विवेचन सारांश
कर्ता कोण ?
सत्राची सुरुवात गुरुगोविंद गिरीजी महाराज यांना वंदन करून आणि सर्व गीता प्रेमी साधकांना अभिवादन करून झाली.
आपण गीतेतील तिसरा अध्याय 'कर्मयोग 'याचा अभ्यास करत आहोत. हा अध्याय लोकमान्य टिळकांचा अतिशय आवडता अध्याय. लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेवर 'गीतारहस्य' नावाचे भाष्य लिहिले. लोकमान्य टिळकांच्या मते गीतेचे रहस्य म्हणजे कर्मयोग. फक्त कर्मयोग आचरणात आणला तर संपूर्ण भगवद्गीता आचरणात आणल्यासारखे आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्ञानयोग आणि कर्मयोग असे दोन मार्ग परमेश्वर प्राप्तीकरता सांगितले तेव्हा अर्जुनाला प्रश्न पडला की भगवान मला युद्धासारखे कठोर कर्म करण्यास का सांगत आहेत? हा प्रश्न अर्जुनाने भगवंतांना विचारल्यावर भगवान म्हणाले -
न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् - की अरे कुठलाही माणूस एक क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही.
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः - आपले शरीर प्रकृतीने निर्माण केलेले असल्यामुळे आपण कर्म करण्यास बांधील आहोत.
मग जर कर्म करायचंच आहे तर ते कर्मयोगानुसार का करू नये? इथे भगवान आपल्याला कर्माच्या बंधनातून मुक्त होण्याची युक्ती सांगतात. भगवंत पुढे म्हणतात -
नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः
शास्त्राप्रमाणे आपले नियत कर्म जे आपल्या वर्णानुसार, आश्रमानुसार ठरते ते कर्म करत राहावे. आणि हे विहित कर्म जर कर्तव्यभावनेने केले तर त्यालाच यज्ञ म्हणतात.
सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक्।
प्रत्येक जीवाच्या उत्पत्तीबरोबरच त्याचे कर्म निश्चित होते आणि ते त्याने केलेच पाहिजे. त्यामुळे त्याचा उत्कर्ष होतो अशी आज्ञा ब्रह्मदेव आपल्याला देतात. असे केल्याने तुमच्या सर्व कामना पूर्ण होतील असा आशीर्वादही ते देतात.
भगवंत म्हणतात कर्तव्यकर्म करत राहिले पाहिजे आणि ते कसे केले पाहिजे -
तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर।
कुठलेही कर्म करताना योग्य असेल तेच केले पाहिजे. त्यालाच कार्य असे म्हणतात. जसे पिण्यायोग्य पाण्याला पेयजल असे म्हणतात तसे करण्यास योग्य ते कर्म ते कार्यकर्म. हे कार्य कर्म योग्य प्रकारे मनापासून करावे असे केल्याने अनेक लोकांना परमेश्वरप्राप्ती झाली आहे.
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः
येथे ते राजा जनकाचे अस उदाहरण देतात. राजा जनकाने कर्म करत परमसिद्धी प्राप्त केली. अर्जुन सुद्धा श्रेष्ठ योद्धा आहे, त्यानेही कर्मात रत राहायला हवे असे भगवंत म्हणतात.
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते।।
ते पुढे सांगतात की श्रेष्ठ लोक जसे वागतात त्यांचेच अनुकरण इतर सामान्य लोक करतात. त्यांचे वागणे प्रमाण मानतात. घरातील बुजुर्ग जसे वर्तन करतात तसेच वर्तन घरातील मुले करतात. संतांना कुठलेच कर्म करण्याची आवश्यकता नसते तरीही ते कर्म करत राहतात कारण लोकांपुढे चांगले उदाहरण रहावे म्हणून.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
आज भगवद्गीता सांगून पाच हजार वर्षे झाली तरीही ती तितकीच प्रभावी आणि उपयोगी आहे. कारण भगवान भगवद्गीता फक्त सांगत नाहीत तर ती आचरणातही आणतात.
आपण गीतेतील तिसरा अध्याय 'कर्मयोग 'याचा अभ्यास करत आहोत. हा अध्याय लोकमान्य टिळकांचा अतिशय आवडता अध्याय. लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेवर 'गीतारहस्य' नावाचे भाष्य लिहिले. लोकमान्य टिळकांच्या मते गीतेचे रहस्य म्हणजे कर्मयोग. फक्त कर्मयोग आचरणात आणला तर संपूर्ण भगवद्गीता आचरणात आणल्यासारखे आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्ञानयोग आणि कर्मयोग असे दोन मार्ग परमेश्वर प्राप्तीकरता सांगितले तेव्हा अर्जुनाला प्रश्न पडला की भगवान मला युद्धासारखे कठोर कर्म करण्यास का सांगत आहेत? हा प्रश्न अर्जुनाने भगवंतांना विचारल्यावर भगवान म्हणाले -
न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् - की अरे कुठलाही माणूस एक क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही.
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः - आपले शरीर प्रकृतीने निर्माण केलेले असल्यामुळे आपण कर्म करण्यास बांधील आहोत.
मग जर कर्म करायचंच आहे तर ते कर्मयोगानुसार का करू नये? इथे भगवान आपल्याला कर्माच्या बंधनातून मुक्त होण्याची युक्ती सांगतात. भगवंत पुढे म्हणतात -
नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः
शास्त्राप्रमाणे आपले नियत कर्म जे आपल्या वर्णानुसार, आश्रमानुसार ठरते ते कर्म करत राहावे. आणि हे विहित कर्म जर कर्तव्यभावनेने केले तर त्यालाच यज्ञ म्हणतात.
सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक्।
प्रत्येक जीवाच्या उत्पत्तीबरोबरच त्याचे कर्म निश्चित होते आणि ते त्याने केलेच पाहिजे. त्यामुळे त्याचा उत्कर्ष होतो अशी आज्ञा ब्रह्मदेव आपल्याला देतात. असे केल्याने तुमच्या सर्व कामना पूर्ण होतील असा आशीर्वादही ते देतात.
भगवंत म्हणतात कर्तव्यकर्म करत राहिले पाहिजे आणि ते कसे केले पाहिजे -
तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर।
कुठलेही कर्म करताना योग्य असेल तेच केले पाहिजे. त्यालाच कार्य असे म्हणतात. जसे पिण्यायोग्य पाण्याला पेयजल असे म्हणतात तसे करण्यास योग्य ते कर्म ते कार्यकर्म. हे कार्य कर्म योग्य प्रकारे मनापासून करावे असे केल्याने अनेक लोकांना परमेश्वरप्राप्ती झाली आहे.
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः
येथे ते राजा जनकाचे अस उदाहरण देतात. राजा जनकाने कर्म करत परमसिद्धी प्राप्त केली. अर्जुन सुद्धा श्रेष्ठ योद्धा आहे, त्यानेही कर्मात रत राहायला हवे असे भगवंत म्हणतात.
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते।।
ते पुढे सांगतात की श्रेष्ठ लोक जसे वागतात त्यांचेच अनुकरण इतर सामान्य लोक करतात. त्यांचे वागणे प्रमाण मानतात. घरातील बुजुर्ग जसे वर्तन करतात तसेच वर्तन घरातील मुले करतात. संतांना कुठलेच कर्म करण्याची आवश्यकता नसते तरीही ते कर्म करत राहतात कारण लोकांपुढे चांगले उदाहरण रहावे म्हणून.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
हे ऐसे असे स्वभावे । म्हणून कर्म न लागते सोडावे ।
ते विशेष प्रकारे आचरावे । लागते संतांना ॥ आज भगवद्गीता सांगून पाच हजार वर्षे झाली तरीही ती तितकीच प्रभावी आणि उपयोगी आहे. कारण भगवान भगवद्गीता फक्त सांगत नाहीत तर ती आचरणातही आणतात.
3.22
न मे पार्थास्ति कर्तव्यं(न्), त्रिषु लोकेषु किञ्चन।
नानवाप्तमवाप्तव्यं(व्ँ), वर्त एव च कर्मणि॥3.22॥
हे अर्जुना! मला या तिन्ही लोकांत काहीही कर्तव्य नाही आणि मिळविण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही, असे नाही. तरीही मी कर्म करीतच असतो.
