबुद्धी देण्याचे आवाहन करावे. निर्णय नक्कीच समोर येईल. मग मात्र त्या निर्णयावर दृढ राहिले पाहिजे.
शिवनाथ जी - प्रेरणा दीदींना आपण जे काही सांगितले ते सर्व मी ऐकले. अशा प्रकारे निर्णय घेतल्यानंतर सुद्धा काही वेळा मुले नंतर नैराश्यग्रस्त होतात.
कधी कधी मोठी माणसे देखील मुलांच्या मनात इर्षा निर्माण करतात. येथे तुम्ही हे पाहिले पाहिजे की तुम्ही तुलना तर करीत नाही ना! कारण आजकाल प्रत्येक गोष्टीचे प्रदर्शन अनिवार्य समजले जाऊ लागले आहे. मागच्याच प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमात मी सांगितले होते की कर्म हे पाच गोष्टींवर अवलंबून असते. त्यामध्ये लक फॅक्टर सुद्धा २०% काम करतो. मुलांना यश आणि अपयश या दोन्हींचा स्वीकार कसा करावा याविषयी मार्गदर्शन करणे जरुरीचे आहे. समाधानपूर्वक जीवन पुढे कसे न्यावे हे शिकवणे जरुरीचे आहे.
के. वेंकटेश दादा - या अध्यायाच्या २२ व्या श्लोकामध्ये द्वंद्वातीत या विषयावर स्पष्टीकरण ऐकले. द्वैत आणि अद्वैत याविषयी देखील वाचले आहे. हे दोन्ही मला विरुद्ध वाटत आहे.
अद्वैताकडे जाणे हे सोपे नाही. आपण केवळ त्याविषयीची भावना निर्माण करू शकतो. त्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करू शकतो. एखाद्या वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे अद्वैत आहे. या शब्दाने उगीच गोंधळून जाऊ नका. जीवनामध्ये एक अनुकूल असते, एक प्रतिकूल असते. हेच द्वंद्व. एका विशिष्ट अंतरावरून या दोन्हीकडे आपण पाहू शकतो. असे पाहिल्याने समत्व साधणे सोपे जाते.
मी विद्युत विभागामध्ये काम करताना जेव्हा वीज प्रवाह खंडित होत असे तेव्हा रिपोर्टमध्ये 'occurrence' हा शब्द वापरला जात असे. मग सर्वत्र धावपळ सुरू होई व वीजपुरवठा पूर्ववत केला जाई. त्यानंतरच्या रिपोर्टमध्ये 'Normalcy obtained' असे लिहिले जात असे. आपल्या जीवनात देखील अनेक चढउतार येत असतात. त्यामधून आपण देखील लवकरात लवकर परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करीत असतो.
अर्जुन जेव्हा युद्धात शस्त्र खाली टाकून बसून राहिला तेव्हा भगवंत त्याला अद्वैताचे ज्ञान सांगू शकत होते व ध्यान धारणा करण्यास गंगा किनारी जाण्यास सांगू शकत होते परंतु त्यांनी तसे न करता त्याला कर्माचा सिद्धांत समजावून सांगितला व कर्म करण्यास प्रवृत्त केले.
केवळ तुलनात्मक दृष्टीने पाहून अथवा मिळणारे पॅकेज याचा विचार केला तर तो निव्वळ भार होतो. त्यापेक्षा स्वतःची रुची ओळखावी. आपल्या आवडीनुसार अभ्यासाची निवड केली तर आपण मन लावून अभ्यास करतो. आपल्याला जे जवळून ओळखतात असे आपले आई-वडील, गुरुजन यांचा सल्ला घ्यावा.
दुसऱ्या अध्यायाचा सातवा श्लोक पुन्हा पुन्हा म्हणावा व देवासमोर बसून आतून त्या परमात्म्याला निर्णयाप्रत येण्यासाठी विवेकबुद्धी देण्याचे आवाहन करावे. निर्णय नक्कीच समोर येईल. मग मात्र त्या निर्णयावर दृढ राहिले पाहिजे.
शिवनाथ जी - प्रेरणा दीदींना आपण जे काही सांगितले ते सर्व मी ऐकले. अशा प्रकारे निर्णय घेतल्यानंतर सुद्धा काही वेळा मुले नंतर नैराश्यग्रस्त होतात.
कधी कधी मोठी माणसे देखील मुलांच्या मनात इर्षा निर्माण करतात. येथे तुम्ही हे पाहिले पाहिजे की तुम्ही तुलना तर करीत नाही ना! कारण आजकाल प्रत्येक गोष्टीचे प्रदर्शन अनिवार्य समजले जाऊ लागले आहे. मागच्याच प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमात मी सांगितले होते की कर्म हे पाच गोष्टींवर अवलंबून असते. त्यामध्ये लक फॅक्टर सुद्धा २०% काम करतो. मुलांना यश आणि अपयश या दोन्हींचा स्वीकार कसा करावा याविषयी मार्गदर्शन करणे जरुरीचे आहे. समाधानपूर्वक जीवन पुढे कसे न्यावे हे शिकवणे जरुरीचे आहे.
के. वेंकटेश दादा - या अध्यायाच्या २२ व्या श्लोकामध्ये द्वंद्वातीत या विषयावर स्पष्टीकरण ऐकले. द्वैत आणि अद्वैत याविषयी देखील वाचले आहे. हे दोन्ही मला विरुद्ध वाटत आहे.
अद्वैताकडे जाणे हे सोपे नाही. आपण केवळ त्याविषयीची भावना निर्माण करू शकतो. त्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करू शकतो. एखाद्या वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे अद्वैत आहे. या शब्दाने उगीच गोंधळून जाऊ नका. जीवनामध्ये एक अनुकूल असते, एक प्रतिकूल असते. हेच द्वंद्व. एका विशिष्ट अंतरावरून या दोन्हीकडे आपण पाहू शकतो. असे पाहिल्याने समत्व साधणे सोपे जाते.
मी विद्युत विभागामध्ये काम करताना जेव्हा वीज प्रवाह खंडित होत असे तेव्हा रिपोर्टमध्ये 'occurrence' हा शब्द वापरला जात असे. मग सर्वत्र धावपळ सुरू होई व वीजपुरवठा पूर्ववत केला जाई. त्यानंतरच्या रिपोर्टमध्ये 'Normalcy obtained' असे लिहिले जात असे. आपल्या जीवनात देखील अनेक चढउतार येत असतात. त्यामधून आपण देखील लवकरात लवकर परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करीत असतो.
अर्जुन जेव्हा युद्धात शस्त्र खाली टाकून बसून राहिला तेव्हा भगवंत त्याला अद्वैताचे ज्ञान सांगू शकत होते व ध्यान धारणा करण्यास गंगा किनारी जाण्यास सांगू शकत होते परंतु त्यांनी तसे न करता त्याला कर्माचा सिद्धांत समजावून सांगितला व कर्म करण्यास प्रवृत्त केले.
यानंतर समारोप प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