भगवान म्हणतात हे हे अर्जुना या तिन्ही लोकांत माझ्याकरता कुठलेही कर्तव्य करायचे राहिलेले नाही.
एखाद्या सामान्य माणसाला उदरनिर्वाहासाठी काम करणे आवश्यक आहे तसे भगवंतांचे नाही. भगवान स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्ही लोकांचे स्वामी आहेत. या तिन्ही लोकांत त्यांना केलेच पाहिजे असे कुठलेही कर्तव्य नाही.
'अवाप्तव्यम्' म्हणजे त्यांना प्राप्त करून घेण्यास योग्य किंवा 'न अनवाप्त्तम्' म्हणजे प्राप्त न झालेली अशी कुठलीच गोष्ट नाही. त्यांना सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. तरीही भगवान कर्माचे आचरण करतच राहतात.
मागील सत्रात आपण बघितले चार प्रकारचे लोक असतात
१ ज्यांचा काम केल्याशिवाय उदरनिर्वाह होऊ शकत नाही आणि जे काम करतात.
२ ज्यांना उदरनिर्वाह करता कामाची आवश्यकता आहे पण ते काम न करता भीक मागतात.
३ ज्यांच्याकडे सर्व गोष्टी उपलब्ध आहेत म्हणून ज्यांना काही करण्याची आवश्यकता नाही आणि जे काहीही काम करत नाहीत आळशीपणा करतात.
४ यांच्याकडे सर्व गोष्टी उपलब्ध आहेत त्यांना काहीही करण्याची आवश्यकता नाही पण तरीही ते सतत काम करत राहतात.
भगवान सुद्धा बालपणापासून सतत काम करत आले आहेत. त्यांनी लहानपणी गोपालनाचे काम केले आहे. यज्ञामध्ये खरकटी भांडी उचलण्याचे काम त्यांनी केले आहे. आताही ते अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत आहेत. घोड्यांची निगा राखणे, युद्धात जखमी झालेल्या घोड्यांची शुश्रुषा करणे इत्यादी कामे ते करत आहेत.
एखाद्या कंपनीचा संचालक जर काम करत असेल तर त्याच्या हाताखालील सर्व लोक आपापली कामे नीट करतात पण तोच जर काम करत नसेल तर कुणीच काम करत नाही.
आपले प्रधानमंत्री दिवसाचे १८ तास काम करतात आणि स्वतःचे उदाहरण इतरांना घालून देतात. हे नेतृत्वाचे गुण भगवद्गीतेमधे शिकण्यास मिळतात. एका विद्यार्थिनीने Management Techniques and Leadership Qualities Enshrined in Bhagavad Gita असा विषय घेऊन PhD केली आहे. भगवान स्वतः सतत काम करत राहतात म्हणूनच भगवद्गीता आजही तितकीच प्रभावी आणि उपयोगी आहे.
एखाद्या सामान्य माणसाला उदरनिर्वाहासाठी काम करणे आवश्यक आहे तसे भगवंतांचे नाही. भगवान स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्ही लोकांचे स्वामी आहेत. या तिन्ही लोकांत त्यांना केलेच पाहिजे असे कुठलेही कर्तव्य नाही.
'अवाप्तव्यम्' म्हणजे त्यांना प्राप्त करून घेण्यास योग्य किंवा 'न अनवाप्त्तम्' म्हणजे प्राप्त न झालेली अशी कुठलीच गोष्ट नाही. त्यांना सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. तरीही भगवान कर्माचे आचरण करतच राहतात.
मागील सत्रात आपण बघितले चार प्रकारचे लोक असतात
१ ज्यांचा काम केल्याशिवाय उदरनिर्वाह होऊ शकत नाही आणि जे काम करतात.
२ ज्यांना उदरनिर्वाह करता कामाची आवश्यकता आहे पण ते काम न करता भीक मागतात.
३ ज्यांच्याकडे सर्व गोष्टी उपलब्ध आहेत म्हणून ज्यांना काही करण्याची आवश्यकता नाही आणि जे काहीही काम करत नाहीत आळशीपणा करतात.
४ यांच्याकडे सर्व गोष्टी उपलब्ध आहेत त्यांना काहीही करण्याची आवश्यकता नाही पण तरीही ते सतत काम करत राहतात.
भगवान सुद्धा बालपणापासून सतत काम करत आले आहेत. त्यांनी लहानपणी गोपालनाचे काम केले आहे. यज्ञामध्ये खरकटी भांडी उचलण्याचे काम त्यांनी केले आहे. आताही ते अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत आहेत. घोड्यांची निगा राखणे, युद्धात जखमी झालेल्या घोड्यांची शुश्रुषा करणे इत्यादी कामे ते करत आहेत.
एखाद्या कंपनीचा संचालक जर काम करत असेल तर त्याच्या हाताखालील सर्व लोक आपापली कामे नीट करतात पण तोच जर काम करत नसेल तर कुणीच काम करत नाही.
आपले प्रधानमंत्री दिवसाचे १८ तास काम करतात आणि स्वतःचे उदाहरण इतरांना घालून देतात. हे नेतृत्वाचे गुण भगवद्गीतेमधे शिकण्यास मिळतात. एका विद्यार्थिनीने Management Techniques and Leadership Qualities Enshrined in Bhagavad Gita असा विषय घेऊन PhD केली आहे. भगवान स्वतः सतत काम करत राहतात म्हणूनच भगवद्गीता आजही तितकीच प्रभावी आणि उपयोगी आहे.
यदि ह्यहं(न्) न वर्तेयं(ञ्), जातु कर्मण्यतन्द्रितः।
मम वर्त्मानुवर्तन्ते, मनुष्याः(फ्) पार्थ सर्वशः॥3.23॥
कारण हे पार्था! जर का मी सावध राहून कर्मे केली नाहीत, तर मोठे नुकसान होईल. कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात.
पुढे भगवान म्हणतात की मी सतत लक्ष देऊन अतन्द्रितः - सावधानतेने काम करतो. यदि ह्यहं न वर्तेयं - जर मी तसे केले नाही तर खूप नुकसान होईल.
यक्षाने धर्मराजाला प्रश्न विचारले आहेत. त्यातील एक प्रश्न आहे किम् एकवदम् धर्मम् ? - धर्म म्हणजे काय एका शब्दात सांग. धर्मराजाने उत्तर दिले, दाक्षम् एकवदम् धर्मम् I - धर्म म्हणजे दक्षता. भगवान म्हणतात, मीच जर लक्ष देऊन सावधानतेने काम केले नाही तर - मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः - सर्व माणसे माझेच अनुकरण करतील आणि त्यामुळे खूप मोठी हानी होईल.
एक क्षणभरासाठी विचार करा की जर भगवंतांनी आपले कर्म केले नाही तर काय होईल?
या पृथ्वीने आपल्या सर्वांना धारण केले आहे आणि सूर्याने पृथ्वीला धारण केले आहे. वैज्ञानिक म्हणतात की सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे. म्हणजे सूर्य काहीच करत नाही तरीही सूर्याने पृथ्वीला धारण केले आहे. अशाच प्रकारे या विश्वातील सर्व ग्रहगोलांना परमात्म्याने धारण केले आहे. त्यामुळे भगवंतांनी त्यांचे कर्म केले नाही तर पूर्ण विश्व कोसळून जाईल.
यक्षाने धर्मराजाला प्रश्न विचारले आहेत. त्यातील एक प्रश्न आहे किम् एकवदम् धर्मम् ? - धर्म म्हणजे काय एका शब्दात सांग. धर्मराजाने उत्तर दिले, दाक्षम् एकवदम् धर्मम् I - धर्म म्हणजे दक्षता. भगवान म्हणतात, मीच जर लक्ष देऊन सावधानतेने काम केले नाही तर - मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः - सर्व माणसे माझेच अनुकरण करतील आणि त्यामुळे खूप मोठी हानी होईल.
एक क्षणभरासाठी विचार करा की जर भगवंतांनी आपले कर्म केले नाही तर काय होईल?
या पृथ्वीने आपल्या सर्वांना धारण केले आहे आणि सूर्याने पृथ्वीला धारण केले आहे. वैज्ञानिक म्हणतात की सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे. म्हणजे सूर्य काहीच करत नाही तरीही सूर्याने पृथ्वीला धारण केले आहे. अशाच प्रकारे या विश्वातील सर्व ग्रहगोलांना परमात्म्याने धारण केले आहे. त्यामुळे भगवंतांनी त्यांचे कर्म केले नाही तर पूर्ण विश्व कोसळून जाईल.
उत्सीदेयुरिमे लोका, न कुर्यां(ङ्) कर्म चेदहम्।
सङ्करस्य च कर्ता स्याम्, उपहन्यामिमाः(फ्) प्रजाः॥3.24॥
म्हणून मी कर्म केले नाही, तर सर्व माणसे नष्ट भ्रष्ट होतील आणि मी संकरतेचे कारण होईन. तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईन.
भगवान पुढे म्हणतात - न कुर्यां कर्म चेत् अहम् - मी जर कर्म केले नाही तर, उत्सीदेयुरिमे लोका - सर्व विश्व कोसळेल सर्व माणसे नष्ट होतील आणि सङ्करस्य च कर्ता स्याम् - मी निर्माण करता असूनही उपहन्यामिमाः प्रजाः - मी सर्व विश्वाच्या नाशाचे कारण होईन.
सक्ताः(ख्) कर्मण्यविद्वांसो, यथा कुर्वन्ति भारत।
कुर्याद्विद्वांस्तथासक्त:(श्), चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम्॥3.25॥
हे भारता! कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्में करतात, त्यात रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्में करावीत.
अविद्वांस: म्हणजे अज्ञानी लोक. अर्थात सामान्य लोक ज्यांनी गीता वाचली नाही ते. ते लोक आसक्त होऊन कर्म करतात. म्हणजेच कुठल्या तरी कामनापूर्ती साठी कर्म करतात. कुठलेही कर्म करायच्या आधी त्यांना त्यातून काही प्राप्ती होईल अशी आशा असते. Incentive बघून त्याप्रमाणे ते अधिक चांगल्या प्रकारे लक्ष देऊन काम करतात. पण ज्ञानी लोकांनी मात्र कुठचेही काम अनासक्त होऊन, कर्तव्य म्हणून, करत राहीले पाहिजे. त्यांनी लोकसंग्रहासाठी, लोकांच्या कल्याणाकरता काम करत राहिले पाहिजे.
स्वामी विवेकानंदांनी हातातील जपमाळ कधीच बाजूला ठेवली नाही. खरं म्हणजे त्यांना जपमाळेची गरजच नव्हती. त्यांचे नामस्मरण सततच चालू असे. परंतु लोकांना उदाहरण घालून देण्याकरता ते स्वतः नेहमीच जपमाळ ओढत असत.
ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील गोष्ट आहे ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे यांना संन्याशाची मुले म्हणून त्यावेळी समाजातील लोकांनी खूप त्रास दिला. त्यांची मुंज लावण्यास सर्व ब्राह्मणांनी नकार दिला. तेव्हा त्यांचे मोठे भाऊ आणि गुरू निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले की तू तर ज्ञानी आहेस तुला मुंजीची काय आवश्यकता? तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की माझी जर मुंज झाली नाही तर या संस्काराचे महत्त्व नाहीसे होईल.
लहान मुले बाहुलाबाहुलीचे लग्न लावतात. त्यामध्ये मोठे लोक हे खूप उत्सुकता दाखवतात कारण त्यामुळे लहान मुलांचा उत्साह वाढतो. अगदी याचप्रमाणे समाजातील श्रेष्ठ लोकांनी सुद्धा अज्ञानी लोकांना कामे उत्तम रीतीने करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. अज्ञानी लोक जेव्हा फळाची आशा धरून काम करतात तेव्हा त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. तेव्हा त्यांना अनासक्त होऊन काम करण्याचा उपदेश देऊन त्यांचा बुद्धिभेद करणे उचित नाही. अज्ञानी लोकांना जेव्हा एखादे कर्म योग्य प्रकारे करून अपेक्षित फळ मिळेल तेव्हाच त्यांना पुढे अनासक्तपणे कर्म करण्याची इच्छा होईल. त्यांनी स्वतःचे उदाहरण अज्ञानी लोकांपुढे ठेवले पाहिजे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
मार्गाधारे वर्तावे, हे विश्वचि मोहरे लावावे
म्हणजेच
संतांनी सन्मार्गे वर्तावे, हे विश्वचि सन्मार्गे लावावे.
अंतरी सकाम नसावे, स्वर्गाविषयी..
अर्थात संतांनी स्वतः सन्मार्गाने जावे. लोकांपुढे स्वतःचे उदाहरण ठेवावे. आणि स्वतः सकाम किंवा आसक्त न होता कर्म करावे स्वर्गप्राप्तीची आशा धरू नये.
स्वामी विवेकानंदांनी हातातील जपमाळ कधीच बाजूला ठेवली नाही. खरं म्हणजे त्यांना जपमाळेची गरजच नव्हती. त्यांचे नामस्मरण सततच चालू असे. परंतु लोकांना उदाहरण घालून देण्याकरता ते स्वतः नेहमीच जपमाळ ओढत असत.
ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील गोष्ट आहे ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे यांना संन्याशाची मुले म्हणून त्यावेळी समाजातील लोकांनी खूप त्रास दिला. त्यांची मुंज लावण्यास सर्व ब्राह्मणांनी नकार दिला. तेव्हा त्यांचे मोठे भाऊ आणि गुरू निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले की तू तर ज्ञानी आहेस तुला मुंजीची काय आवश्यकता? तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की माझी जर मुंज झाली नाही तर या संस्काराचे महत्त्व नाहीसे होईल.
लहान मुले बाहुलाबाहुलीचे लग्न लावतात. त्यामध्ये मोठे लोक हे खूप उत्सुकता दाखवतात कारण त्यामुळे लहान मुलांचा उत्साह वाढतो. अगदी याचप्रमाणे समाजातील श्रेष्ठ लोकांनी सुद्धा अज्ञानी लोकांना कामे उत्तम रीतीने करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. अज्ञानी लोक जेव्हा फळाची आशा धरून काम करतात तेव्हा त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. तेव्हा त्यांना अनासक्त होऊन काम करण्याचा उपदेश देऊन त्यांचा बुद्धिभेद करणे उचित नाही. अज्ञानी लोकांना जेव्हा एखादे कर्म योग्य प्रकारे करून अपेक्षित फळ मिळेल तेव्हाच त्यांना पुढे अनासक्तपणे कर्म करण्याची इच्छा होईल. त्यांनी स्वतःचे उदाहरण अज्ञानी लोकांपुढे ठेवले पाहिजे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
मार्गाधारे वर्तावे, हे विश्वचि मोहरे लावावे
म्हणजेच
संतांनी सन्मार्गे वर्तावे, हे विश्वचि सन्मार्गे लावावे.
अंतरी सकाम नसावे, स्वर्गाविषयी..
अर्थात संतांनी स्वतः सन्मार्गाने जावे. लोकांपुढे स्वतःचे उदाहरण ठेवावे. आणि स्वतः सकाम किंवा आसक्त न होता कर्म करावे स्वर्गप्राप्तीची आशा धरू नये.
न बुद्धिभेदं(ञ्) जनयेद्, अज्ञानां(ङ्) कर्मसङ्गिनाम्।
जोषयेत्सर्वकर्माणि, विद्वान्युक्तः(स्) समाचरन्॥3.26॥
परमात्म्यस्वरुपात स्थिर असलेल्या ज्ञानी पुरुषाने शास्त्रविहीत कर्मांत आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करु नये. उलट स्वतः शास्त्रविहीत सर्व कर्में उत्तम प्रकारे करीत त्यांच्याकडूनही तशीच करुन घ्यावी.
भगवान पुढे सांगतात की ज्ञानी लोकांनी अज्ञानी, सामान्य लोकांना त्यांची कर्मे करू द्यावीत मग ती जरी आसक्तियुक्त असतील तरीही त्यांना उपदेश करून त्यांचा बुद्धिभेद करू नये.
ज्ञानेश्वर महाराज येथे एक सुंदर उदाहरण देतात की जे लहान बालक आहेत त्याला दूध पिताना सुद्धा कष्ट होतात त्याला पक्वान्न भरवणे योग्य नाही. ज्ञानी लोक जेव्हा स्वतः अनासक्त होऊन कर्म करतील तेव्हा त्यांच्या उदाहरणातून अज्ञानी सामान्य लोक सुद्धा आसक्ती सोडून कर्मे करण्यास प्रवृत्त होतील.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
सत्कर्मची शिकवावे, तेच केवळ प्रशंसावे
तेच आचरूनी दाखवावे, निष्काम संतांनी
अर्थात संतांनी सामान्य लोकांना सत्कर्म शिकवावे. स्वतः तसेच वागून त्यांच्याकरता उदाहरण घालून द्यावे.
बहुरूपी होती राजा राणी, परि स्त्री पुरुष भाव नसे त्यांच्या मनी
परंतु ते लोकाकारणी वागतात
नाटकातील नट, नटी राजा, राणीचे काम करतात. त्यांना माहित असते की मी राजा नाही किंवा राणी नाही. त्याचप्रमाणे संतांनी सुद्धा स्वतःला कुठल्याही फळाची आवश्यकता नसतानाही जणू काही आपण फलप्राप्तीसाठी सत्कर्म करत आहोत असे दाखवावे.
जेव्हा आपण कर्मे करतो तेव्हा ती वास्तविकपणे कोण करतो हे भगवान पुढील श्लोकात सांगतात.
ज्ञानेश्वर महाराज येथे एक सुंदर उदाहरण देतात की जे लहान बालक आहेत त्याला दूध पिताना सुद्धा कष्ट होतात त्याला पक्वान्न भरवणे योग्य नाही. ज्ञानी लोक जेव्हा स्वतः अनासक्त होऊन कर्म करतील तेव्हा त्यांच्या उदाहरणातून अज्ञानी सामान्य लोक सुद्धा आसक्ती सोडून कर्मे करण्यास प्रवृत्त होतील.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
सत्कर्मची शिकवावे, तेच केवळ प्रशंसावे
तेच आचरूनी दाखवावे, निष्काम संतांनी
अर्थात संतांनी सामान्य लोकांना सत्कर्म शिकवावे. स्वतः तसेच वागून त्यांच्याकरता उदाहरण घालून द्यावे.
बहुरूपी होती राजा राणी, परि स्त्री पुरुष भाव नसे त्यांच्या मनी
परंतु ते लोकाकारणी वागतात
नाटकातील नट, नटी राजा, राणीचे काम करतात. त्यांना माहित असते की मी राजा नाही किंवा राणी नाही. त्याचप्रमाणे संतांनी सुद्धा स्वतःला कुठल्याही फळाची आवश्यकता नसतानाही जणू काही आपण फलप्राप्तीसाठी सत्कर्म करत आहोत असे दाखवावे.
जेव्हा आपण कर्मे करतो तेव्हा ती वास्तविकपणे कोण करतो हे भगवान पुढील श्लोकात सांगतात.
प्रकृतेः(ख्) क्रियमाणानि, गुणैः(ख्) कर्माणि सर्वशः।
अहङ्कारविमूढात्मा, कर्ताहमिति मन्यते॥3.27॥
वास्तविक सर्व कर्में सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात. तरीही ज्याचे अंतःकरण अहंकाराने मोहित झाले आहे, असा अज्ञानी पुरुष ‘मी कर्ता आहे’ असे मानतो.
भगवंतांनी सर्वात पहिल्यांदा सांगितले की नियतकर्म करत राहा आणि ते अनासक्त होऊन म्हणजे फलाची अपेक्षा न करता करत राहा. आता भगवान विचारतात की कर्म करणारा कोण आहे? 'मी' म्हणजे माझे शरीर आहे का?
जेव्हा आपण म्हणतो माझे शरीर, माझे डोळे, माझे कान, तेव्हा डोळे म्हणजे मी नव्हे. तसेच शरीर म्हणजे मी नाही. मी जेव्हा माझे घर म्हणतो तेव्हा मी त्या घरात राहतो. त्याचप्रमाणे मी माझ्या शरीरात राहतो.
कर्म कोण करते आहे? कर्म शरीर करत आहे. चौदाव्या अध्यायात आपण बघितले की शरीर प्रकृतीने बनलेले आहे. सातव्या अध्यायात सांगितले आहे की पंचमहाभूते - पृथ्वी, वायू, आकाश, आप ,तेज आणि मन, बुद्धी, अहंकार या साऱ्यांनी प्रकृती बनली आहे .या प्रकृती मध्ये तीन गुण आहेत. सत्व, रज आणि तम. हे तीन गुण शरीराच्या द्वारा कर्म करवतात.
माझे स्वरूप कोणते? माझे स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप म्हणजेच माझ्या उपस्थितीमध्ये माझ्या शरीराद्वारे कर्म होत आहे. म्हणजेच मी कर्म करत नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. प्रकृतीच्या गुणांद्वारे सर्व कर्मे केली जातात. कर्म करणारे शरीर आहे आणि कर्म करवून घेणारे गुण आहेत. मी या कर्मांचा कर्ता नाही. परंतु वास्तवात आपण हे समजून न घेता सर्व कर्मे 'मीच' करतो असेच समजतो. एखादे सत्कर्म घडल्यास आपण लगेच म्हणतो की हे मी केले आहे. कारण आपण आपल्या शरीरालाच 'मी' समजत असतो.
आकाशात सूर्य उगवतो आणि फुले उमलतात. म्हणजे सूर्याने फुले उमलवली नाहीत तर सूर्य उगवल्यामुळे फुले उमलली. त्याचप्रमाणे आत्मा कर्म करत नाही तर शरीराद्वारा प्रकृती कर्म करते. म्हणूनच कर्तव्यकर्म उत्तम प्रकारे करावे आणि नंतर हे कर्म मी करत नाही हे समजावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दुसऱ्यांचे ओझे मी माझ्या डोक्यावर घेतले तर माझीच मान दुखणार. त्याचप्रमाणे प्रकृतीने केलेल्या कर्माला मी स्वतः ला जबाबदार धरतो त्यामुळे मी थकतो. कारण मी माझ्या शरीरालाच 'मी' समजतो. म्हणूनच संत कधीच थकत नाहीत कारण ते आपल्या शरीराला 'मी' मानत नाहीत.
दोन 'मी' असतात. एक कच्चा 'मी' आणि दुसरा पक्का 'मी'. आपण शरीराबरोबर ज्याला जोडतो तो कच्चा 'मी' उदाहरणार्थ मी उठलो, मी बसलो, मी झोपलो. हा व्यवहारिक मी. पण ज्ञानाच्या रूपामध्ये मी ज्याला जाणतो तो 'पक्का मी' आहे. पक्का मी म्हणजे आत्मातत्त्व. या आत्मतत्त्वामुळे शरीराच्या द्वारा कार्य होते.
संत कबीर म्हणतात
जो कुछ किया तुम किया,
मै कुछ किया नाही,
कहो कही ये मै किया,
तो तुमही हो मुझे माही
कबीर भगवंतांना म्हणतात, "मी काहीच करत नाही. तुम्हीच सर्व काही करता आणि जर तुम्ही म्हणालात की हे मी केले आहे तर माझ्यामध्ये पण तुम्हीच आहात ना. माझ्यात तुमचाच अंश आहे म्हणजे हे तुम्हीच केले आहे."
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
तैसी शुभाशुभ कर्मे, जी घडतात प्रकृतीधर्मे,
मूर्ख म्हणे मती भ्रमे, मीच कर्ता याचा.
प्रकृतीच्या तीन गुणांमुळे कर्मे घडतात पण आपली बुद्धी अहंकाराने भ्रष्ट होते आणि आपण समजतो ती मीच केली.
कर्मयोगाची पहिली पायरी म्हणजे कर्तव्यकर्म करणे दुसरी पायरी ती योग्य रीतीने, अनासक्ती ने करणे आणि तिसरी पायरी म्हणजे कर्म करणारा मी नाही हे जाणणे.
जेव्हा आपण म्हणतो माझे शरीर, माझे डोळे, माझे कान, तेव्हा डोळे म्हणजे मी नव्हे. तसेच शरीर म्हणजे मी नाही. मी जेव्हा माझे घर म्हणतो तेव्हा मी त्या घरात राहतो. त्याचप्रमाणे मी माझ्या शरीरात राहतो.
कर्म कोण करते आहे? कर्म शरीर करत आहे. चौदाव्या अध्यायात आपण बघितले की शरीर प्रकृतीने बनलेले आहे. सातव्या अध्यायात सांगितले आहे की पंचमहाभूते - पृथ्वी, वायू, आकाश, आप ,तेज आणि मन, बुद्धी, अहंकार या साऱ्यांनी प्रकृती बनली आहे .या प्रकृती मध्ये तीन गुण आहेत. सत्व, रज आणि तम. हे तीन गुण शरीराच्या द्वारा कर्म करवतात.
माझे स्वरूप कोणते? माझे स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप म्हणजेच माझ्या उपस्थितीमध्ये माझ्या शरीराद्वारे कर्म होत आहे. म्हणजेच मी कर्म करत नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. प्रकृतीच्या गुणांद्वारे सर्व कर्मे केली जातात. कर्म करणारे शरीर आहे आणि कर्म करवून घेणारे गुण आहेत. मी या कर्मांचा कर्ता नाही. परंतु वास्तवात आपण हे समजून न घेता सर्व कर्मे 'मीच' करतो असेच समजतो. एखादे सत्कर्म घडल्यास आपण लगेच म्हणतो की हे मी केले आहे. कारण आपण आपल्या शरीरालाच 'मी' समजत असतो.
आकाशात सूर्य उगवतो आणि फुले उमलतात. म्हणजे सूर्याने फुले उमलवली नाहीत तर सूर्य उगवल्यामुळे फुले उमलली. त्याचप्रमाणे आत्मा कर्म करत नाही तर शरीराद्वारा प्रकृती कर्म करते. म्हणूनच कर्तव्यकर्म उत्तम प्रकारे करावे आणि नंतर हे कर्म मी करत नाही हे समजावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दुसऱ्यांचे ओझे मी माझ्या डोक्यावर घेतले तर माझीच मान दुखणार. त्याचप्रमाणे प्रकृतीने केलेल्या कर्माला मी स्वतः ला जबाबदार धरतो त्यामुळे मी थकतो. कारण मी माझ्या शरीरालाच 'मी' समजतो. म्हणूनच संत कधीच थकत नाहीत कारण ते आपल्या शरीराला 'मी' मानत नाहीत.
दोन 'मी' असतात. एक कच्चा 'मी' आणि दुसरा पक्का 'मी'. आपण शरीराबरोबर ज्याला जोडतो तो कच्चा 'मी' उदाहरणार्थ मी उठलो, मी बसलो, मी झोपलो. हा व्यवहारिक मी. पण ज्ञानाच्या रूपामध्ये मी ज्याला जाणतो तो 'पक्का मी' आहे. पक्का मी म्हणजे आत्मातत्त्व. या आत्मतत्त्वामुळे शरीराच्या द्वारा कार्य होते.
संत कबीर म्हणतात
जो कुछ किया तुम किया,
मै कुछ किया नाही,
कहो कही ये मै किया,
तो तुमही हो मुझे माही
कबीर भगवंतांना म्हणतात, "मी काहीच करत नाही. तुम्हीच सर्व काही करता आणि जर तुम्ही म्हणालात की हे मी केले आहे तर माझ्यामध्ये पण तुम्हीच आहात ना. माझ्यात तुमचाच अंश आहे म्हणजे हे तुम्हीच केले आहे."
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
तैसी शुभाशुभ कर्मे, जी घडतात प्रकृतीधर्मे,
मूर्ख म्हणे मती भ्रमे, मीच कर्ता याचा.
प्रकृतीच्या तीन गुणांमुळे कर्मे घडतात पण आपली बुद्धी अहंकाराने भ्रष्ट होते आणि आपण समजतो ती मीच केली.
कर्मयोगाची पहिली पायरी म्हणजे कर्तव्यकर्म करणे दुसरी पायरी ती योग्य रीतीने, अनासक्ती ने करणे आणि तिसरी पायरी म्हणजे कर्म करणारा मी नाही हे जाणणे.
तत्त्ववित्तु महाबाहो, गुणकर्मविभागयोः।
गुणा गुणेषु वर्तन्त, इति मत्वा न सज्जते॥3.28॥
पण हे महाबाहो! गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणांत वावरत असतात, हे लक्षात घेऊन त्यामधे आसक्त होत नाही.
तत्ववित् म्हणजे तत्व जाणणारा. तत् म्हणजे तो - आत्मा. तत्त्व म्हणजे त्याला भावासहित संपूर्णपणे जाणणे. तत्त्ववेत्ता म्हणजे आत्म्याला संपूर्णपणे जाणणारा.
ज्याला आत्मज्ञान झाले आहे तो हे जाणतो की तीन गुणांमुळे कर्मे घडतात, कोणत्या गुणांमुळे कोणती वेगवेगळी कर्मे होतात. सत्व, रज आणि तम हे तीन गुण एकमेकांशी व्यवहार करत राहतात. या गुणांच्या खेळामध्ये हा ज्ञानी अडकून राहत नाही.
देहधारी असती परी ते कर्मबद्ध न होती
देह म्हणजे शरीर आहे त्यामुळे हे ज्ञानी लोक कर्म करतात पण ते कर्म शरीराच्या द्वारा प्रकृतीद्वारा होत आहे हे समजून त्यात बांधले जात नाहीत.
सूर्यास न बांधती कर्मे जगाची
सूर्योदय होतो आणि सूर्यास्त होतो त्याप्रमाणे पृथ्वीवरील सर्व कामे घडतात परंतु ही सर्व कामे सूर्यामुळे होत नाहीत कारण सूर्य उगवतही नाही आणि सूर्याचा अस्तही होत नाही. पृथ्वी सूर्याभोवती व स्वतःभोवती फिरत असल्यामुळे सूर्योदय, सूर्यास्त झाला असे आपल्याला वाटते. याचप्रमाणे कार्य शरीरामुळे होते परंतु आपल्याला वाटते की मी कार्य करत आहे.
कर्मयोगासाठी उत्तम उदाहरण सूर्याचे आहे. सूर्य भगवान न थांबता सतत कार्यरत असतात (no vacation). सूर्याचा प्रकाश सर्वांना सारखाच मिळतो (no discrimination).आपल्याकडून सूर्याला कुठल्याही प्रकारची पूजा, अर्घ्य यांची अपेक्षा नाही.(no expectation) आणि मी कार्य करतो हा भावही नाही. म्हणूनच सूर्याचे कर्म हा कर्मयोग आहे.
ज्याला आत्मज्ञान झाले आहे तो हे जाणतो की तीन गुणांमुळे कर्मे घडतात, कोणत्या गुणांमुळे कोणती वेगवेगळी कर्मे होतात. सत्व, रज आणि तम हे तीन गुण एकमेकांशी व्यवहार करत राहतात. या गुणांच्या खेळामध्ये हा ज्ञानी अडकून राहत नाही.
देहधारी असती परी ते कर्मबद्ध न होती
देह म्हणजे शरीर आहे त्यामुळे हे ज्ञानी लोक कर्म करतात पण ते कर्म शरीराच्या द्वारा प्रकृतीद्वारा होत आहे हे समजून त्यात बांधले जात नाहीत.
सूर्यास न बांधती कर्मे जगाची
सूर्योदय होतो आणि सूर्यास्त होतो त्याप्रमाणे पृथ्वीवरील सर्व कामे घडतात परंतु ही सर्व कामे सूर्यामुळे होत नाहीत कारण सूर्य उगवतही नाही आणि सूर्याचा अस्तही होत नाही. पृथ्वी सूर्याभोवती व स्वतःभोवती फिरत असल्यामुळे सूर्योदय, सूर्यास्त झाला असे आपल्याला वाटते. याचप्रमाणे कार्य शरीरामुळे होते परंतु आपल्याला वाटते की मी कार्य करत आहे.
कर्मयोगासाठी उत्तम उदाहरण सूर्याचे आहे. सूर्य भगवान न थांबता सतत कार्यरत असतात (no vacation). सूर्याचा प्रकाश सर्वांना सारखाच मिळतो (no discrimination).आपल्याकडून सूर्याला कुठल्याही प्रकारची पूजा, अर्घ्य यांची अपेक्षा नाही.(no expectation) आणि मी कार्य करतो हा भावही नाही. म्हणूनच सूर्याचे कर्म हा कर्मयोग आहे.
प्रकृतेर्गुणसम्मूढाः(स्), सज्जन्ते गुणकर्मसु।
तानकृत्स्नविदो मन्दान्, कृत्स्नविन्न विचालयेत्॥3.29॥
प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहीत झालेली माणसे गुणात आणि कर्मांत आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने न जाणणा-या मंदबुद्धीच्या अज्ञान्यांच्या पूर्ण ज्ञान असणा-या ज्ञान्याने बुद्धिभेद करुनये.
आपण प्रकृतीमुळे म्हणजेच गुणांमुळे बंधनात अडकून पडलो आहोत. जे दिसते तेच खरे आहे असे आपल्याला वाटू लागते. प्रकृती आपल्याला संमोहीत करते. प्रकृतीच्या गुणांमुळे आपण स्वतःला विसरून जातो. त्यामुळे आपल्याला आवडणाऱ्या कर्मांमध्ये आपण आसक्त होऊन जातो. कर्मामुळे मिळणाऱ्या फलात आपण आसक्त होतो.
अकृत्स्नविद् म्हणजे परिपूर्णपणे न जाणणारा, अज्ञानी
कृत्स्नविद् म्हणजे संपूर्णपणे जाणणारा, ज्ञानी
ज्ञानी माणसाने अज्ञानी माणसाचा बुद्धिभेद करू नये.
ज्ञानी माणसाने कर्तव्य करत राहावे आणि जाणावे की हे कर्म मी करत नाही, माझ्या शरीराच्या द्वारे प्रकृती करत आहे .पण माझे शुद्ध रूप आत्मस्वरूप आहे. माझ्या शरीरामध्ये असणाऱ्या आत्मतत्त्वाच्या उपस्थितीमुळे हे शक्य आहे.
या अवस्थेपर्यंत पोहोचण्याकरता काय केले पाहिजे हे भगवान पुढील श्लोकात सांगतात.
अकृत्स्नविद् म्हणजे परिपूर्णपणे न जाणणारा, अज्ञानी
कृत्स्नविद् म्हणजे संपूर्णपणे जाणणारा, ज्ञानी
ज्ञानी माणसाने अज्ञानी माणसाचा बुद्धिभेद करू नये.
ज्ञानी माणसाने कर्तव्य करत राहावे आणि जाणावे की हे कर्म मी करत नाही, माझ्या शरीराच्या द्वारे प्रकृती करत आहे .पण माझे शुद्ध रूप आत्मस्वरूप आहे. माझ्या शरीरामध्ये असणाऱ्या आत्मतत्त्वाच्या उपस्थितीमुळे हे शक्य आहे.
या अवस्थेपर्यंत पोहोचण्याकरता काय केले पाहिजे हे भगवान पुढील श्लोकात सांगतात.
मयि सर्वाणि कर्माणि, सन्न्यस्याध्यात्मचेतसा।
निराशीर्निर्ममो भूत्वा, युध्यस्व विगतज्वरः॥3.30॥
अंतर्यामी मज परमात्म्यामधे गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्में मला समर्पण करुन आशा, ममता व संतापरहित होऊन तू युद्ध कर.
हा अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे. हा एक श्लोक जर आपण आपल्या जीवनात आचरणात आणला तर संपूर्ण कर्मयोग आपण आचरणात आणू शकतो. भगवान म्हणतात जर तुम्हाला बंधनातून मुक्त व्हायचे असेल तर सर्व कर्मे उत्तम रीतीने करा व मला अर्पण करा.
करत प्रणाम तेरे चरणों में
लगता हूँ अब तेरे काज
पालन करने को अज्ञातम
नियुक्त होता हूँ आज।
भगवंतांनी मुक्तीचा एक सुंदर उपाय सांगितला आहे. तुम्ही स्वतः हा प्रयोग करू शकता. त्यासाठी कुठेही जायची आवश्यकता नाही. सकाळी उठल्यावर भगवंतांना नमस्कार करून सांगा की मी आज जे काम करणार आहे ते तुमचेच काम आहे आणि मी तुमच्यासाठी ते करणार आहे. सर्व काम करून झाले की तुम्हाला ज्या रूपामध्ये भगवान आवडतो त्या रूपाला ते अर्पण करा. उदाहरणार्थ श्रीकृष्णार्पणमस्तु l म्हणजे ते कर्म आता तुमचे राहिले नाही तर भगवंताचे झाले. त्यामुळे तुम्हाला त्यातून मुक्ती मिळेल.
कुठलेही काम जर भगवंताकरता केले तर ते आपण कसे करतो? साधे फूल देवाला वाहताना सुद्धा टोपलीतून आपण सुंदर, टपोरे, ताजे फूल उचलतो. त्याप्रमाणेच कुठलेही काम जर आपण भगवंताकरता केले तर ते आपण उत्तम प्रकारेच करू. भगवंताकरता केलेली कामे आपोआपच उत्तम प्रकारे होतात आणि ती कर्मे भगवंतांना अर्पण केल्यामुळे आपण त्या कर्मांच्या बंधनातून मुक्त होतो. हे कर्म आपले राहत नाही त्यामुळे त्यापासून आपल्याला अपेक्षा राहात नाहीत. भगवान म्हणतात की तू युद्धासारखे घोर कर्म केलेस तरी ते आशा, ममता आणि संतापरहित होऊन कर. युद्ध सुद्धा तुझे कर्तव्य समजून कर.
आपण एक दिवस जरी असे काम केले तरी आपल्याला मुक्तीच्या, मोक्षाच्या आनंदाचा अनुभव येईल आणि आपोआप ज्ञानप्राप्ती होईल. अंतरंगाची शुद्धी होईल. ज्ञान आपल्या अंतरंगातच आहे. त्यावर अज्ञानाच्या आवरणाची पुटे चढली आहेत. ती आपोआप दूर होतील आणि ज्ञान प्रकट होईल. हा अनुभव किंवा ही अनुभूती आपण स्वतःच घेऊ शकतो. दुसऱ्याने कितीही सांगितले तरी ती समजणार नाही.
भगवद्गीता हे योगशास्त्र आहे. शास्त्र म्हणजे विज्ञान. जसे कुठल्याही विज्ञानात प्रयोग करावा लागतो तरच समजते तसेच भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे स्वतः प्रयोग केला तरच आपल्याला मोक्षाची मुक्तीची अनुभूती येईल.
परंतु भगवान म्हणतात की मी एवढे सांगून सुद्धा काही लोक माझे ऐकत नाहीत. या गोष्टी आचरणात आणत नाहीत. ते मुक्त होत नाहीत. पुढच्या श्लोकांमध्ये भगवान याचा विस्तार करतात. या पुढील श्लोक आपण पुढल्या सत्रात पाहू.
आजचे हे चिंतन भगवत्कार्यच आहे. ते त्याच्या चरणी अर्पण करून इथे थांबूया.
ll ॐ श्रीकृष्णार्पण मस्तु ll
प्रश्न: दीड वर्षापूर्वी माझ्या पतीचे निधन झाले आहे आणि त्या दुःखातून मी बाहेर पडू शकत नाही काय करू?
उत्तर: आपण योग्य ठिकाणी आला आहात भगवद्गीतेचा अभ्यासाने सर्व संकटावर मात करता येते. भगवद्गीतेचा अभ्यास तीन प्रकारे केला जातो. गीता शिका, शिकवा आणि जीवनात आचरणात आणा. तुम्ही रोजची सारी कार्य भगवंताच्या चरणी अर्पण करून त्या बंधनातून मुक्ती मिळवू शकता. असे केल्याने भगवंतांचे सतत चिंतन होते आणि मन:शांती मिळते सर्व भय समाप्त होते घरातील सर्व कामे करताना हे भगवंताचे काम आहे असे समजून केल्याने तुम्हाला शांती मिळेल .
प्रश्न: मी रामाची भक्त आहे आणि गीतेमध्ये कृष्ण भगवानांची भक्ती अभिप्रेत आहे का?
उत्तर: राम, कृष्ण, शिव, दूर्गा या सर्व देवतांना वेगळे समजू नका. ही सारी एकाच परमात्म्याची रूपे आहेत.
तेरे नाम अनेक तू एकही है
तेरे रूप अनेक तू एकही है
ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
भगवद्गीतेमध्ये प्रवक्ता श्रीकृष्ण भगवान आहेत आणि श्रोता अर्जुन आहे. रामावताराच्या कालखंडात हेच ज्ञान ऋषी वसिष्ठांनी रामाला सांगितले आहे.
नीलिमा दीदी
प्रश्न: मी लहानपणापासून अध्यात्ममार्गावर आहे. गीता आचरणात आणण्याचा प्रयत्न करते. परंतु माझ्या घरात माझा आणि माझ्या गुरूंचा अपमान होतो. अशा वेळी मला राग येतो. मन विचलित होते. मी काय करू?
उत्तर: गुरूंची निंदा तुम्ही करत नाही ना मग चिंता करू नका. दुसऱ्याने कसे वागावे यावर आपले नियंत्रण नाही. आपण आपले कर्म करत राहायचे आणि ते कृष्णार्पण करायचे. एक दिवस तुमचा विरोध करणाऱ्यांना भगवंतांची शक्ती आपोआप दिसेल आणि त्यांच्यामध्ये आपोआप परिवर्तन होईल. त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका.
सहाव्या अध्यायात सांगितले आहे
उद्धरेदात्मनाऽऽत्मानं नात्मानमवसादयेत् । आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः।। आपणच आपला उद्धार करुन घ्यावा कारण आपणच आपले मित्र किंवा शत्रू असतो.
ज्याप्रमाणे बांधकामाच्या जागी लिहिलेले असते ' स्वतःच्या सुरक्षे कडे लक्ष द्या ' आधी त्याप्रमाणेच आपला उद्धार आपणच करायचा असतो. आपल्या मनात एक कामना असते की त्यांनीही आपल्या गुरूंचा अपमान करू नये. ती पूर्ण न झाल्यामुळे राग येतो. रागावर विजय मिळवणे सोपे नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.
सुमन दीदी
प्रश्न: कबीर म्हणतात - निंदक नियेरे राखिये, आंगन कुटी छावायें बिन पानी साबुन बिना, निर्मल करे सुहाए पण अतिनिंदा झाली की मन दुखी होते. आपण जगूच नये असे वाटते. आतून विरक्ती येते काय करावे ?
उत्तर: अर्जुनाची सुद्धा हीच स्थिती झाली होती त्यालाही वाटत होतं युद्ध सोडून देऊन भिक्षा मागून जगावे. परंतु हा संसार भगवंताचा आहे आणि हे काम भगवंताचे आहे असे समजून कर्तव्य केल्याने आनंद मिळतो निंदा करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे दुसरे कसे वागतील हे आपल्या हातात नाही.
विरक्ती येणे केव्हाही चांगलेच ,परंतु तरीही आपले कर्तव्यकर्म करतच राहिले पाहिजे. भगवंत या अध्यायात तेच सांगत आहेत. भगवंतांना स्वतःसाठी काहीच नको आहे तरीही ते सुद्धा सर्व कामे करत राहतात. ज्यांना विरक्ती येते त्यांनी लोकांच्या हितासाठी, कल्याणसाठी आणि लोकांसमोर उदाहरण ठेवण्यासाठी कर्म करत राहणे आवश्यक आहे.
निलेश जी
प्रश्न: आपण चांगली कामे करतो आणि चुकीची कामे करतो. ही सर्व कामे आपल्याकडून भगवंतच करून घेतात का?
उत्तर: तुम्ही चांगला प्रश्न विचारलात. आणि तुमचे शब्द सुद्धा योग्य वापरलेत.
आपण चांगली कामे करतो आणि वाईट कामे आपल्याकडून तो करवून घेतो असे तुम्ही म्हणता. आपण सर्वजण हेच म्हणतो. चांगल्या कामाचे क्रेडिट आपण स्वतःला देतो आणि वाईट काम आपल्या हातून घडते असे म्हणतो.
माणसाची इच्छा, कामना माणसाला चुकीचे काम करण्यास भाग पाडते. दुर्योधन आणि अर्जुन एकाच गुरुचे शिष्य आहेत तरीही दुर्योधन वाईट वागतो आणि अर्जुन सत्कार्य करतो. महाभारतात दुर्योधन स्वतःच एका लोकात म्हणतात :
जानामि धर्मं न च में प्रवृत्तिः। जानाम्यधर्मं न च में निवृत्तिः।।
दुर्योधन म्हणतो की मी जाणतो धर्म किंवा कर्तव्य काय आहे ? अधर्म काय आहे ? परंतु मी चांगले काम करण्याकरता प्रवृत्त होत नाही आणि वाईट कृत्यातून निवृत्त होत नाही.
जेव्हा आपण प्रत्येक काम भगवंताकरता करतो तेव्हा चुकीचे काम करताना आतून आवाज येतो की हे चूक आहे. हळूहळू चुकीची कामे करणे कमी होते. आणि तरीही जर एखादे चुकीचे काम आपण केले तर ते भगवंतांना अर्पण करा. भगवंत आपल्याला शक्ती देतील ज्यामुळे आपली चुकीची कामे कमी होतील.
प्रश्न: पुष्कळ वेळा आपल्याला माहित असते की हे काम केले पाहिजे तरी आपण त्या कामात दिरंगाई करतो. आपण केलेले वाईट किंवा चुकीचे कृत्य सुद्धा भगवंतांच्या चरणी अर्पण करायचे का ?
उत्तर: जर आपण सतत भगवंतांच्या संपर्कात राहिलो तर चांगल्या कामात दिरंगाई होणार नाही. समजा आपल्याकडून जप होत नसेल तर भगवंताकडेच प्रार्थना करायची की माझ्या हातून जप घडू दे.
होय, आपली चुकीची कृत्ये सुद्धा आपण भगवंतांना अर्पण केली पाहिजेत. जसे शंकराच्या पिंडीवर आपण दूधही अर्पण करतो आणि भांग ही अर्पण करतो. भगवंताच्या चरणी अर्पण केल्यामुळे आपल्या चुका कमी होतात.
यानंतर समपन प्रार्थना आणि हनुमान चालीसा पठणाने सत्राची सांगता झाली.
l l श्रीकृष्णार्पणमस्तु l l
करत प्रणाम तेरे चरणों में
लगता हूँ अब तेरे काज
पालन करने को अज्ञातम
नियुक्त होता हूँ आज।
भगवंतांनी मुक्तीचा एक सुंदर उपाय सांगितला आहे. तुम्ही स्वतः हा प्रयोग करू शकता. त्यासाठी कुठेही जायची आवश्यकता नाही. सकाळी उठल्यावर भगवंतांना नमस्कार करून सांगा की मी आज जे काम करणार आहे ते तुमचेच काम आहे आणि मी तुमच्यासाठी ते करणार आहे. सर्व काम करून झाले की तुम्हाला ज्या रूपामध्ये भगवान आवडतो त्या रूपाला ते अर्पण करा. उदाहरणार्थ श्रीकृष्णार्पणमस्तु l म्हणजे ते कर्म आता तुमचे राहिले नाही तर भगवंताचे झाले. त्यामुळे तुम्हाला त्यातून मुक्ती मिळेल.
कुठलेही काम जर भगवंताकरता केले तर ते आपण कसे करतो? साधे फूल देवाला वाहताना सुद्धा टोपलीतून आपण सुंदर, टपोरे, ताजे फूल उचलतो. त्याप्रमाणेच कुठलेही काम जर आपण भगवंताकरता केले तर ते आपण उत्तम प्रकारेच करू. भगवंताकरता केलेली कामे आपोआपच उत्तम प्रकारे होतात आणि ती कर्मे भगवंतांना अर्पण केल्यामुळे आपण त्या कर्मांच्या बंधनातून मुक्त होतो. हे कर्म आपले राहत नाही त्यामुळे त्यापासून आपल्याला अपेक्षा राहात नाहीत. भगवान म्हणतात की तू युद्धासारखे घोर कर्म केलेस तरी ते आशा, ममता आणि संतापरहित होऊन कर. युद्ध सुद्धा तुझे कर्तव्य समजून कर.
आपण एक दिवस जरी असे काम केले तरी आपल्याला मुक्तीच्या, मोक्षाच्या आनंदाचा अनुभव येईल आणि आपोआप ज्ञानप्राप्ती होईल. अंतरंगाची शुद्धी होईल. ज्ञान आपल्या अंतरंगातच आहे. त्यावर अज्ञानाच्या आवरणाची पुटे चढली आहेत. ती आपोआप दूर होतील आणि ज्ञान प्रकट होईल. हा अनुभव किंवा ही अनुभूती आपण स्वतःच घेऊ शकतो. दुसऱ्याने कितीही सांगितले तरी ती समजणार नाही.
भगवद्गीता हे योगशास्त्र आहे. शास्त्र म्हणजे विज्ञान. जसे कुठल्याही विज्ञानात प्रयोग करावा लागतो तरच समजते तसेच भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे स्वतः प्रयोग केला तरच आपल्याला मोक्षाची मुक्तीची अनुभूती येईल.
परंतु भगवान म्हणतात की मी एवढे सांगून सुद्धा काही लोक माझे ऐकत नाहीत. या गोष्टी आचरणात आणत नाहीत. ते मुक्त होत नाहीत. पुढच्या श्लोकांमध्ये भगवान याचा विस्तार करतात. या पुढील श्लोक आपण पुढल्या सत्रात पाहू.
आजचे हे चिंतन भगवत्कार्यच आहे. ते त्याच्या चरणी अर्पण करून इथे थांबूया.
ll ॐ श्रीकृष्णार्पण मस्तु ll
प्रश्नोत्तरे
देवयंती दीदीप्रश्न: दीड वर्षापूर्वी माझ्या पतीचे निधन झाले आहे आणि त्या दुःखातून मी बाहेर पडू शकत नाही काय करू?
उत्तर: आपण योग्य ठिकाणी आला आहात भगवद्गीतेचा अभ्यासाने सर्व संकटावर मात करता येते. भगवद्गीतेचा अभ्यास तीन प्रकारे केला जातो. गीता शिका, शिकवा आणि जीवनात आचरणात आणा. तुम्ही रोजची सारी कार्य भगवंताच्या चरणी अर्पण करून त्या बंधनातून मुक्ती मिळवू शकता. असे केल्याने भगवंतांचे सतत चिंतन होते आणि मन:शांती मिळते सर्व भय समाप्त होते घरातील सर्व कामे करताना हे भगवंताचे काम आहे असे समजून केल्याने तुम्हाला शांती मिळेल .
प्रश्न: मी रामाची भक्त आहे आणि गीतेमध्ये कृष्ण भगवानांची भक्ती अभिप्रेत आहे का?
उत्तर: राम, कृष्ण, शिव, दूर्गा या सर्व देवतांना वेगळे समजू नका. ही सारी एकाच परमात्म्याची रूपे आहेत.
तेरे नाम अनेक तू एकही है
तेरे रूप अनेक तू एकही है
ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
भगवद्गीतेमध्ये प्रवक्ता श्रीकृष्ण भगवान आहेत आणि श्रोता अर्जुन आहे. रामावताराच्या कालखंडात हेच ज्ञान ऋषी वसिष्ठांनी रामाला सांगितले आहे.
नीलिमा दीदी
प्रश्न: मी लहानपणापासून अध्यात्ममार्गावर आहे. गीता आचरणात आणण्याचा प्रयत्न करते. परंतु माझ्या घरात माझा आणि माझ्या गुरूंचा अपमान होतो. अशा वेळी मला राग येतो. मन विचलित होते. मी काय करू?
उत्तर: गुरूंची निंदा तुम्ही करत नाही ना मग चिंता करू नका. दुसऱ्याने कसे वागावे यावर आपले नियंत्रण नाही. आपण आपले कर्म करत राहायचे आणि ते कृष्णार्पण करायचे. एक दिवस तुमचा विरोध करणाऱ्यांना भगवंतांची शक्ती आपोआप दिसेल आणि त्यांच्यामध्ये आपोआप परिवर्तन होईल. त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका.
सहाव्या अध्यायात सांगितले आहे
उद्धरेदात्मनाऽऽत्मानं नात्मानमवसादयेत् । आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः।। आपणच आपला उद्धार करुन घ्यावा कारण आपणच आपले मित्र किंवा शत्रू असतो.
ज्याप्रमाणे बांधकामाच्या जागी लिहिलेले असते ' स्वतःच्या सुरक्षे कडे लक्ष द्या ' आधी त्याप्रमाणेच आपला उद्धार आपणच करायचा असतो. आपल्या मनात एक कामना असते की त्यांनीही आपल्या गुरूंचा अपमान करू नये. ती पूर्ण न झाल्यामुळे राग येतो. रागावर विजय मिळवणे सोपे नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.
सुमन दीदी
प्रश्न: कबीर म्हणतात - निंदक नियेरे राखिये, आंगन कुटी छावायें बिन पानी साबुन बिना, निर्मल करे सुहाए पण अतिनिंदा झाली की मन दुखी होते. आपण जगूच नये असे वाटते. आतून विरक्ती येते काय करावे ?
उत्तर: अर्जुनाची सुद्धा हीच स्थिती झाली होती त्यालाही वाटत होतं युद्ध सोडून देऊन भिक्षा मागून जगावे. परंतु हा संसार भगवंताचा आहे आणि हे काम भगवंताचे आहे असे समजून कर्तव्य केल्याने आनंद मिळतो निंदा करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे दुसरे कसे वागतील हे आपल्या हातात नाही.
विरक्ती येणे केव्हाही चांगलेच ,परंतु तरीही आपले कर्तव्यकर्म करतच राहिले पाहिजे. भगवंत या अध्यायात तेच सांगत आहेत. भगवंतांना स्वतःसाठी काहीच नको आहे तरीही ते सुद्धा सर्व कामे करत राहतात. ज्यांना विरक्ती येते त्यांनी लोकांच्या हितासाठी, कल्याणसाठी आणि लोकांसमोर उदाहरण ठेवण्यासाठी कर्म करत राहणे आवश्यक आहे.
निलेश जी
प्रश्न: आपण चांगली कामे करतो आणि चुकीची कामे करतो. ही सर्व कामे आपल्याकडून भगवंतच करून घेतात का?
उत्तर: तुम्ही चांगला प्रश्न विचारलात. आणि तुमचे शब्द सुद्धा योग्य वापरलेत.
आपण चांगली कामे करतो आणि वाईट कामे आपल्याकडून तो करवून घेतो असे तुम्ही म्हणता. आपण सर्वजण हेच म्हणतो. चांगल्या कामाचे क्रेडिट आपण स्वतःला देतो आणि वाईट काम आपल्या हातून घडते असे म्हणतो.
माणसाची इच्छा, कामना माणसाला चुकीचे काम करण्यास भाग पाडते. दुर्योधन आणि अर्जुन एकाच गुरुचे शिष्य आहेत तरीही दुर्योधन वाईट वागतो आणि अर्जुन सत्कार्य करतो. महाभारतात दुर्योधन स्वतःच एका लोकात म्हणतात :
जानामि धर्मं न च में प्रवृत्तिः। जानाम्यधर्मं न च में निवृत्तिः।।
दुर्योधन म्हणतो की मी जाणतो धर्म किंवा कर्तव्य काय आहे ? अधर्म काय आहे ? परंतु मी चांगले काम करण्याकरता प्रवृत्त होत नाही आणि वाईट कृत्यातून निवृत्त होत नाही.
जेव्हा आपण प्रत्येक काम भगवंताकरता करतो तेव्हा चुकीचे काम करताना आतून आवाज येतो की हे चूक आहे. हळूहळू चुकीची कामे करणे कमी होते. आणि तरीही जर एखादे चुकीचे काम आपण केले तर ते भगवंतांना अर्पण करा. भगवंत आपल्याला शक्ती देतील ज्यामुळे आपली चुकीची कामे कमी होतील.
प्रश्न: पुष्कळ वेळा आपल्याला माहित असते की हे काम केले पाहिजे तरी आपण त्या कामात दिरंगाई करतो. आपण केलेले वाईट किंवा चुकीचे कृत्य सुद्धा भगवंतांच्या चरणी अर्पण करायचे का ?
उत्तर: जर आपण सतत भगवंतांच्या संपर्कात राहिलो तर चांगल्या कामात दिरंगाई होणार नाही. समजा आपल्याकडून जप होत नसेल तर भगवंताकडेच प्रार्थना करायची की माझ्या हातून जप घडू दे.
होय, आपली चुकीची कृत्ये सुद्धा आपण भगवंतांना अर्पण केली पाहिजेत. जसे शंकराच्या पिंडीवर आपण दूधही अर्पण करतो आणि भांग ही अर्पण करतो. भगवंताच्या चरणी अर्पण केल्यामुळे आपल्या चुका कमी होतात.
यानंतर समपन प्रार्थना आणि हनुमान चालीसा पठणाने सत्राची सांगता झाली.
l l श्रीकृष्णार्पणमस्तु l l